काय ते खड्डे, काय ते पाणी, काय तो चिखल; डोंबिवलीच्या भोपर रस्त्याची अशीच स्थिती!

डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
Dombivli News Marathi, Dombivli Rain News Today, Kalyan Dombivli Latest News
Dombivli News Marathi, Dombivli Rain News Today, Kalyan Dombivli Latest NewsSaam TV

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) मधील रस्ता पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आहे. तर कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यावर (Road) काय ते पाणी, काय खड्डे, काय तो चिखल, मात्र केडीएमसी अधिकारी आणि ठेकेदार ओके मध्ये आहेत, अशीच परिस्थिती झाली आहे. (Dombivli News Marathi)

Dombivli News Marathi, Dombivli Rain News Today, Kalyan Dombivli Latest News
दुर्देवी घटना! व्हिडिओ शुट करताना अचानक लाट आली, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

पावसाला आता कुठे सुरवात झाली नाही तोच डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 27 गावांत अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या कामासाठी हा भोपरचा अर्धा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. (Kalyan Dombivli Latest News)

गेल्या महिन्यात कंत्राटदाराने या रस्त्याचे डांबरीकरण केले. परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. भोपर कमान ते शनी मंदिर पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हा रस्ता उतारावर असल्याने रस्त्यावरुन पावसाचे पाणी वहात असते. गतीरोधकांमुळे पावसाचे पाणी साचत असून हे पावसाचे पाणी जाण्यासाठी चक्क गतीरोधकच खोदून पावसाच्या पाण्यास वाट काढून देण्यात आली आहे.

Dombivli News Marathi, Dombivli Rain News Today, Kalyan Dombivli Latest News
'आपल्या लोकांचा आवाज...'; मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या खासदारांच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.

रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोलन करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com