अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Ajit Pawar Hints At Farm Loan Waiver: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का? अजित पवार आणि बावणकुळे यांनी कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
Summary

महायुतीने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला.

अजित पवार आणि बावणकुळे यांनी सकारात्मक संकेत दिले.

शेतकरी आता सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीने आपल्या जाहिरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. मात्र सरकार आल्यानंतर या आश्वासनाला केराची टोपली दिल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला अनेकदा कोंडीत देखील पकडले होते. आता यानंतर सरकार हळूहळू सकारात्मक होताना दिसत आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मोठे आंदोलन केले होते. विरोधकांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारनेही दखल घ्यायला सुरुवात केली आहे. आज पत्रकारांनी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे आणि अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारले असता या दोघांनीही कर्जमाफी करणार असल्याचे संकेत दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com