Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५, मुंबईसह महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

BULDHANA - वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा...

बुलढाणा - समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार, बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे..  भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.. ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे...

SOLAPUR - दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना 

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना,शेतांना प्राप्त झाले तळ्याचे स्वरूप 

हातातोंडांशी आलेल खरीप पिक पूर्णतः गेलं पाण्याखाली,त्यामुळे शेतकऱ्याच अतोनात नुकसान 

उडीद,तूर,सोयाबीन,मूग सततच्या पावसामुळे पाण्याखाली असल्याने पिक लागले सडायला,शेतात साचले गुडगाभर पाणी 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप,निंबर्गी,कंदलगाव,तिऱ्हे,पाथरी,पा कणी,तेरामैल, परिसरातील शेतकऱ्यांना बसला फटका 

त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय 

BULDHANA - वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा...

बुलढाणा - समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार, बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे..  भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.. ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे...

DHARASHIV - लोहारा तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; नुकसानभरपाईची मागणी

धाराशिव च्या लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हवालदिल झाले असून यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.याबाबत शेतकऱ्यांनी लोहारा तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केलीय.सततच्या पावसामुळे मुग,उडीद ही कडधान्ये कुजून जमिनीवर टेकली आहेत.तुरीची वाढ खुंटून उबळून रानावरच जळत आहे.सोयाबीनच्या शेंगा गळून पडत असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.सद्यस्थिती ओला दुष्काळसदृश्य निर्माण झाली आहे. नगदी पिके हातची जात असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाला काहीही भाव मिळत नाही.शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी,शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी तसेच १०० टक्के पिक विमा मंजूर करून दिलासा द्यावा अशी केली जात आहे.

DHULE | अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

साक्री तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावर सुरपान गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली, माहिती मिळताच वनविभागाची टीम वैद्यकीय टीम सह घटनास्थळी दाखल झाली, व अपघातग्रस्त मादी बिबट्याची तपासणी केली असता मादी बिबट्या मृत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले,

BULDHANA - टाकळी पंच या गावाचा पातुर्डा गावाशी संपर्क तुटला

बुलढाणा  - संग्रामपूर तालुक्यातील टाकळी पंच रसत्यावर मोरवाच्या नाल्यावरिल् पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नदीला पूर येतो त्यामुळे रूग्ण, विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे..... आजही या नदीला पूर आल्याने पातूरडा या गावशी तीन गावांचा संपर्क तुटला आहे .. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे... टाकळी पंच ग्रामस्थांची मोरवाच्या पुलाची उंचीची उपेक्षा कायम असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजे आहे...

jalgaon News : वाघूर'ची 'शंभरी' अन् जळगावकर सुखावला नागरिकांची पावले धरणाकडे शहराची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली

जळगाव जामनेरातील वाघूर मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरला आहे. वाघूरची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. हा प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरला आहे. वाघूरच्या जलसाठ्याने जळगावकर सुखावले असून, शहराची पुढील दोन वर्षांची चिंतामिटली आहे.वाघूरमधून जळगाव, जामनेर शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच लहान उद्योग व भुसावळ, जळगाव तालुक्यातील रब्बीसही त्यातून पाणी दिले जाते. वाघूर नदीला चांगला पूर आला आहे. मागील दोन-तीन दिवस अजिंठा डोंगररांगा, सातमाळा भागात जोरदार पाऊस झाला आहे. वाघूरमध्ये मागील आठवड्यात सुमारे ६१ टक्के जलसाठा होता. तो दोन दिवसांत ९० टक्क्यांवर पोचला.वाघूर धरण १०० टक्के भरले.

hingoli Live News Update:  हिंगोलीत बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी एसटीची तोडफोड करत चालकाला केली मारहाण

हिंगोलीत एसटी बसच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे लिंबाळा एमआयडीसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करत चालकाला बेदम मारहाण केली आहे हिंगोली आगाराची ही बस आहे औंढा नागनाथ येथून हिंगोली कडे येत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी बस चालकाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून अपघातात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे

Maharashtra Live News Update:  नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रायगडच्या पेणमध्ये साकारल्या जात आहेत देवींच्या मुर्ती

गणपतीचे गाव असलेल्या पेणमध्ये गणेशोत्सवानंतर आता देवींच्या मुर्ती साकारल्या जात आहेत. सर्वांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक गरबा मंडळ देवींच्या मुर्तीची स्थापना करतात. या देवींच्या मुर्तींना पेणमधील कार्यशाळांमध्ये रंगकाम आणि सजावटीचा शेवटचा हात मारला जात असून रंगांबरोबर खरी साडी, दागीन्यांचा साज मुर्तींच्या सजावटीसाठी वापरला जात आहे. भक्तांच्या मागणी प्रमाणे आष्टभुजा, वाघजाई, महाकाली, म्हैशासुर मर्दिनी देवीच्या या मुळ रूपासह कोंबडा, हत्ती, राजसिंहासनावर बसलेल्या देवीसह अनेक रूपातील देवींच्या मुर्तींची मागणी आहे. 10 ते 12 फुट उंचीच्या या मुर्ती बनवल्या जात असून कोकण, मुंबई, पुणे, सातारा, सांगली आदी सर्व महाराष्ट्रात पेणमधून पुढील दोन तीन दिवसात मुर्ती रवाना होणार आहेत.

jalna Live News Update:  जालना जिल्ह्यात पावसाचा कहर, जालन्यात अतिवृष्टीचा तब्बल 93 हजार हेक्टरवरील पिकांना फटका....

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल 93 हजार 793 हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यामध्ये झालय.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात हि आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जालना जिल्ह्यातील 93 हजार 793 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीन , मूग या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे..

pune Live News Update:  श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ. भाविकांना झाला आनंद. दिवसभरात मारणार सात फेऱ्या...

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू नगरीपासून त्यांच्या तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा डोंगरापर्यंत आता भाविकांसाठी थेट बससेवा उपलब्ध झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) सुरू केलेल्या या बससेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

buldhana Live News Update:  मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण - बुलढाण्यात शिवसेनेचे निषेध आंदोलन, राज्यपालांकडे निवेदन

दादर येथे दिवंगत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले व घोषणाबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

यावेळी शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी सांगितले की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अपमान आहे. अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.”

dharashiv Live News Update:  धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 198 कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठवली

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 198 कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती.आता स्थगिती उठवण्यात आली असुन या संदर्भात लवकरच परिपञक जारी होईल अशी माहीती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलीय.जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती.त्या संदर्भात मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील व आणि माझ्यात बैठत पार पडली असुन स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टरांची संघटनांचा आज राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

राज्य सरकारने राज्यातील सी सी एम पी हा आधुनिक वैद्यक शास्त्रातील एक वर्षाचा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदणी बुकात करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा ऍलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करू शकणार आहेत. याला विरोध म्हणून राज्यातील ऍलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन व संलग्नित संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याला अनुसरून आज राज्यातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालय बंद असणार आहेत. यात बाह्य रुग्णसेवा शस्त्रक्रिया बंद असणार आहेत. यामुळे मात्र राज्यातील रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या 24 तासाच्या संपात आकस्मित सेवा वगळण्यात आली आहे. राज्यातील जवळपास दीड लाख ऍलोपॅथी डॉक्टर एक दिवसाच्या संपावर जाणार असल्याने याचा मोठा परिणाम मात्र आज दिवसभर दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com