जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वैजापूर (ता.चोपडा) गावातील तरूण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आंबा अवतार येथे आयोजित कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गाडीने निघाले होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील हद्दीत प्रवेश केल्यानंतर वळण रस्त्यावर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने तीन ते चार पलटी मारल्या. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गाडीतील तीन तरूणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर, चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
जळगावात उपचारासाठी दाखल
गाडी तीन वेळेस पलटी झाल्यामुळे निलेश शांतीवाल बारेला, जगदिश बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा जळगाव येथे उपचारासाठी घेवून जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघात एकूण तीन जण मयत झाले आहेत. तर दोन जबर जखमी आहेत. त्यातील राहुल संजय बारेला याला जळगाव येथील न्युकलेस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तर विवेक बारेला याला गोदावरी टॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले आहे. तसेच परशुराम नाश्या बारेला, दिलिप बारेला राहूल सरदार बारेला या तिघांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.