Ajit Pawar News: बाळासाहेबांच्या विचाराने चालताय मग...अजित पवारांचा CM शिंदेंना रोखठोक सवाल

औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्याच्या वृत्तानंतर अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest News SAAM TV

मोबिन खान

अकोले/अहमदनगर: औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. या निर्णयाला राज्यातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली, असा थेट सवाल पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. (Ajit Pawar-Eknath Shinde Latets News in Marathi)

Ajit Pawar Latest News
फडणवीस हे एकनाथ शिंदेंना लिहून देतात अन् बोलायला लावतात; शिवसेना नेत्यांची टीका

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं, माझं सरकार आल्यावर मी औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर नामकरण करेल, मग आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. अकोले येथे आज अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी पवार आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Ajit Pawar Latest News
ताे सर्वस्वी निर्णय उद्धवजींचा ! एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारानं व्यक्त केली भावना

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मतभेद आहेत का? यावर पवार म्हणाले, की यापूर्वीही शिवसेनेने यूपीएच्या प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना (Shivsena) हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून, मातोश्रीचा निर्णय आहे.

राज्याला इतके दिवस मंत्रिमंडळापासून पूर्ण बहुमत असताना वंचित ठेवणे बरोबर नाही. लवकर मंत्रिमंडळ नेमण्यात येत नाही. पालकमंत्री नेमले गेले नाहीत. उद्या मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतच असतात. मतमतांतरे असतात, म्हणजे आम्ही एकमेकांचे दुश्मन नसतो. आपल्या महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे, असेही पवार म्हणाले. राज ठाकरेंचं मागील कालावधीत ऑपरेशन झालं. म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले असावेत, असे भाष्य अजित पवार यांनी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत केलं.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com