

एकनाथ शिंदे ठाकरेंच्या टीकेवर काय म्हणाले?
26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या.
सगळं दिलंय. तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेलाय का...तेवढी तरी दानत दाखवायची होती.
फोटो लावतात कार्यकर्ते, त्यावर एवढी टीका केली.
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का...
५ जुलैला काय केलं होतं...तेव्हा मी बोललो की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी
जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही.
हिंदी सक्ती करायची नाही.
मुंबई जर व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार असेल तर हा खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही.
मराठीला हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही.
आमचं कोणाशी भांडण नाही. आमच्या अंगावर येऊ नका. शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की अंगावर जायचं नाही, आणि कुणी अंगावर हात उचलला तर तो हात ठेवू नका.
भाजपला इशारा देतो की हिंदुत्वावरून अंगावर येऊ नका, तुमचे सगळे टोप्या घातलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवल्याशिवाय राहणार नाही.
आम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले आहेत.
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळेत शिवाजी पार्कवर पोहोचतील.
दसरा मेळाव्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून मुंबईकडे रवाना..
हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे विजयादशमीच्या निमित्ताने प्रभू शिव शंकराची अलंकार व दागदगिने घालून विशेष पूजाअर्चा करण्यात आली आहे, आजच्या दिवशी प्रभूची पिंड विविध रेशमी वस्त्रांनी सजविण्यात आली होती तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी श्रींच्या डोक्यावर चांदीची गंगा व नागफणा बसवण्यात आला होता दरम्यान प्रभुंचे आजचे रूप पाहण्यासाठी भाविक भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची पालखी, तुळजाभवानीची पालखी गुरुमाऊलींची पालखी शाहील लाव्या जम्यांसह दसरा चौकात पोहोचलेली आहे. काही क्षणात शाहू महाराज आणि कुटुंबीय मेबॅग कारमधून पोहोचतील, हवेत बंदुकांची गोळीबार करून सलामी होईल आणि दसरा महोत्सवाला प्रारंभ होईल. शाहू महाराज यांच्या हस्ते 6:18 मिनिटांनी शमी पूजन होऊन सोनं लुटलं जाईल.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हळूहळू चक्रीवादळात बदलतोय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेच्या किनाऱ्याकडे वेगानं सरकतंय.
दसरा मेळाव्यासाठी मुस्लिम मावळा हा संगमनेर वरून शिवतीर्थावर दाखल झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी. आमचं मत चोरीला गेला आहे. शेतकऱ्यांना 85 रुपये गुंठा मदत मिळणार आहे. या सर्वांचा निषेध या मुस्लिम मावळ्याने केलाय.
ठाकरे कुटुंब एक झाल्याने विरोधकांना धडकी भरली असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळा परब यांनी दसरा मेळाव्याला निघताना दिली.
त्याच प्रमाणे ठाकरे कुटुंब एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज आहे असे ही यावेळी त्यांनी सांगितले.येत्या महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत मात्र उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणार
कल्याण मधून शेकडो शिवसैनिक शिवसेना शिंदे गटाचे दसरा मेळाव्या साठी रवाना झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी गोरेगाव येथे निघाले आहे.कल्याणातून शेकडो शिवसैनिक या मेळाव्यात सामील होणार आहे. कल्याणातून निघण्याआधी दुर्गाडी चौक येथे एकत्र येत शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली.
जालन्यात धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण स्थगित झालय. धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांची तब्येत खालवल्याने उपोषणाच्या सोळाव्या दिवशी आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यात आमरण उपोषण सुरू होतं.दिपक बोऱ्हाडे यांनी स्वतःच्या मुलीच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण केलं स्थगित केलं आहे. दरम्यान उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर मागण्यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याचं दिपक बोऱ्हाडे यांनी म्हटलं..
मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सध्या पालघर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होऊ लागले आहेत . पालघरच्या मनोर आणि ढेकाळे येथे हजारो शिवसैनिक जमा झाले असून ते येथून पुढे मुंबईकडे रवाना होतील . 500 पेक्षा अधिक गाड्यांमधून हे शिवसेनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असून हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्याला जात असून एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी 25 हजार रुपयांचं किट वाटप करण्याचा निर्णय घेतल्याच यावेळी जिल्हाप्रमुखांकडून कुंदन संखे यांच्या कडून सांगण्यात आलं .
ज्यांचे शेतं आणि पिक वाहून गेलं 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यायची- मनोज जरांगे
मुंबई -
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक दाखल झाले आहेत.
शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे.
या मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
घरून चटणी भाकरी घेऊन आले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या 26व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
बॉयलर अग्निप्रदीपन, मोळी टाकणे आणि गव्हाण पूजन हा कार्यक्रम कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडला.
नाशिक -
- दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सोने खरेदीसह वाहनांची विक्री देखील सुसाट
- वाहनांवरील जीएसटी कमी झाल्यानं वाहनांची रेकॉर्ड ब्रेक खरेदी
- एकट्या नाशिकमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर ९५० कार ३१०० दुचाकींची डिलिव्हरी
- मागील वर्षाच्या तुलनेत कार ४० टक्के अधिक तर दुचाकी विक्रीत २० टक्क्यांनी वाढ
- शहरातील वेगवेगळ्या शो रूम्समध्ये मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी मोठी गर्दी
अहिल्यानगर-
अहिल्यानगर शहरातील महात्माफुले चौकात लावला वादग्रस्त पुतळा
आई भवानी शक्ती दे लव जिहादला मुक्ती दे असे फलक लाऊन विशिष्ट समाजाच्या लोकांवर प्रभावित होईल असा लावलेला आहे 70 फुटी पुतळा
दहन करणाऱ्या पुतळ्यावर पोलिसांचा आक्षेप
आयोजक आणि पोलिसांमध्ये चर्चा ...दहन करणारा पुतळा बदलण्याची पोलिसांची आयोजकांना सूचना
शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आईचे छत्र हरपलेल्या एका नवजात बालकासाठी देवदूत धावल्याचे उदाहरण दिले आहे. मतदारसंघातील मोहिदा शिवारात प्रसूतीदरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार पाडवी यांनी तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तिथे उपचाराधीन असलेल्या अवघ्या दीड किलो
आमदार पाडवी यांनी केवळ उपचारासाठी मदत न करता, या नवजात बालकाच्या वैद्यकीय तपासण्या, उपचारांसह भविष्यातील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी या बालकाचा 'मामा' बनून कुटुंबाला आधार दिला.
एका गरीब कुटुंबातील बालकासाठी आमदार पाडवी यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आज भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्याला छनंजय मुंडे, प्रितम मुंडे उपस्थित आहे. पंकजा मुंडेंचं भाषण सुरु झालं आहेय
नाशिकच्या चांदवड तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात दसरा-दिवाळी सण लक्षात घेता झेंडू शेती करत असतात मात्र गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे झेंडू पिकाच्या शेती मध्ये पाणी शिरले पर्यायाने फुले सडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी नाराज होत झेंडू फुलाच्या बागा तोडत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
कर्जत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या पारंपरिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध संचलन केले. शस्त्रपूजन विधी पार पडल्यानंतर देशभक्तीपर वातावरणात घोषणाबाजी, परंपरा आणि सांघिक शिस्तीचे दर्शन घडले.
अतिवृष्टीने राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलय. अजित पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचाही आढावा घेतला. तसंच इथल्या नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांचा आम्ही समाधान करू असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची रोहित पवार हे पाहणी करत आहेत.लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक या भागात नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली, मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झाल , सोयाबीन, ऊस, मूग उडीद हे सर्व पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, सरकारने सरसकट हेक्टरी 5 हजाराची मदत द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा.. अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे, तसेच पिक विमा आणि कर्जमाफी तात्काळ जाहीर झाली पाहिजे.. 10ते 12 तारखेपर्यंत शेतकरी आणि मजुरांना देखील भरीव मत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे
नाशिकच्या मालेगाव मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीची परंपरा पाळत मालेगाव च्या भुईकोट किल्ल्यातून पथ संचनाला सुरवात केली संचलन शहरातील अनेक भागातून जात असताना त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली,तर पुन्हा भुईकोट किल्ल्यात आल्यावर प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शिवसेना युवा नेते व मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांनी स्वयंसैनिकाना गुलाब पुष्प देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या,तर पथ संचलन होत असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहावयास मिळाला
- युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संविधानाच्या प्रती वाटप करणार, नागरिकाना वाटप करणार
- सक्करदरा चौकात काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कॉलेज जवळ कार्यकर्ते जमले असून, संविधान वाटणार प्रति वाटणार आहे...
- युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिपच्या तसेच महाराष्ट्र प्रदेश युथ कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात करणार आंदोलन करत संविधान प्रति वाटणार आहे..
- संघाने मनुस्मृती विचार सोडून संविधानाचा स्वीकार करावा यासाठी नागरिकांसोबत संघाच्या लोकांना सुद्धा देणार असल्याचा युवक काँग्रेसचा दावा होता.
- मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावत आंदोलकाना सक्करदारा चौकात रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याच दिसून येत आहे... आणि आंदोलकामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
-
विजयादशमी म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आणि याच विजयाचे प्रतीक म्हणून शस्त्रपूजनाची प्राचीन परंपरा आहे, धुळे पोलीस दल देखील ही परंपरा दरवर्षी निष्ठेने जपते, काळानुसार पोलिसांकडील शस्त्रे आणि वाहने बदलली असली तरी, वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा त्यांचा संकल्प आजही कायम आहे, या दिवशी शस्त्रांसोबतच वाहनांचेही पूजन करून पोलीस दलाने आपली परंपरा कायम ठेवली आहे,
मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना
जरांगे पाटील ॲम्बुलन्स मधून नारायण गडाकडे रवाना
दसरा मेळाव्यासाठी जरांगे पाटील ॲम्बुलन्स मधून नारायण गडाकडे रवाना
मुंबईत सुद्धा अधून मधून पाऊस पडत आहे शिंदे यांचे शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत पार पडत आहे अशा वेळेला शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये याच दृष्टीने संध्याकाळी नवी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे
साधारणपणे दसरा मेळावा 10 नंतर संपेल अशा स्थितीला शिवसेनेक राज्यातून आलेला असतो त्यामुळे नवी मुंबई मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे राहण्याची व्यवस्था पंधरा ते वीस हजार लोकांची करण्यात आली आहे
तसेच जेवण आणि नाश्ता याची सुद्धा सोय करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे
अजित पवार गटाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहिर मेळावा आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदाद पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले असून जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन केले व आता मेळाव्याच्या ठिकाणी दाखल
- सोलापूर जिल्ह्यातील कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोलापुरात येणार..
- सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरात हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे झालं आहे नुकसान..
- दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 90% कांदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झाला आहे खराब.
- जिल्ह्यातील चाळीस हजार हून अधिक हेक्टर कांदा पीक झाला आहे नुकसान.
- अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे 90 टक्के होऊन अधिक कांदा पीक गेला आहे वाया..
- केंद्राचे तीन सदस्य पथक सोलापुरात होणार दाखल..
नवरात्र निमित्ताने सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडीची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली.नऊ दिवस शहरामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये दुर्गामाता दौड सुरू होती.शहरातल्या दुर्गामाता मंदीरापासून या दौडीला सुरुवात झाली,त्यानंतर शहरातील विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दुर्गामाता दौडीचा समारोप झाला. या दौडीत पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून हजारो धारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाने नऊ दिवस दौडी सुरू असणाऱ्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली.तरुणांच्या मध्ये देशभक्ती आणि धर्माबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ४१ वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येतं. नऊ दिवस पहाटे पाच वाजता सुरू होणारया दौडीत हजारो धारकरी सहभाग घेतात,ठीक ठिकाणी भल्या पहाटे निघणाऱ्या दौडीचे जल्लोषात स्वागत करण्याची परंपरा आहे.दसऱ्याच्या दिवशी शहरातील दुर्गामाता मंदिरासमोर या भव्य दौडीचा संभाजी भिडे यांच्या समारोप करण्यात आला..
अमेरिकेने त्यांच्या हितासाठी टॅरिफ धोरणं आणलं आहे. आपल्याला स्वदेशीवर भऱ द्यावा लागेल, आर्थिक क्षेत्रात भारत आघाडीवर आहे, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.
पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्या. दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, यावेळी भारताचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झाले, असे मोहन भागवत म्हणाले.
महात्मा गांधी यांचं स्वांतत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे मनोज जरांगे पाटील ठीक बारा वाजता नारायणगडावरून समाज बांधवांना संबोधित करणार असल्याची माहिती गडाचे महंत शिवाजी महाराजांनी दिली आहे नारायण गड हा सर्व समाजाचा गड असून वाईट विचारांचे दहन करून चांगले विचार सोबत घेऊन आज गडावरून जायचं आहे त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे असेही आवाहन नारायण गडावरून महंत शिवाजी महाराजांनी केले आहे
नाशिकमध्ये ५०० टनांपैकी निम्मी फुले सडली. स्थानिक बाजारात पावसाच्या फटक्याने झेंडूचे दर घसरून किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत घसरले. नवरात्र आणि दसऱ्यासाठी झेंडूची फुलं ही भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाची ठरतात. राज्यातील झेंडूचा बाजार नाशिक आणि पुण्यावर अवलंबून आहे. मात्र परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुले सडल्याने झेंडू सडू लागला आहे. त्यामुळे यंदा झेंडूचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ४ किलो फुलांच्या क्रेटचा दर १५० ते २०० रुपये इतका झालाय. नाशिकमध्ये ५०० टन झेंडू होतो. त्यातील निम्मा स्थानिक तर निम्मा बाहेरील बाजारात जातो. मात्र पावसाचे पाणी झेंडूच्या बागांत साचल्याने मोठे नुकसान होत आहे. नाशिकमधून मुंबई, सुरत, बडोदा, इंदूर, उज्जैन, भोपाळला जाणारी २५० टन फुले ओली झाल्याने स्थानिक पातळीवरच त्यांची विक्री करावी लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. या परिस्थितीचे प्रतिबिंब हंगामी पैसेवारीत उमटले असून, सन २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामातील ७९३ गावांची सरासरी पैसेवारी ४७ अशी जाहीर झाली आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पाच ते सहा वेळा अतिवृष्टी, तसेच संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
खरीप हंगामातील पीकस्थितीचे वास्तव अधोरेखित करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांत पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या पहिल्या पैसेवारीत जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरासह उपनगरांत बुधवारी दिवसभर आकाश निरभ्र आणि ऊन पडले होते
महिन्याच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्याने ऑक्टोबर हीटची चाहूल लागली
पहिल्याच दिवशी दापोडीत सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अन्यत्र २९ ते ३२ अंश सेल्सिअस नोंद झाली
गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरला आणि हवामानात बदल झाला. बुधवारी सकाळपासून आकाश निरभ्र आणि सूर्यनारायणाने दर्शन दिल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला
दिवसभराच्या उन्हामुळे हलका चटका जाणवू लागला
पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, तर हलक्या ते अतिहलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सिमोल्लंघनासाठी गेली हजारो वर्षांपासून नगरहुन मानाची पलंग पालखी येत असते.तुळजाभवानी मातेचे माहेर असलेल्या नगरहुन पलंग पालखीचा मान हा भगत कुटुंबीयांना आहे.त्यांची ३० वी पिढी आज ही मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात याच पालखीचे देवीची मंदीराभोवती मिरवणूक काढली जाते.
देवीची पालखी ठेवण्याच्या पिंपळा कट्ट्या बाजूला थांबण्यावरून वाद
पोलिसांनी बीव्हीजी कर्मचाऱ्याला हटवले असता बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी केला विरोध
देवीची मिरवणूक चालू असताना गोंधळ
बीव्हीजी चे कर्मचारी अनेक जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा भाविकांच्या ही तक्रारी
भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस व बीव्हीजी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षारक्षकांमध्येच हाणामारी झाल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आज देवीचा सिमोल्लंघन सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक तुळजापुरात झाले होते दाखल
त्याच हजारो भाविकासमोर गोंधळ झाल्याने मंदिर प्रशासनावर टीकेची नामुष्की
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकीय विजयादशमी आणि शस्त्रपूजन सोहळा नागपूरच्या रेशीमबाग मैदानात होत आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात, याकडे संपूर्ण देशातच लक्ष लागलेलं असतं. आज मुख्य मंचावर असलेला बॅक ड्रॉप हा लक्ष वेधून घेत आहे...आज वसुदेव कुटुम्बकम असा घोष केला जातोय.. बॅक ड्रॉप मध्ये असलेले "संघ के चरण बढ रहे है" मागे असलेले पृथ्वीच चिन्ह आहे.... यावर सरसंघचालक बोलतील असं बोललं जातं...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे राहणार आहे. यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उभा करून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतील. संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दुतावासांनाही निमंत्रण दिले आहे.
सोहळ्यासाठी संघाच्या देश आणि विदेशात असलेल्या विविध संस्थांचे प्रमुख यावर्षी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच उद्योग, चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावर्षीच्या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता बैठकीची विशेष व्यवस्था करण्यात आली
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सकाळी ५.४५ वाजता रामधून गाण्यात आलीय.ही रामधून नई तालीम येथील घंटाघर पासून तर बापू कुटी पर्यंत होती. यात आश्रमतील गांधींवाद्याचा समावेश होता.त्यानंतर बापूकुटी परिसरात प्रार्थना करण्यात आलीय.गांधींवाद्यानी सकाळी ६.३५ ते ७.३० यावेळेत सामूहिक श्रमदान केले.आज महात्मा गांधी यांची जयंती असल्याने आश्रमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
शिर्डीत साईबाबांच्या 107 व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असून या उत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय.. उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी राहणार रात्रभर खुले राहणार आहे.. साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले असून साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली आहे.. थोड्यावेळाने शिर्डीत भिक्षा झोळीचा कार्यक्रम संपन्न होणार असून साई संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी होतील.. साईं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा कालांतराने या मेळाव्याचे सूत्र पंकजा मुंडे यांच्याकडे आली आज रोजी बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 10 वा दसरा मेळावा होत आहे गतवर्षी याच मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले होते तर लक्ष्मण हाके देखील या मेळाव्यास उपस्थित राहिले होते मात्र या वेळेच्या मेळाव्यास दोन्ही बहिण भाऊ एकत्र येतात का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून सावरगाव घाट येथील मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटी मुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
देवाचे प्रवेशद्वार,चौखांबी,सोळखंबी संत नामदेव पायरी,सभा मंडप आदी ठिकाणी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ॲार्कीड, अॅांथोरियम, सुर्यफूल, ब्लु डेजी, पिंक डेजी, कमिनी, अशोकाची पाने, जिप्सो, मनीप्लांट, ड्रेसिना. इत्यादी फुलांचा व पानांचा वापर केला आहे. ही सजावट पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी केली आहे
महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे होणार आहेत. संघाचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. संघाला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत, भाषणात मोहन भागवत काय बोलणार? याची उत्सुकता लागली. पंकजा मुंबई आणि मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेय, मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलेय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. शिंदे अन् ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करण्याची हिंमत बाळगुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभूतपुर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने उमेदीने करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले आहे.
‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याचा विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.
२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.