संजय सूर्यवंशी
नांदेड : लग्न झाल्यानंतर काही दिवस पत्नी सोबत राहिली. मात्र माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीसोबत सासू मुलीला पाठविण्यास तयार नव्हती. आपल्या जावयाला माघारी फिरवून देत होती. याचा राग मनात धरून जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील नरसी या गावात घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील नरसी गावात सदरची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पारुबाई रॅपनवाड यांचा जागेवर मृत्यु झाला. या घटनेनंतर नरसी गावात एकच खळबळ उडाली. लग्नानंतर सासू आपल्या मुलीला नांदायला पाठवत नव्हती. आपल्या पत्नीला घेण्यासाठी जावई अनेक वेळा सासरवाडीत जाऊन आपल्या पत्नीला नांदायला आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सासूने मुलीला पाठवण्यास नकार दिला.
नकार दिल्याने चाकूने वार
वारंवार जाऊन देखील सासू आपल्या पत्नीला पाठवत नाही. याचा राग मनात असल्याने जावयाने सासूचा काटा काढायचा विचार केला. यानंतर जावई अशोक धोत्रे हा अपल्या मित्राला सोबत पुन्हा आपल्या सासुरवाडीत पत्नीला आणण्यासाठी गेला होता. यावेळी देखील मुलीला जावयासोबत पाठविण्यास नकार दिला. पत्नीला पाठविण्यावरून सासू आणि जवायामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला होता.
जावयासोबत मित्राला अटक
वाद सुरु असतानाच रागाच्या भरात जावयाने आपल्या जवळील धारदार चाकूने सासूवर हल्ला केला. यात गळा कापला गेल्याने सासू पारुबाई रॅपनवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळो येत पंचनामा करत संशयित आरोपी जावयाला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.