
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधवांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केलाय.. विधीमंडळात सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी सत्ताधारी आमदार थेट विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील कर्मचाऱ्याला लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे हवेत, असं विचारत असल्याचा आरोप केला आणि विधानसभेत एकच खळबळ उडाली.
तर सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अजित पवारांनी भास्कर जाधवांना हातच जोडले... एवढंच नाही तर भास्कर जाधवांनी तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाईचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय.. तर भास्कर जाधवांकडून ही अपेक्षा नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय. सभागृहाची प्रतिष्ठा राखून हे वक्तव्य रेकॉर्डवरुन काढावं, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणलं आहे.
भास्कर जाधव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधवांनी केलेला आरोप पहिल्यांदा झालेला नाही.. तर याआधीही भाजप आमदार परिणय फुकेंनी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी एजेंटगिरी सुरु असल्याचा आरोप केला होता.
महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी असते. मात्र भास्कर जाधवांनी आरोप केल्याप्रमाण या लक्षवेधीसाठी भ्रष्टाचार होत असेल..जनतेन निवडून दिलेला आमदारच जर लक्षवेधीसाठी पैसे देणार असेल तर हा कायदेमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रकार आहे. विधीमंडळातच असे प्रकार होत असतील तर याची निष्पक्ष चौकशी होणार का? कायदेमंडळाची ढासळणारी प्रतिष्ठा कशी रोखणार? हे पाहण महत्वाचं....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.