Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये पूरस्थितीनंतर भयान अवस्था, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला

महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होते

साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला

स्लॅबखाली काही जण अडकल्याची भीती

घटनास्थळी मदतकार्य सुरू, इमारतीचा स्लॅब नवीनच सुरू असल्याने घडली दुर्घटना

घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल

अतिवृष्टीने राज्यात ३२ लाख हेक्टर बाधित,सर्वाधिक या जिल्ह्याना फटका

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने एकूण २६ जिल्हे बाधित झाले असून यात यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छ. संभाजीनगर, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सांगली, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकूण बाधित तालुके 178 असून सर्वाधिक बाधित जिल्हे अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, नाशिक परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आहे.या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार 32 लाख 34 हजार 238 हेक्टर एवढं नुकसान झालं असून तर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भुईमुग, ऊस, कांदा, भात, नाचणी, आजीपाला, फळपिके ही पिके बाधित झाले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यात ५ लाख ७८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे,बीड जिल्ह्यात ५लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे तर जालन्यात ३ लाख ७५ हजार ९७३ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यात ३लाख ८६ हजार ९३१ हेक्टर क्षेत्र,यवतमाळ जिल्ह्यात १३७५६८ हेक्टर क्षेत्र,नाशिक जिल्ह्यात २७९२२० हेक्टर क्षेत्र,संभाजीनगर येथे १६६२२६ हेक्टर क्षेत्र,परभणी जिल्ह्यात २१०३१४ हेक्टर क्षेत्र,धाराशिव जिल्ह्यात १८१२०० हेक्टर क्षेत्र असे एकूण २७ जिल्हे बाधित झाले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यातील झेंडू शेतीचं अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे सोयाबीन,कापूस,तूर,उडीद, मूग या पिकासह झेंडू शेतीचं सुद्धा होत्याचं नव्हतं केलय...झेंडू फुलांना दसरा आणि दिवाळीला मोठ्या शहरात प्रचंड मागणी असते. मात्र या वर्षी झेंडूच्या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. अतिवृष्टीच्या पाण्यामुळे झेंडूची झाडं पूर्णपणे आडवी झाली आहेत. तर अतिपावसामुळे फुल सुद्धा सडली आहेत. त्यामळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुले निघणार नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आम्ही पारंपारिक पीकाला फाटा देऊन झेंडू ची शेती केली मात्र सततच्या पावसानं आमच्या झेंडू च्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.या झेंडू शेतीवर केलेला उत्पादन खर्च ही वसूल होणार नाही.या साठी राज्य सरकारनं आमच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.

NAVI MUMBAI | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'डीजीसीए'चा परवाना

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून 'एरोड्रोम' परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे.

MUMBAI | बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा उघड!

बोरिवली स्टेशनवर झालेल्या तब्बल ४.५ लाख रुपयांच्या फिल्मी स्टाईल दरोड्याचा बोरिवली जीआरपीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून जीआरपी ने त्यांच्याकडून.२.८५ लाख रुपये जप्त केले आहेत.अहमद शेख (३२), मंगलराज राय (२८), तानाजी माने (३०), राजू शेख (२६), कृष्णा कानजोडकर (४०) आणि सुरेश कुलकर्णी (५६)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. हे सर्व आरोपी मुंबई आणि ठाणे परिसरातील असून, त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

उल्हासनगर कॅप नंबर पाच परिसरातील महादेव सेल्स या दुकानाच्या गोडाऊनला रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली , या आगीत गोडाऊन मधील चादरी, टॉवेल आणि कपडे जळून खाक झाले , अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या , अखेर अग्निशमन दलाच्या जवांनाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता, गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावरील सर्व साहित्य जळून खाक झालं , मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने आजूबाजूच्या दुकानांना झळ पोहचली नाही, मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकता नाही

ताडोबाच्या प्रवेशाला खासदारांची आडकाठी

पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला. मात्र वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आजचा प्रारंभ वादग्रस्त ठरला. खासदार धानोरकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्या आज पहाटेच मोहर्ली प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांसह दाखल झाल्या असून, एकही पर्यटक जिप्सी प्रकल्पात जाण्यास त्यांनी विरोध सुरू केलाय. त्यामुळे आताची पहिली सफारी खोळंबली आहे. पर्यटक गेटवर सफरीसाठी थांबून आहेत. जोपर्यंत दर मागे घेतले जात नाहीत आणि समाधानकारक तोडगा निघत नाही, तोवर एकही जिप्सी आतमध्ये जाऊ देणार नाही, अशी भूमिका खासदार धानोरकर यांनी घेतल्याने पहिल्याच दिवशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या अधिकारी आणि खासदार यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापनाने आधीच प्रवेशाचा मुहूर्त साधत पूजा आटोपून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com