शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचा आत्मदहनाचा इशारा

कर्जतचे आमदारासह दोन विधानपरिषद सदस्यकडून खरेदी; लाड यांचा पत्रकार परिषदेत आरोप
शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचा आत्मदहनाचा इशारा
शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचा आत्मदहनाचा इशाराSaam Tv

मुंबई - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे नंदनपाडा, गोहे आणि गोठवली येथील साडे तीनशे एकर औद्योगिक कारणांसाठी घेतलेली जमीन न्यूमिलेनियम कंपनीने कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे याचे नातेवाईक, दोन विधान परिषद सदस्य, शासनात सचिव या पदावर असलेल्या व्यक्तींना विकल्या असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या सत्ताधारी पक्षातील माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शासन आणि प्रशासनाने कंपनीला दिलेली खरेदी ऑर्डर रद्द करावी अन्यथा 23 डिसेंबर रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मी सुद्धा आत्मदहन करणार असल्याचा इशाराही सुरेश लाड यांनी दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील माजी आमदार यांनी केलेल्या आत्मदहन इशाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सुरेश लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दत्ता ढवळे यावेळी उपस्थित होते.

हे देखील पहा -

खालापूर तालुक्यातील मौजे नंदनपाडा, गोहे आणि गोठीवली या परिसरात 63/1/अ अन्वये औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. न्यूमिलेनियम कंपनीने 2020 साली या गावातील 90 शेतकऱ्याकडून साडे तीनशे एकर जमीन औद्योगिक कारणांसाठी खरेदी केली. शेतकरी यांच्याकडून जमीन खरेदी केली असताना अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला कंपनीने दिलेला नाही. उलटपक्षी कंपनीने प्रशासनाकडे कोरोना आणि मंदी असल्याने जमीन इतरांना विकण्यासाठी परवानगी मागितली होती आणि प्रशासनानेही परवानगी दिली आहे. त्यानुसार कंपनीने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे याचे नातेवाईक, दोन विधानपरिषद आमदार, सचिव यांना ही जमीन विकली असल्याचे सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचा आत्मदहनाचा इशारा
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात

63/1/अ अन्वये जमीन ही कंपनीसाठी वापरायची असताना कंपनी ही परस्पर विक्री व्यवहार करीत असून अधिकारीही यामध्ये सामील झाले असून शेतकऱ्यांची बाजू कोणीच ऐकून घेत  असल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे. कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले धनादेशही मुदतीत खात्यात वटलेले नाहीत. त्यामुळे त्या जमिनी शेतकऱ्याच्या नावे कराव्यात अशी मागणी गेले वर्षभर शेतकरी करीत आहेत. कंपनीने शासनाकडे 3 कोटी 52 हजार रुपये जमा करणेही शिल्लक आहेत. मात्र याकडे जाणूनबुजून शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी 30 नोव्हेंबर रोजी उपोषणाला बसले असता तहसीलदारांनी कारवाहीचे लेखी आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 23 डिसेंबर रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मी सुद्धा आत्मदहन करणार असल्याचे लाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com