
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून एका शेतकरी महिलेनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ही घटना घडली. आशाबाई गोविंद हरणकाळ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. (Breaking Marathi News)
खरीप हंगामात अतिवृष्टी तर रब्बीत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
राज्यात गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीसह मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातही अवकाळीने शेतीपीकांचं मोठं नुकसान केलं आहे.
अशातच कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील महिला शेतकरी आशाबाई यांनी मुलाच्या नावावर उसनवारी करत सोसायटीचे कर्ज घेतले होते. मागील खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले होते.
रब्बीतील पिकांनाही गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला. आता हे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. याच विवंचनेतून त्यांनी विहिरीत उडी घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.