Nandurbar: 'धरण उशाला ,कोरड घशाला'; नंदुरबारमध्ये स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही महिलांची पाण्यासाठी वणवण

water Crisis issue in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव-तिनसमाळ येथील ढुठ्ठलपाडा आणि घुडानचापडा पाड्यावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
Nandurbar
NandurbarSaam tv
Published On

सागर निकवाडे, नंदूरबार

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव-तिनसमाळ येथील ढुठ्ठलपाडा आणि घुडानचापडा पाड्यावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे. स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्षी जरी 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा केला जाणार असला तरी आजही आदिवासी 'विकासापासून कोसो दूर' हा गंभीर प्रश्न निर्माण आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान चिमुकले ,वृद्ध दोन ते तीन किलोमीटर घाटात पाणी भरण्यासाठी जावे लागते. कमी पाणी मिळत असल्यामुळे पाण्यासाठी तिथेच वाद सुरू होतो. इतर कामे सोडून महिला पाणी राखून दिवसभर बसून राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. (Latest Marathi News)

जानेवारीच्या पहिल्याच महिन्यापासून पाणी टंचाईमुळे दरी आणि घाट गाठावे लागत असल्याने मे, जून महिन्यात कशी परिस्थिती येईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत आहे. गावात पाण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे. त्यासाठी येत्या काळात किती यातना सहन कराव्या लागतील, असे गावकरी गाऱ्हाणे मांडत आहे.

दररोज सकाळी महिला,लहान मुलं, वृद्ध घाटात उतरून नैसर्गिक स्रोतातून पाणी भरून आणावे लागत आहे. दररोज दोन ते तीन नैसर्गिक स्रोतावर फेरफटका मारावा लागतो ,तेव्हाच पुरेसे पाणी मिळते नाहीतर पाण्याविना दिवस काढावे लागते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar
Sadavarte On Maratha Morcha: म्हणून मराठा बांधवांना आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंवर हल्लाबोल करत सदावर्तें म्हणाले...

जंगली व घाटाचा भाग असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. मागील काही वर्षात दोन मुले व एक वृद्ध पाणी भरण्यासाठी गेल्याने बिबट्याचे हल्ला करून जीवे ठार केले. तर पाण्यासाठी कित्येक जीव जाणार म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून किमान पिण्याचा पाण्याची सोय करून द्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पिण्यासाठी व जनावरांसाठी एकच ठिकाणावरून वापरत असल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. नैसर्गिक स्रोतावर जनावर ज्या ठिकाणी पाणी पितात त्याच ठिकाणावरून पिण्यासाठी ही पाणी भरावे लागते. वेगळी उपाय योजना नसल्यामुळे तेच पाणी वापरावे लागते.

Nandurbar
Supriya Sule News: 'ईडीची चौकशी म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी इव्हेंट..' खासदार सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

मनरेगातून विहिरीची मागणी

मागील एक वर्षांपासून मनरेगा योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरी ची मागणी केली आहे. परंतु मंजुरी मिळत नसल्यामुळे योजनेपासून वंचित आहे. गाव पाड्यात एकही शासनाची विहीर किंवा इतर सुविधा नाही. प्रत्येक पाड्यातील रहिवासी घाट,दारीतूनच पाणी वापरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com