राज्यातील २६ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट
पुढील काही दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
ऑक्टोबर हिटनंतर पावसाच्या उघडीपमुळे काहीसा दिलासा
राज्यातुन मान्सून माघारी गेला असून पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. आज मुंबईसह २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज मुंबई शहर,मुंबई उपनगर , ठाणे,रायगड, पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक , अहिल्यानगर , पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड,परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट मुळे दुपारच्या वेळेस बाहेर पडणं नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. मात्र पावसाच्या उघडीपमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. तर काल कोकणासह, मुंबईत पावसाने हजेरी लावली.
दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस महत्त्वाचे असून पावसाची उघडीप सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने नागरिकांच्या आनंदावर विरझन पडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.