केंद्रीय मंत्रिमंडळासाठी नारायण राणे यांच्याच नावाची चर्चा

2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळासाठी नारायण राणे यांच्याच नावाची चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळासाठी नारायण राणे यांच्याच नावाची चर्चा Saam tv

मुबंई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. 2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बऱ्याच तरुणांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही नेत्यांची सुट्टी होणार असल्याचेही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाची नजर आज संध्याकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारांकडे लागली आहे. यात विशेष बाब म्हणजे मंत्रीमंडळ विस्तारासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. (Discussion of Narayan Rane's name for the Union Cabinet)

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे(Narayan Rane), हीना गावित (Heena Gavit), प्रीतम मुंडे यांच्या नावांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे सध्या भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारासाठी नारायण राणे, कपिल पाटील , भागवत कराड , भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी, पुरषोत्तम रुपाला, अनुराग ठाकूर, शोभा करंजळे, पशुपती पारस, अजय भट्ट, अनुप्रिया पटेल, भारती पवार आदि नेते पंतप्रधान निवास स्थानी दाखल झाले आहेत.

भाजपाच्या नारायण राणे यांचीच निवड का ?

१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या नऊ महिन्यांच्या काळात नारायण राणे शिवसेना आणि भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र कॉंग्रेसमध्येही त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून नारायण राणे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान' (Maharashtra Swabhiman) पक्षाची स्थापना केली.

महाराष्ट्रातील वजनदार नेते म्हणूल नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, उत्तम संघटन कौशल्य, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नारायण राणे यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा प्रभाव आहे. 1985 मध्ये त्यांनी शिवसेनच्या टिकीटावरुन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

केंद्रीय मंत्रिमंडळासाठी नारायण राणे यांच्याच नावाची चर्चा
निलगाय खाऊन बिबट्याचाही मृत्यू

1999 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मनोहर जोशी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्याकडे महसूल खाते, दुग्धविकास, पशू संवर्धन आशा विविध खात्यांचा कारभार होता. त्यानंतर शिवसेनेचा खंदा, अभ्यासू, आक्रमक आणि कष्टाळू नेते असलेल्या नारायण राणे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मात्र केवळ आठ महिनेच नारायण राणे मुख्यमंत्री पदावर राहिले. राज्यातील 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली.

दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने ही रणनीती आखलेली दिसत आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री असून विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या 81 वर जाऊ शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळासाठी नारायण राणे यांच्याच नावाची चर्चा
साेलापूरकरांना दिलासा; काेराेना बाधितांचा मृत्यूदर खालवला

त्यानंतर गेल्या 15-16 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस, आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, मात्र त्यांना अद्यापही मुख्यमंत्री पद मिळालेले नाही. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी बोलावणे आल्यामुळे सध्या भाजपात आनंदाचे वातावरण आहे. आता त्यांना कोणत्या खात्याचा कारभार दिला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com