बुलढाणा : मुंबईवरून अकोलाकडे जात असलेल्या कारचा भीषण अपघात झाला. धावत्या कारमध्ये अचानक स्फोट होऊन कारने पेट घेतला. यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर निघता न आल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील टोलनाक्यापासून ५०० मीटर अंतरावरच आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गाने सदर कार मुंबईतहुन अकोल्याच्या दिशेने जात होती. नागपूर कॅरिडोरवर चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मिडीयममधील क्रॅश बॅरिअरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कार च्या समोरील भागातून घुसून आरपार निघाली. यानंतर कारने तात्काळ पेट घेतला.
बहिणीच्या घरी जाताना अपघात
या अपघातात अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२, दोन्ही रा. मुंबई) यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. तर चालक अभिजीत हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर तात्काळ महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ सदर जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले.
अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे. अपघात घडला त्यावेळी समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीम व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या अवस्थेत कारमधून बाहेर काढले. सदर ठिकाणी तात्काळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे मनीषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.