Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Pune : उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

अण्णाभाऊ साठे सभागृह घेणार बैठक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखाप्रमुखांशी होणार चर्चा

Pune : हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या अजिंक्य कडला उरळी कांचन पोलिसांनी घेतलं ताब्यात..

Summary

हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या अजिंक्य कडला उरळी कांचन पोलिसांनी घेतलं ताब्यात..

विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजन करताना अजिंक्य कड याने पिस्टल बाहेर काढून हवेत केला होता गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर उरळी कांचन पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतला आहे..

आरोपीने गोळीबार केलेली पिस्टल ही परवानधारक असून पिस्टल सह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.... गोळीबार का केला याचा तपास आता पोलीस करत आहेत

Amravati : अमरावतीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

* अमरावतीच्या चांदूररेल्वे मार्गावरील SRPF कॅम्प नजीकची घटना...

* दरम्यान वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला बांबू गार्डन येथे हलविले...

* बांबू गार्डन येथे बिबट्याचे शवविच्छेदन केले जाणार..

* बिबट्याला कुठल्या वाहनाने धडक दिली यासंदर्भात वनविभागाकडून शोध सुरू.

* तर दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर..

पुणे विमानतळावर विमान अपहरणाचे "मॉक ड्रिल"

पुणे विमानतळावर विमान अपहरणाचे "मॉक ड्रिल"

पुणे पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांकडून मॉक ड्रिल

दुबई वरून येणाऱ्या विमानाचे अपहरण झाले असून पुणे विमानतळावर विमान उतरवले जाणार अशा प्रकारचे हे मॉक ड्रिल

मॉक ड्रिलसाठी दिल्लीवरून एन एस जी कमांडो पुणे विमानतळावर दाखल होणार

पुणे शहरातील विविध ठिकाणी रात्री सुरू राहणार मॉक ड्रिल

Nagpur : ओबीसींच्या बैठकीला राष्ट्रीय महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी न जाण्याचा घेतला निर्णय.

- ओबीसी महासंघाला आले होते निमंत्रण, पण इतर संघटनांनी आक्षेप घेतल्या नंतर ओबीसी महासंघाने बैठकीला न जाण्याचा घेतला निर्णय

- ओबीसीच्या आरक्षण आणि जीआर बद्दल गैरसमज दूर होणे म्हत्वाचे माझा न जाण्याला विरोध असल्यानं बैठलीला न जाण्याची भूमिका बबनराव तायवाडे यांनी घेतली...

- शासनाने २ सप्टेंबरला काढलेल्या विरोध करणाऱ्या सगळ्या संघटनांना त्यांचे मत मांडण्यासाठी शासनाने बोलावली बैठक

- आम्ही बैठक मागितली नव्हती, शिवाय आमची भुमिका ही वेगळी आहे... ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांची भुमिका

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस; तब्येत बिघडली

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; तब्येत बिघडली

सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशी सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार सतीश सोनी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन साबळे यांना उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, "मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण थांबवणार नाही" असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

KDMC : केडीएमसी आगामी पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या २०२५ सालाच्यासार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी १२२ सदस्य निवडीसाठी ३१ प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचना नुकतीच गेल्या महिन्यात जाहीर झाली होती या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागविण्यात आल्या नंतर विविध राजकीय पक्ष,संघटना व इच्युक उमेदवारांनी सुमारे २६४ हरकती व सूचना दाखल केल्या होत्या या सूचना व हरकती ची सुनावणी ही निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थित निकाली काढून काही सूचना व हरकती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या नंतर आज ३ ऑक्टोबर रोजी पालिकेच्या निवडणूक विभागाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेली प्रारूप प्रभाग रचनेला हिरवा कंदील देत मंजुरी दिल्याने माहिती पालिकेच्या निवडणुकी विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी दिली.

Mumbai Metro : तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

गेल्या अर्ध्या तासापासून अनेक मेट्रो स्थानकातच

मेट्रो २ ए आणि ७ मध्ये तांत्रिक बिघाड

नागपूर जिल्यातील मौदा तालुक्यातील तारसा नदीवरील पुलावर पाणी वाहत असताना दुचाकीचालक पाण्यात पडला

- दुचाकीने⁠ पुलावरून जात असताना गाडीचे संतुलन बिघडल्याने जगदीश इनवते⁠ खालीपडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले

- ⁠तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर आणि ठाणेदार सारीन दुर्गे घटना स्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे.

- क्रमांक MH 31 A S 5305 हे घेऊन निमखेडा कडून तारसा मार्गे नागपूरकडे जात असताना घडली घटना.

सोलापूरच्या चिंचोली MIDC मध्ये कंपनीत आग

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार आहेत. याची आम्ही कल्पना निवडणुक आयोगाला दिली होती. मात्र विधानसभेच्या वेळी याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे हि बोगस मतदारांची नावे वगळली जावीत आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात. मतदार रचनेची तारिख जवळ येत आहे त्यामुळे हि नावं रद्द झाली तरच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू देणार नाही अशा इशारा उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केलाय.

Mumbai: शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई -

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अलिबागमधील आंदोलनासंदर्भात घेतली भेट

Kolhapur: कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात प्रकाश आबिटकर यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

बैठकीत अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

महापालिकेच्या भूखंडावर प्रायव्हेट बिल्डरने बिल्डिंग बांधले आहे याकडे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर अधिकाऱ्यांवर भडकले

हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी याचं उत्तर द्या असं म्हणून त्यांनी विचारला जाब

Buldhana: इटालियन मार्बल घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटला

बुलडाणा -

इटालियन मार्बल घेऊन जाणारा ट्रक उलटला

मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील घटना

नांदुरा तालुक्यातील आंबोडा फाट्यावरील घटना

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळासाठी दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई विमानतळासंदर्भात दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आला

मात्र, काही तांत्रिक कारण असल्याने काहीसा वेळ लागणार असल्याची माहिती

पुढील तीन महिन्यात दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

Kolhapur: कोल्हापुरातील कुख्यात गब्बर गँगवर मोक्का कारवाई

कोल्हापूर -

कोल्हापुरातील कुख्यात गब्बर गँगवर मोक्का कारवाई

गब्बर गॅंग मधील पाच सदस्यांवर मोकातर्गत कारवाई

गेली अनेक वर्ष गब्बर गॅंगची कोल्हापुरात दहशत

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रस्तावाला मंजुरी

Amravati: अमरावतीत पोलिसांची मोठी कारवाई, हरियाणातील कुख्यात चोरांच्या टोळीतील १३ जणांना अटक 

अमरावती -

अमरावतीच्या परतवाडा शहरांमध्ये हरियाणा येथील कुख्यात चोरांची टोळी अटकेत

13 जणांना पोलिसांनी केली अटक

मुंबई पुणे शाखेच्या माहितीवरून अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा व नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतवाडा येथे केले कारवाई

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती..

Latur: लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झाले मोठं नुकसान

लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांने घेतला गळफास

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावातील घटना

मारुती रायकवाडे या 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली

Kalyan: KDMC कचरा उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सुमित कंपनीचा अनागोंदी कारभार

KDMC कचरा उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सुमित कंपनीचा अनागोंदी कारभार

सुमित कंपनीचे कामगार कचरा उचलण्यासाठी मागतात अतिरिक्त पैसे, नागरिकांच्या तक्रारी

माजी उपमहापौर आक्रमक

Pune - ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

पुणे -

७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.

यंदा ७१ व्या वर्षात पदार्पण करणारा ५ दिवसांचा हा महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात १० ते १४ डिसेंबर दरम्यान संपन्न होईल.

महोत्सवाविषयी अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

Buldhana : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी बुलडाण्यात रास्तारोको आंदोलन

सकल धनगर समाज मोताळा तालुक्याच्या वतीने बसस्थानक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

Chandrapur: शेतकऱ्यांना तातडीने  कर्जमाफी द्यावी, खासदार प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन 

शेतकऱ्यांना कर्जमाफी तातडीने द्यावी,

काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आज वरोरा येथे रास्तारोको आंदोलन

राज्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातही शेतकरी संकटात सापडला आहे

या जिल्ह्यात बावीस हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

कापूस आणि सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली.

वरोरा शहरातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील मुख्य चौकात हे आंदोलन करण्यात आले.

Marathi Natak: मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जेष्ठ अभिनेत्री, नाटककार नीना कुलकर्णी यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार ५ नोव्हेंबर रंगभूमिदिनी पुरस्काराच वितरण होणार आहे. तर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्या वतीने गेल्या ५७ वर्षा पासून हा पुरस्कार दिला जातो. विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रोख रुपये, शाल श्रीफक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये पिकाचे नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला झाला सर्पदंश...

आकाश काशीकेदार हे तलाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात धनेगाव येथे पिकांचे नुकसानीबाबत पंचनामे करत होते त्यावेळी घडला प्रकार...

गवतात बसलेल्या सापावर त्यांचा पाय सापावर पडला आणि सापाने केला होता दंश ..

काही वेळाने त्यांना भोवळ येऊ लागल्याने त्यांना लक्षात आले की आपल्याला कशाने तरी चावा घेतला...

भोवळ आल्यावर आकाश कशीकेदार यांना शेतकऱ्यांनी खांद्यावर उचलून घेत पायी धावपळ करीत दवाखान्यात नेले.

नदीतून वाहन जाऊ शकत नसल्याने बंधाऱ्यावरून लोकांनी कसरत करत त्यांना खांद्यावर उचलून आणले....

Malegoan: मालेगावात देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदी पात्रात बेपता

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडेल येथे नदी पात्रात देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदी पात्रात बेपता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे,काल दसऱ्याचा सण साजरा झाल्यानंतर रात्री 1 वाजेच्या सुमारास गौरव महाले व जयेंद्र भदाणे हे दोघे नदी पात्रात देवी मूर्ती बुडवण्यासाठी उतरले असता त्यात गौरव महाले हा वाचला मात्र जयेंद्र याचा शोध लागला नाही,आज त्याला शोधण्यासाठी मालेगावचे पथक प्रयत्न करत आहे,याठिकाणी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Malegaon: मालेगावच्या महात्मा गांधी विद्यामंदिराची 432 कोटींची 21 हेक्टर जमीन शासन जमा

नाशिकच्या मालेगाव मधील शक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हिरे परिवाराला शासनाने दिलेली महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीला अनेक वर्षा पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक कामासाठी 4 वेगळ्या ठिकाणी जमिनी दिल्या होत्या मात्र त्या जमिनी अद्याप तशाच पडून असून शैक्षणिक पूर्तता ना झाल्याने त्या जागा आता शासन दरबारी जमा होणार आहे,राज्यातील अशा प्रकारे शैक्षणिक संस्थेवर होणारी ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे,

शिवकालीन वाघ नख पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, मात्र प्रदर्शनाचा पत्ताच नाही

राज्य शासनाच्या वतीने सातारा, नागपूर नंतर कोल्हापुरात शिवकालीन वाघनख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी सुरू असतानाच शिक्षण विभागाकडून अनेक शाळांना हे प्रदर्शन आजपासून खुलं असल्याचं परिपत्रक काढण्यात आलं होतं.

मात्र प्रदर्शनाचे उद्घाटन अद्यापही न झाल्याने आणि तयारी पूर्ण न झाल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नाराज होऊन या परिसरातून परत शाळेत जावं लागत आहे. विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या शिक्षकांना देखील शासनाचे परिपत्रक न पाठवल्याने शाहू जन्मस्थळ येथे एकच गोंधळ उडाला...

Yewala: येवला तालुक्यात पाऊस उघडला तरी पिके पाण्यात बुडाली, शेतकरी निराश

नाशिकच्या येवला तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे.सध्या पाऊस उघडला असला तरी देखील संपूर्ण पिक पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शेतकरी शिवारात उभा राहून डोळ्यादेखत पिकाची झालेली नासधूस पाहत आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतक

Pimpri Chinchwad: सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ब्लॅक कलर स्प्रे मारून चोरट्याने केली घरफोडी

सीसीटीव्ही कॅमेरावर ब्लॅक कलर स्प्रे मारून चोरट्याने घरफोडी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे नीलख परिसरातील विशाल नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. तीन चोरटे विशाल नगर येथील एका सोसायटीमध्ये प्रवेश करून स्वतःची ओळख लपवण्यासाठी सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा वर ब्लॅक कलर स्प्रे मारून सोसायटीत प्रवेश केला आहे त्यानंतर सोसायटीच्या आतील एका सदनिकेत घरफोडी केली आहे. 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला असून या घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत.

Nashik: नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन

- शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानं नाशिककर आक्रमक

- नाशिक दिंडोरी रस्त्यावर आरटीओ कॉर्नर चौकात नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

- हातात काळे झंडे घेऊन नागरिकांकडून महापालिका प्रशासनाचा निषेध

- मागील काही महिन्यात या परिसरात खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे गेलाय दोघा नागरिकांचा बळी

- आणखी किती बळी घेणार? संतप्त नागरिकांचा पालिका प्रशासनाला सवाल

- खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी, अन्यथा थेट महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा

शिवकालीन वाघ नखं लवकरच कोल्हापुरात तयारी पूर्ण...

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली शिवकालीन वाघ नखं लवकरच कोल्हापुरात दाखल होत आहेत. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ इथं ही वाघ नखं ठेवण्यात येणार असून याची अंतिम तयारी पूर्ण झालेली आहे. शस्त्रधारी पोलीस आणि सीसीटीव्हीची नजर या संपूर्ण परिसरावर असणार आहे.

Gondia: गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने केला घात, 876 शेतकऱ्यांचं नुकसान

गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या 25 ते 28 तारखेदरम्यान झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील 51 गावांमध्ये सुमारे 470 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, 876 शेतकरी बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या क्षेत्रीय स्तरावर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच याबाबतचा अंतिम अहवाल कृषी विभागाकडून सादर केला जाईल. याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात देखील झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले तर जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या शेतात नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या भागातील सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती त्वरित द्यावी, जेणेकरून पंचनामे करून नुकसानभरपाईच्या कार्यवाहीस गती देता येईल......

Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं काम बंद आंदोलन

आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून महापालिकेसमोर घोषणाबाजी

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा

Manmad: मनमाडला सेवानिवृत्त जवानाचे जल्लोषात स्वागत, गावात काढली मिरवणूक

भारतीय सैन्यात 17 वर्षे भारतमातेची सेवा बजावत जन्मभूमीत परतलेल्या सेवानिवृत जवान संदीपआहेर यांचे नाशिकच्या मनमाडमधील माधव नगर भागात जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रारंभी कुटुंबियांनी औक्षण केले.फटाक्यांच्या आतषबाजी व डीजे तालावर उघड्या वाहनातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.नागरिकांनी त्यांना अक्षरश: खांद्यावर घेत नृत्य केले.तर आहेर यांनी यावेळी ठेका धरला. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून परिसरातील नागरिकांनी सेवापूर्तीनिमित्त संदीप आहेर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले.

Kothrud: निलेश घायवळच्या अडचणी वाढणार

निलेश घायवळ याच्यावर पुण्यात अजून एक गुन्हा दाखल होणार,बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळ याचा पाय खोलात

कोथरूड पोलीस निलेश घायवळवर अजून एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत

पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे आणि खोटी माहिती दिल्या प्रकरणी निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलीस करणार कारवाई

बनावट पासपोर्ट बनवल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल अहिल्यानगर येथे जात केली होती छापेमारी

अहिल्यानगर मध्ये तीन ठिकाणी काल पोलिसांनी छापेमारी केलीय.

या छापेमारीनंतर अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता

निलेश घायवळ याने बनावट पासपोर्ट कसा बनवला या संदर्भात पुणे पोलिसांनी पासपोर्ट ऑफिसशी केला होता पत्रव्यवहार

या पत्राचे उत्तर आलं असून यानंतर पुणे पोलीस घायवळ याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत

बनावट पासपोर्ट बनवल्या प्रकरणी पोलीस मदत करणाऱ्यांवर करणार कारवाई..

राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, धक्कादायक आकडेवारी समोर

यूडायस-प्लस’वरील ३० सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणींतील ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. सुमारे आठ हजार शाळांची पटसंख्या दहाच्याही खाली आहे.ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होत असल्याचं प्रमाण चिंताजनक

राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या लाखोंनी वाढेल, असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.

Bhosari: भोसरी MIDC परिसरातील कंपनीत पहाटे लागली भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला आज पहाटे पाच वाजता दरम्यान भीषण आग लागली होती. भोसरी एमआयडीसी परिसरातील जे ब्लॉक 123 समोरील कंपनीला ही आग लागली होती. या आगीत कुणीही दगावला नसला तरी कंपनीतील आतील साहित्य जळून पूर्णपणे जळाल्याने कंपनीचं मोठे नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. शॉर्ट सर्किट मुळे कंपनीला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

Buldhana: बुलढाण्यात 60 फुट उंचीच्या रावनाचे दहन...

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रावण टेकडी परिसरात विजयादशमीनिमित्त रावण दहन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी साठ फूट उंच रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.. दरवर्षी सिंधी समाजाकडून खामगाव शहरातील प्रतिष्ठित्तांना आमंत्रित करून रावण दहन करण्यात येतं.

Nashik: नाशिकमधील विविध भागात टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई

- सार्वजनिक जागेत मद्यपानासाठी बसलेल्या टवाळखोरांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद

- शहरातील गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांकडून राबवली जातेय धडक मोहीम

- पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत १०९ टवाळखोरांवर कारवाई

- मोकळ्या मैदानात मद्यपान करणाऱ्या, ट्रिपल सीट फिरणाऱ्या, टवाळक्या करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Jaykumar Gore: पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी

- रा. स्व. संघाचा ड्रेस परिधान करत, हातात लाठी घेत पथसंचलनात सहभागी

- सोलापुरातील पूर्व भागात झालेल्या पथसंचलनात नोंदवला सहभाग

- मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील सहभाग नोंदवला

- काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच पथसंचलनात सहभाग नोंदवला

Yavatmal: यवतमाळ नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर मोहोर

यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या दहा नगरपालिका तसेच एका नगरपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आलाय. दहा पालिकेत 276 नगरसेवक राहणार असून यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग तर 58 नगरसेवक असणार आहेत.जवळपास चार वर्षापासून पालिकेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी पाहत आहेत,यामुळे निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा भावी नगरसेवकांना होती न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे.

Indapur: माणगाव आणि इंदापूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होईल अशी आशा निर्माण झाली आहे. महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने कामातून माघार घेतल्याने हे काम रखडलं होते परंतु आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होत आहे. बायपासच्या या कामाची तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेनंतर ठेकेदाराची नियुक्ती झाली असून या कामातील अडथळा दूर झाला आहे. मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन आज होत आहे.

Pune: पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ येथे यंदा 30 फुटी रावणाची प्रतिकृती बनवण्यात आली होती.

ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, दहशतवाद अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे.

पुणे शहरातून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रावण दहन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.यावेळी हवेत रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

Pune: पुण्यात मेट्रो प्रवासी संख्येत तुफान वाढ,सप्टेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक

पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.वाहतूक कोंडी, पीएमपी तिकीट दरवाढ व पावसाने नागरिक मेट्रोकडे वळले असून गेल्या चार महिन्यांत प्रवासी संख्या २४ लाखांनी वाढून सप्टेंबरमध्ये ७५ लाखांवर पोहोचली आहे

महामेट्रो’कडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे.

या वर्षी मार्चपासून प्रत्येक महिन्यात मेट्रोचे प्रवासी वाढत असल्याचं चित्र आहे.मात्र, जून महिन्यापासून प्रवासी संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून जूनपासून पाऊस सुरू झाल्यामुळे, तसंच पीएमपी तिकीट दरवाढ व कोंडीमुळे प्रवासी मेट्रोकडे वळल्याचं दिसत आहे.

गणेशोत्सवात प्रवासी संख्येचे अनेक उच्चांक झाल्याचे पाहायला मिळाले.

Aibaug: अलिबाग वडखळ महामार्गाची दुरवस्‍था

अलिबाग वडखळ महामार्गाची पार दुरावस्था झाली आहे. रसत्‍यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाऊस पडलाकी या खड्यांचे मोठमोठे डबकी होतात. अलिबाग हे प्रसिदध पर्यटन स्‍थळ असलेल्या बरोबरच रायगडच जिल्हा मुख्यालय आहे. यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांबरोबरच शासकिय कामांसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी असते. अलिबागकडे येणाऱ्या या रस्‍त्‍यावरील मोठमोठया खड्डयांमुळे येथे येणारे नागरीक, पर्यटकांबरोबरच स्थानिक देखील पुरते बेजार आहेत.

ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरमधील घटना

ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे काल दसऱ्याच्या दिवशी घडली. इरफान इसाक शेख (१७), इम्रान इसाक शेख (वय १३), ड्रौन हयात पठाण (वय ९) व व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक (वय ९, सर्व रा. लिंबे जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मयतांमध्ये दोन सख्खे भाऊ व एक आतेभाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. काल सकाळी इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत त्याचा लहान भाऊ इमरान, मामाचा मुलगा ौन व शेजारील दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश उर्फ गौरव हे असे तिघेही ट्रॅक्टरमध्ये बसून गाव शिवारातील मुरूम उत्खनामुळे तयार झालेल्या खदानीत गेले. दीड दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत, म्हणून मुलांना पाहण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्या ठिकाणी गेले; मात्र तिथे त्यांना कोणीच दिसून आले नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. यावेळी या सर्वांनी शोध घेतला असता एकापाठोपाठ त्यांना तिघांचे मृतदेह हाती लागले तर मोठा इरफान हा तासभर शोध घेतल्यानंतर मिळून आला. तोपर्यंत अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. चारही जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

Pune Municipal Corporation: मुंबईच्या धरतीवर पुणे महानगरपालिकेने केले विकेंद्रीकरण

पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार वाढले मुंबईच्या धरतीवर पुणे महानगरपालिकेने केले विकेंद्रीकरण

अत्यावश्यक सेवांची देखभाल दुरुस्तीचे क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना अधिकार

महापालिकेचे 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यांच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे कामे प्रामुख्याने करण्यात येतात

पाच लाखापेक्षा अधिकची कमी मुख्यालयाकडून होत होते आता तेच अधिकार 25 लाखापर्यंत निविदा काढण्याचे छत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतला आहे

Pune: पुण्यात उंच इमारतींतील अग्निशमन यंत्रणांची तपासणी

पुणे महापालिकेचा निर्णय, उंड्रीतील आगीच्या घटनेनंतर महत्त्वाचे पाऊल

उंड्रीतील मार्वल सोसायटीत झालेल्या आगीच्या दुर्घटनेत इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे

यंत्रणा बंद आढळल्यास संबंधित सोसायटी किंवा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे.

बांधकाम नियमावलीत बदल झाल्याने पुण्यात आता टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. १०० मीटरपेक्षा उंचीच्या सुमारे ३० पेक्षा जास्त इमारती सध्या शहरात उभ्या आहेत.तर भविष्यात १५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीही शहरात पाहायला मिळणार आहेत.

उंच इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना महापालिकेतील 'हाय राइज कमिटी'कडून संपूर्ण अभ्यास करून या प्रस्तावांना मान्यता दिली जाते. या इमारतींची उंची जास्त असल्याने त्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जातात.

Amravati: अमरावतीत कुख्यात गँगने पोलिसांवर हवेत केला गोळीबार

आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगने पोलिसांवर हवेत गोळीबार केल्याची माहिती पुढे येतेय...

अमरावतीच्या परतवाडा येथील भवानी हॉटेल समोरील घटना...

दसऱ्याच्या दिवशीच फारिंगच्या घटनेमुळे शहरात खळबळ...

बस स्टॅन्ड परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचे स्वरूप...

पोलीस व चोरांमध्ये फिल्मीस्टाईल चकमकीनंतर १० जणांना ब्राह्मणसभा भागातून पोलिसांनी घेतले ताब्यात...

मुंबई क्राईम ब्रांच, हरियाणा पोलिसांच्या माहितीवरून नागपूर व अमरावती ग्रामीण पोलिसांकडून कारवाई...

आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू...

Ulhasnagar: उल्हासनगरात सराईत गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न

उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्याना वाचवले. मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Washim: राजधानी मुंबईत शांत पध्दतीने पण ठाम आंदोलन करण्याचा निर्धार; सुनील महाराज

पोहरादेवी येथे दसऱ्यानिमित्त प्रथमच बंजारा समाजाचा दसरा मेळावा घेण्यात आला.यापुढे दरवर्षी असा मेळावा आयोजित व्हावा, अशी समाजबांधवांची एकत्रित हाक.

एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी सर्व धर्मपीठे व समाज संघटना बाबुसिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावेत असा ठराव पारित.

आरक्षणाची लढाई संविधान पद्धतीने आणि कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचे समाजाचे स्पष्ट मत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीत येऊन गेले असून, मुख्यमंत्रीही पाच वेळा येथे आले; त्यामुळे सरकारला आमच्या मागण्यांची जाणीव आहे, असा समाजाचा विश्वास.

Sangli: विट्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा

अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अशा पार पडलेल्या पालखी शर्यतीमध्ये मूळस्थानची पालखीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली.रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पार पडलेल्या शर्यती मध्ये मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली. दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते.

Ratnagiri: रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

रत्नागिरी - रत्नागिरीत सकाळपासून पावसाची हजेरी

रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी तुरळत तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी

चिपळूण ,संगमेश्वर , लांजा , राजापूर आदी भागात पावसाच्या सरी

पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली

कापणी योग्य झालेलं भात पिक पावसामुळे अडचणीत येण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com