अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी चढाओढ असल्याचं मिटकरी म्हणाले. कॅबिनेट मंत्रीपदासाठी रवी राणांकडून फडणवीसांची रक्ततुला करण्यात आली, त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा यासाठी रवी राणांनी रक्ततुला घेतल्याचं मिटकरी म्हणाले. अकोल्यातील (Akola) मूर्तिजापुर येथे आयोजित दहिहांडीच्या कार्यक्रमात मिटकरी बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके यांलस राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Akola Political News)
हे देखील पाहा -
यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही गोर-गरीबांपर्यत पोहोचू, त्यांनी पन्नास-पन्नास खोक्यांची मलाई ४० आमदारांपर्यत पोहोचवली. आता तुमच्याही आमदारांना वाटते मंत्रिपद मिळते का? एवढी लॉबिंग लागलेली आहे तिकडं. आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मारामाऱ्या सुरु आहेत. अमरावतीत रवी राणांनी रक्त तुला घेतली, त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा, असाच काहीसा उद्देश यामागील आहे. अनेक आमदारांनाही वाटतेय असे अमोल मिटकरीही म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.