अचलपूरातील परिस्थिती नियंत्रणात : पोलिस अधीक्षक अविनाश बारगड

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक अविनाश बारगड यांनी केले आहे.
achalpur
achalpur
Published On

अमरावती : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात हिंसाचार झाला. भाजप महिला जिल्ह्याध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ग्रामीण परिसर बंदच आवाहन केले होते. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी या करिता परतवाडा अचलपूर, मोर्शी परिसरात मध्यरात्रीपासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. achalpur amravati avinash bargad maharashtra tripura incident latest news

achalpur
'भागवतांनी माेर्चाचे नेतृत्व करावे, माेदी, शहांना जाब विचारावा'

ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचा शोध पोलिसांनी घेऊन त्याच्यांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचे पथक मुख्य ठिकाणी तैनात असल्याची माहिती अमरावतीचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमातून पाठविल्या जाणा-या पाेस्ट या खात्री केल्याशिवाय त्यावर चर्चा करु नये. कोणतीही चुकीची पोस्ट शेअर हाेणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवान पाेलिस अधीक्षक बारगड यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com