Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा

Nashik News : मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असून मनोज जरांगे यांनी “मुंबईकर आम्हाला लेकरं समजा, आम्ही शांततेत येतोय पण सरकार दंगल भडकवत आहे” असे म्हटले आहे.
Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा
nashik newssaam tv
Published On
Summary
  • २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलन मुंबईत धडकणार.

  • आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण; मोठ्या संख्येने मराठा समाज मार्गस्थ.

  • मनोज जरांगे यांचा दावा – “आम्ही शांततेत आरक्षण घेणार, सरकारला दंगल घडवायची आहे.”

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेला मोठं आव्हान.

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांचा मोर्चा थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाला २९ ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होणार असून दोन वर्षांपासून चाललेल्या या लढ्याचा शेवट होण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी आंदोलक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी “मुंबईकर आम्हाला लेकरं समजा. आम्ही गरीब आहोत, आमची लेकरं तुमच्या दारात न्यायासाठी येत आहेत. त्यामुळे आमच्यावर शंकेचं वातावरण तयार नका करू. सरकारला दंगल घडवायची आहे” असा सूर लावला.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे म्हणाले, " उत्सवाचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. जसा गणेश उत्सव आमच्या लेकरा बाळांच्या सुखासाठी आहे तसेच आरक्षण सुद्धा मराठ्यांच्या लेकरांच्या सुखासाठी आहे. आम्ही मराठे हिंदुचे सगळे संस्कार आणि वारकरी संप्रदाय पाळतो. सरकारची लोक काही बातम्या पसरवतात त्यात आमची चूक काय? " असे वक्तव्य त्यांनी केले.

Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा
Manoj Jarange: मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगेंच्या आंदोलनाची रणनिती ठरली

पुढे ते म्हणाले "आम्ही न्यायासाठी येत आहे उलट तुम्ही आम्हाला पाणी दिले पाहिजे. या आंदोलनासाठी चार महिन्यांपूर्वी आम्ही तारीख काढलेली आहे तेव्हा गणेश उत्सव आहे असं आम्हाला माहित नव्हतं. मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं. कोणाचाही बाप आडवा येऊ द्या आम्ही शांततेत मुंबईत येणार आणि शांततेत आरक्षण घेणार आहोत. 100% सरकारला दंगल घडवायची आहे, त्यांना मराठ्यांच्या अंगावर जाळ फेकायच आहे." असं मनोज जरांगे यांनी म्हटले

Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पोलिस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांना विशेष यंत्रणा तयार ठेवण्याचं आदेश देण्यात आलं आहे. कारण, लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक, कायदासुव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी प्रचंड वाढलेली असते आणि या वातावरणात आंदोलन झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा
Manoj Jarange Patil : "दंगल भडकवू नका, अन्यथा महाराष्ट्र कायमचा बंद राहील", जरांगे पाटलांचा इशारा, फडणवीस-हाकेंवर गंभीर आरोप

दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावोगावी जय्यत तयारी केली जात आहे. या आंदोलनाला मुंबईकरांचा प्रतिसाद कसा असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच सरकार या आंदोलनाबाबत कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com