नवनीत कुमार तापडिया, औरंगाबाद
औरंगाबाद: एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण (Kidnap) झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली होती. अपहरणकर्त्यांनी काल, शनिवारी एमआयडीसीच्या एका सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अगदी सात तासांमध्ये या अपहरणाचा छडा लावला आणि अपहरण झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सुटका करुन सिनेस्टाईलने गुन्हेगारांना अटक केली आहे. (Aurangabad Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- जालना महामार्गावरील छत्रपती संभाजी साखर कारखान्या जवळील इब्राहिमपूर शिवारातून या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. विश्वनाथ लक्ष्मण राजाळे असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 3 कोटी 80 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या अपहरणकर्त्यांनी काल, शनिवारी दुपारी चाकूचा धाक दाखवून राजाळे यांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या सात तासांत या प्रकरणाचा छडा लावला.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जालना जिल्ह्यातील बदनापूरजवळून या अधिकाऱ्याची सिनेस्टाईल सुटका केली. या अपहरणाचा मास्टरमाईंड हा अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचा सालगडी आणि त्याचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.