
बीड : बीडमध्ये एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला. अपघात घडल्याचं समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला.
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअपमधून जायला निघाला होता. मात्र, धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. या पिकअपमध्ये साधारण १८ ते २० महिला होत्या. वाहन उलटल्याने ते रस्त्याच्या कडेला उलटलं. या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण होतं. पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचं समोरील टायर फुटल्याचं सांगितलं जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.