कॉंग्रेसची स्वबळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

भाजपा नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करते.
कॉंग्रेसची स्वबळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
कॉंग्रेसची स्वबळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस म्हणाले..saam tv
Published On

पुणे - राज्यात सध्या स्वबळावर निवडणुक लढण्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र गेल्या आठवड्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. काल त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

भाजपा नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करते. आमचे हित जनतेशी जोडलेले आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष आहेत. त्यांनी कोणाशी युती करायची हा त्यांचा निर्णय आहे. महाराष्ट्रात पाच वर्षांसाठी महाविकास आघाडीचे युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र ही युती कायम स्वरूपी युती करण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याशी घोषणा केली. मात्र यावरून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमधील मतभेद वाढत चालले असल्याचे दिसत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा पुढील निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसची स्वबळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
अजित पवारांच्या उपस्थितीतच भाऊगर्दी; १५० जणांवर गुन्हा

दरम्यान, शिवसेनेच्या पक्ष स्थापना दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. ''कोरोना काळात एकहाती सत्ता मिळवण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील. तसेच, सर्व पक्षांनी आपली महत्वाकांक्षा बाजूला ठेवून अर्थव्यवस्था व आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिवसेनेच्या 55 व्या स्थापना दिनी उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका व्यक्त केली. तर दुसरीकडे, ''शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे राज्यात युतीचे सरकार आहे. या तीनही पक्षांनी एकत्र राहण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र जर काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरकलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, आता महाविकास आघाडी पक्षात सुरू असलेल्या या गोंधळाचा भाजपा कसा फायदा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com