Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, राज-उद्धव मनपा युती, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

पुण्याच्या पाणी वाटपच्या नियोजनावर एक समिती गठीत

जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा असणार समावेश

पुणे शहरातील पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती करणार प्रयत्न

पुण्याच्या पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्या वाद पाहायला मिळतोय

मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलते अस जलंसपदा विभागाच म्हणणं आहे

मात्र आता दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची तयार केली कृती समिती

शहरातील पाण्याच्या वापरावर समिती ठेवणार लक्ष

"अण्णा" आता तरी उठा! पुण्यात अण्णा हजारे यांना फ्लेक्सच्या माध्यमातून पुणेरी टोमणे

पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आवाहन करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, "अण्णा आतातरी उठा.

देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना.

अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?" असा मजकूर या फ्लेक्सवर लावण्यात आला आहे.

"अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे", असं आवाहन सुद्धा या फ्लेक्सचा माध्यमातून करण्यात आलं आहे.

पुण्याच्या पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

पश्चिम विदर्भात पावसाचा कहर! अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिके बाधित

एकट्या अमरावती जिल्ह्यात सात हजार हेक्टर पिके बाधित. कपाशीच्या शेतात गुडघाभर साचले पाणी...

जवळपास साडेचारशे पेक्षा अधिक घरांची पडझड; नदी नाल्यांना पूर, शेतांचे झाले तलाव...

अमरावती जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन ,तूर आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान...

चांदूर बाजार तालुक्यात आणि तिवसा तालुक्यातील अनेक गावात शिरले पुराचे पाणी...

सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार आणि तिवसा तालुक्यात...

बेरजेचे राजकारण करा, वजाबाकीचे राजकारण करू नका - उपमुख्यमंत्री अजित पवार

बेरजेचे राजकारण करा वजाबाकीचे राजकारण करू नका,आणि जातीवाद कधी होता कामा नये, अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठीचा सल्ला दिला आहे,सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

पक्ष वाढीच्या दृष्टीने यापुढे आपण मुंबईत तीन दिवस आणि चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून बीडमधून त्याची सुरुवात देखील आपण केली आहे.

त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं, वजाबाकी करू नये माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता काम नये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवण लक्ष्यात घेऊन पुढे गेले पाहिजे, असं मत देखील मुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

Nanded: नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम

कयाधू नदीला पूर आल्याने नांदेडच्या हदगाव तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला.

कयाधू नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

हदगाव तालुक्यातील धानोरा येथील पुलावरून गया दोन नदीचे पाणी.

पूल बंद असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला.

हदगाव तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान.

Latur: लातूर शहराला पाणीपुरवठा करणार मांजरा धरण 95 टक्के भरलं

लातूर शहरासह, अंबाजोगाई कळंब, या प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण 95 टक्के भरले आहे .

दरम्यान धरणाचे चार दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करून देतोय.

मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला.

दरम्यान पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरण भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे,

Ajit Pawar: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्डे तात्पुरता डाग डीजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल ते नवीन बस स्थानकपर्यंत असलेला हा 100 मीटरचा रस्ता या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून 500 हून अधिक खड्डे या रस्त्यावर पडले होते या संदर्भात महापालिकेकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याच रस्त्यावरून ते जाणार असल्याने महापालिका ही ॲक्शन मोडवर आल्याचा पाहायला मिळत आहे

धाराशिव च्या वाशी तालुक्यातील घोडकी शिवारात सोयाबीन शेती पाण्याखाली, कृषीमंत्र्यांनी केली पाहणी

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी परीसरात मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.

सोयाबीन शेतात अक्षरशः पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.

यातच काल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतीची पाहणी केली व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले माञ केवळ पंचनामे नको तर तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीर विक्री वर औषध विक्रेत्या संघटनांकडून बंदी घालण्याची मागणी

पुण्‍यासह अखिल भारतीय औषध विक्रेत्‍या संघटनांनी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीबाबत सरकारला गंभीर इशारा

संघटनेने ‘१० मिनिटांत औषध वितरण’ करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्‍यांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी केली आहे

या मागणीला पुणे केमिस्‍ट असोसिएशन ने देखील दिला पाठिंबा

औषधे नेमकी कोठून येतात, ते योग्‍य तापमानात ठेवलेली असतात का याबाबतही शंका उपस्थित केल्‍या जात आहेत

Amravati: अमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर

अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..

मॅरेथॉन स्पर्धेत अमरावती शहर पोलीस दलातील अधिकारी आणि शेकडो कर्मचारी सहभागी..

पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दाखवली मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी..

यापूर्वीही सायकल रॅली काढून केली होती जनजागृती.

अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावरून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले

जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटले असून ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर अडकल्याने मोठा अपघात टळला आहे. मांजराज पार्क जवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ही घटना घडली असून सुदैवाने अनियंत्रित झालेला ट्रक दुभाजकाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम - परंडा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिके पाण्याखाली त्वरीत पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे चांदणी धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतात पाणी येऊन शेती पिकांचे मोठ नुकसान

मिरची, कापूस ही पिके पाण्यात असून उडीद व मुगाची ही मोठ नुकसान

त्वरित पंचनामे करून शासनाने मदत देण्याची मागणी

परंडा तालुक्यातील सिरसाव येथील शेतकरी महिला गवले यांनी केली मागणी

भंडाऱ्यात वीज कोसळून पशुपालकाचा मृत्यू

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यात लाखांदूर तालुक्यातील चपराळ पहाडीजवळ पाळीव बकऱ्या आणि गुरे चराई करणाऱ्या पशुपालकाच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला. मनोहर कुंभले (६८) असं मृत पशुपालकाचं नावं आहे. अचानक आलेल्या या पावसानं जनजिवन विस्कळीत झालं असलं तरी शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला आहे.

मालेगाव मध्ये उत्सहात दहीहंडी साजरी

नाशिकच्या मालेगाव मध्ये दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.भाजापा युवा संघटक देवा पाटील यांच्या देवाची मानाची दहीहंडी मोठ्या जल्लोषात दरवर्षी प्रमाणे यंदाही साजरी करण्यात आली.या दहीहंडी उत्सवात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.विश्वबंधू प्रतिष्ठाण च्या कार्यकत्यांनी सहा थर लावत दही हंडी फोडत जल्लोष केला.मालेगाव शहरात यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी ३० पेक्षा जास्त ठिकाणी दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पाण्यात

धुळ्यात संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याचे बघावयास मिळाले आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर देखील गुडघाभर पाणी साचल्याचे दिसून आले आहे,

धुळे शहरात संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या जोरदार झालेल्या पावसानंतर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर अक्षरशः जलमय परिस्थिती झाल्याचे दिसून आले आहे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, त्याचबरोबर नागरिकांना देखील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचताना गुडघ्याभर पाण्यामधून जावे लागले आहे,

उत्तर महाराष्ट्रातली एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवा गिरीश महाजनांच राऊतांना आव्हान

संजय राऊत यांनी उत्तर महाराष्ट्रातील एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवावी असे थेट आव्हानच मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिले आहे, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे, "'आपण प्रमोद महाजन नाही, जामनेरचे गिरीश महाजन आहात' राऊतांच्या या टीकेचा समाचार घेताना महाजन म्हणाले, "प्रमोदजींची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही, मात्र मी संजय राऊत यांच्यासारख्या केवळ तोंडाच्या वाफा सोडत नाही, तर कामाच्या जोरावर बोलतो"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com