Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रावर शक्ती चक्रवादळाचं संकट, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

नालासोपाराच्या प्रगतीनगर परिसरातून काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट कडून शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख रुपयांची मदत

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंदिर देवस्थानकडून १ कोटी २५ लाख रुपयांची मदत

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार चेक सुपूर्द

राज्यातील विविध देवस्थानांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

Pune : पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला करणाऱ्या ४ जणांना अटक

रस्त्यावर पडलेल्या खड्डा चुकवत असताना पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीचा धक्का ४ तरुणांच्यापैकी एका तरुणाच्या गाडीला लागला आणि यातून वाद झाला. यानंतर पोलिस कर्मचारी वर्दीवर नसल्यामुळे ते पोलिस आहेत हे त्या आरोपींना कळले नाही आणि त्यांनी कर्मचाऱ्याला काठीने मारलं आहे. या चार ही जणांना पुण्यातील दत्तवाडी भागातून मधून ताब्यात घेण्यात आले असुन डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Nagpur : ‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा - नागपूर महापालिका

- 'कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा

- नागपूर महानगर पालिका आरोग्य विभागाचे शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना पत्र

- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’ च्या युक्ती संगत वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

- या दिशानिर्देशाचे पालन करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागपूर शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे.

- दुषित ‘कफ सिरप’ मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर भारत सरकारने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आलेली परीक्षाची तारीख जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आलेली परीक्षाची तारीख जाहीर

संयुक्त गट ब 21 डिसेंबर 2025

✅ जा. क्र. ०१२/२०२५, जा. क्र. ११७/२०२५ आणि जा. क्र. १२४/२०२५ - परीक्षांच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

📌 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५, रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

📌 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५, रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

📌 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, रविवार, दिनांक ०४ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.

Nala Sopara : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

नालासोपाराच्या प्रगतीनगर परिसरातून काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

“ओट चोर, ओट चोर संविधान बचाव” अशा घोषणा देत रॅली प्रगती नगर परिसरातून निघाली होती.

हातात तिरंगे, बॅनर आणि संविधानाचे प्रतीक असलेले फलक घेऊन कार्यकर्त्यांनी संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही टिकवण्याचा संदेश दिला.

Shrikant Shinde : 'त्यांचं वय झालंय’ नाव न घेता श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला

गणेश नाईकांचं वय झालंय, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवून देऊ असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावलाय. गणेश नाईक यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केलीय. आज त्यांनी अंबरनाथमधल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. गणेश नाईकांचं वय झालं असून आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाहीत आम्ही आमच्या कामातून उत्तर देतो असा टोला त्यांनी लगावलाय.

Dhule : धुळे तालुक्यातील अजनाळे गावात आरोपी घेण्यासाठी गेलेल्या पोलीस वाहनांवर जमावाची दगडफेक

धुळे तालुक्यातील अजनाळे गावात आरोपी घेण्यासाठी गेलेल्या पोलीस वाहनांवर जमावाची दगडफेक..

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काहींनी केली दगडफेक..

दगडफेकी पोलीस वाहनाचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान..

काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील किरकोळ दुखापत झाल्याची प्रार्थमिक माहिती..

दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात...

Kalyan News : बनावट सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉल मार्कचा शिक्का

चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढवून त्यावर हॉल मार्क चा शिक्का मारत हे दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या बंटी बबली दाम्पत्यासह त्यांच्या एका साथीदाराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .

अश्विनी शेवाळे ,मयूर पाटोळे अशी बंटी बबली दाम्पत्याची नावे आहेत तर या दोघांना नकली दागिन्यांवर हॉलमार्क मारून देणारा शरण शिलवंत या भामट्याला पुणे येथून बेड्या ठोकल्यात .

Nashik News : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

नाशिकच्या सातपूर आयटीआय सिग्नल परिसरातील मध्यरात्रीच्या गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आलीय.

यामध्ये 9 मुख्य आरोपी असून इतर चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय.यामध्ये वरून तिवारी याने मध्यरात्री हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर हॉटेल चालकाने तेथील काही गावगुंडांना कळवले असता ते त्या ठिकाणी आल्यानंतर वरून तिवारी या इसमावर गोळीबार करण्यात आला होता.

मात्र गोळी डाव्या पायाला लागल्याने तिवारी हा गंभीर जखमी असून त्याला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

RPI चे नाशिक जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे हा यामध्ये मुख्य आरोपी असून तो फरार होता, मात्र पोलिसांनी काही तासातच त्याचा शोध घेतला असून त्यासह त्याच्या अन्य साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय.

Uday Samant : भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा उदय सामंत यांची मागणी

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आज हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर मंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली आहे.

हे दुर्दैवी आहे आणि मी देखील निषेध याचा करतो. भूषण गवई सारखं महाराष्ट्रातले एक नेतृत्व सरन्यायाधीश म्हणून काम करत असताना अशा पद्धतीचा भ्याड हल्ला होण त्याची आम्ही निंदा करतो.

ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल त्यांच्यावर ककडक कारवाई करा अशी आमची मागणी आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं.

Nashik: सप्तशृंगगडावर रंगला ' कोजागिरी ' उत्सव; अनेक कलाकारांची मांदियाळी

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. नवरात्र उत्सवानंतर सप्तशृंगगडावर विशेष महत्व असते ते कोजागिरी पौर्णिमेला..कोजागिरी पौर्णिमेला देशभरातील तृतीय पंथी गडावर जमा होतात व देवीची छबीना मिरवणुक काढतात..किन्नरांमध्ये शिव पार्वतीची रुपे समाविलेली असल्याने किन्नर देवीची निर्मळ मनाने आराधना करतात..किन्नर व त्यांचे गुरु त्यांच्या देव्हाऱ्यातील देवीच्या प्रतिमा व मृर्ती घेवून येतात. सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावात शाही स्नान घालून साडी चोळी,अत्तर ,वेणी व शृंगाराचे साहित्याने देवीला सजवित देवीचा छबिना काढण्यात आला.या छबीना मिरवणुकीत तृतीय पंथीय ढोल ताशा व पारंपारिक वाद्यावर ठेका धरून देहभान हरपून नृत्य करत होते..सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी, अभिनेता मिलिंद गुणाजी, शिल्पा शेट्टी आदी दिग्गज कलाकारांनी आज या छबीना मिरवणुकीत सहभागी होत आदिमायेचे दर्शन घेतले..सप्तशृंगीदेवी ट्रस्टच्या वतीने या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

Pune: पुण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या ४ जणांना अटक

रस्त्यावर पडलेल्या खड्डा चुकवत असताना पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीचा धक्का ४ तरुणांच्यापैकी एका तरुणाच्या गाडीला लागला आणि यातून वाद झाला. यानंतर पोलिस कर्मचारी वर्दीवर नसल्यामुळे ते पोलिस आहेत हे त्या आरोपींना कळले नाही आणि त्यांनी कर्मचाऱ्याला काठीने मारलं आहे. या चार ही जणांना पुण्यातील दत्तवाडी भागातून मधून ताब्यात घेण्यात आले असुन डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Solapur: सोलापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय

माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या धरण किंवा तलावातून माती मोफत देणार

तर कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का? याच्या अभ्यासासाठी समिती गठीत

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची ही समिती पुनर्वसन कायद्याचा अभ्यास करून एका आठवड्यात अहवाल देणार

तर गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मनरेगा माध्यमातून माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोफत माती देणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

Vegetable Price: अतिवृष्टीमुळे शेतातच भाजीपाला सडला, आवक घटल्याने भाव वाढले

गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात भाजीपाला सडून खराब झाल्यामुळे बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे, आणि त्यामुळे गेल्या 15 ते 20 दिवसांपुर्वी स्वस्त असलेल्या पालेभाज्यांचे दर आता वाढले आहे, त्यामुळे स्वयंपाक घरात हमखास लागणारे टमाटे व कोथबीरचे देखील दर वाढले आहे, यापुर्वी अवघ्या 20 रुपये किलो असलेले टमाटे आता चक्क 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाले आहे, तर कोथिंबीरचे दर देखील किलो मागे 120 रुपये एवढे झाले आहे, या शिवाय बहूतांशी भाज्यांचे दर हे 60 ते 70 रुपये किलोवर जाऊन पोहचले आहे,

Ahilyanagar: अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी 25 हजाराच्या जातमजकुल्यावर केला जमीन मंजूर....

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी नगर - संभाजीनगर महामार्गांवर करण्यात आला होता रास्ता रोको....

रास्ता रोको दरम्यान झालेल्या दगडफेकी दरम्यान पोलिसांनी केला होता लाठीचार्ज...

तर दगडफेक करणाऱ्यां 30 आरोपीना तोफखाना पोलिसांनी केली होती अटक....

तर अटकेनंतर आरोपीना मिळाली होती तीन दिवसाची पोलीस कोठडी...

Bihar Election 2025 Date Live : १४ नोव्हेंबरला बिहारला मिळणार नवा मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Bihar Vidhan Sabha Election 2025 Date Announcement Live : बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. दोन टप्प्यात बिहारच्या निवडणुका होणार आहेत. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

बिहारमध्ये एकूण ७.२ कोटी मतदार आहे. यामध्ये ३.९३ कोटी पुरुष आणि ३.५ कोटी महिला मतदार आहेत.

Yavatmal: यवतमाळमध्ये आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी समाज बांधवांचा रास्तारोको

हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणात समावेश करू नाही या मागणीसाठी आदिवासी समाज बांधवांकडून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ तब्बल अर्धा तास रास्तारोको आंदोलन करून बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करण्यात आला. सध्या आदिवासी - बंजारा आरक्षण वाद चांगलाच पेटला असून,हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण मिळावे यासाठी,बंजारा समाजाकडून मोर्चे व आंदोलन केले जात आहे.मात्र आदिवासी समाजाकडून बंजारा समाजाच्या मागणीला कडाडून विरोध केल्या जात आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतला.

Nashik: नाशिकमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सुळसुळाट

- अल्पवयीन गुन्हेगारांच्या भाईगिरीचा व्हिडिओ व्हायरल

- नाशिकमध्ये येताना दादागिरी भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवा

- कारण इथे घराघरात भाई, गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा

- अल्पवयीन गुन्हेगारांचा भाईगिरीचा रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

- नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आलेले असताना दुसरीकडे सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून गुन्हेगारांचं पोलिसांनाच थेट आव्हान

Gautami Patil: अपघातप्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चीट

आत्तापर्यंत झालेल्या तपासातून गौतमी पाटील चां त्या अपघाताशी संबंध नसल्याचे तपासातून समोर आलं आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमीच्या चालकाने अपघात केला मात्र यावेळी गाडी मध्ये गौतमी पाटील नव्हती अशी माहिती पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. अपघातानंतर पुणे ते भोर रस्त्यावरील ४० ते ५० ठिकाणांहून १०० हून अधिक सी सी टिव्ही फुटेज तपासले गेले. तसेच अपघातापूर्वी वाहनातून २ व्यक्ती खाली उतरल्या आहेत पण त्यांचा कुठला ही संबंध अपघाताशी नसल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं. अपघातानंतर तांत्रिक बाबी आणि इन्शुरन्स यासाठी गौतमी पाटील यांचे स्टेटमेंट घेऊ पण आत्तापर्यंत झालेल्या तपासातून गौतमी पाटीलचा संबंध नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nandurbar: नंदुरबारच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा मोठा दिलदारपणा

पूरपरिस्थितीने उद्ध्वस्त झालेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांना मदतीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे गावाने माणुसकीचे मोठे उदाहरण घालून दिले आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा, परिवर्धे येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ही मदत मोहीम राबवली. शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात मदत रॅली काढून घरोघरी निधी गोळा केला. विशेष म्हणजे, या शाळकरी मुलांनी स्वतःच्या खाऊचे पैसे देखील मदत म्हणून दिले. या चिमुकल्यांच्या हाकेला परिवर्धेच्या ग्रामस्थांनीही मोठ्या मनाने साथ दिली.

Nashik: नाशिकमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सुळसुळाट

- नाशिकमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सुळसुळाट

- अल्पवयीन गुन्हेगारांच्या भाईगिरीचा व्हिडिओ व्हायरल

- नाशिकमध्ये येताना दादागिरी भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवा

- कारण इथे घराघरात भाई, गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा

- अल्पवयीन गुन्हेगारांचा भाईगिरीचा रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

- नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आलेले असताना दुसरीकडे सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून गुन्हेगारांचं पोलिसांनाच थेट आव्हान

"त्या" अपघाताला गौतमी नाही फक्त चालक जबाबदार - पुणे पोलीस

"त्या" अपघाताला गौतमी नाही फक्त चालक जबाबदार, पुणे पोलिसांच्या तपासातून माहिती समोर

अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, अपघात चालकाकडून च

पुणे पोलिसांनी अपघात स्थळापासून भोर पर्यंत तपासले शेकडो सी सी टिव्ही

अपघातावेळी गाडीत फक्त ड्रायव्हर उपस्थितीत, पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांची माहिती

परभणीत वंचितकडून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उबाठा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन युवक आघाडी,यांच्या वतीने आज परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन" करून निषेध व्यक्त करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात रोष व्यक्त केला. या आंदोलनात कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Solapur: सोलापुरातील 289 धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले

- सोलापुरातील 289 धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले

- सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी घेतला निर्णय

- यामध्ये प्रामुख्याने 192 मस्जिद आणि दर्गा, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले

- पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले.

- मागील महिन्यात किरीट सोमय्या यांनी मोर्चाचं आयोजन केले होते मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती

- त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंची चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं

- धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली

- मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले

- त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली

- पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या 99 टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत

- मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये ही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे

- तर 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे.

- आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूंचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो.

Pune: अजित पवार गटाच्या बंडू खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

आमदार बापू पठारे धक्काबुक्की प्रकरण

अजित पवार गटाच्या बंडू खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

बापू पठारे यांचे चालक शकील शेख यांच्याकडून विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली होती तक्रार दाखल

शकील शेख यांचा तक्रारीनंतर विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये बंडू खांदवे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

बंडू शहाजी खांदवे यांच्यासह एकूण 20 जणांवर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Ahilyanagar: बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला. नगर शहरातील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरून हा मोर्चा निघाला होता. समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली. अनेक वर्षांपासून या मागणीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अद्याप योग्य निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आम्हांला हैद्राबाद गॅजेट नुसार ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे...यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले

Beed: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग बाईकचा थरार

बातमी आहे बीडमधून... बीडच्या हिरापूर परिसरात द बर्निंग बाईकचा थरार पाहायला मिळाला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणी फाट्याजवळ दुचाकी जळत असलेल्या अवस्थेत दिसून आली. राष्ट्रीय महामार्गावरच दुचाकी जळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ही दुचाकी जळाली की जाळण्यात आली? हे मात्र अस्पष्ट आहे. दुचाकी जळत असताना देखील पोलिस मात्र अद्याप या ठिकाणी फिरकले नाहीत. दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही थरारक घटना समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले.

गौतमी पाटीलला क्लिनचीट, अपघातावेळी वाहनात नव्हती

अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती समोर

गौतमी पाटील ला पुणे पोलिसांकडून "क्लीन चिट"

पुणे पोलिसांनी तपासले तब्बल १०० पेक्षा अधिक सी सी टिव्ही

अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक वाहनात उपस्थितीत होता

Dombivli: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार कमानी वरून ‘डोंबिवली’ नावच गायब

गेल्या वर्षभरापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. स्टेशनला एक नवा चेहरा मिळत आहे, वाढीव जिने, सरकते जिने, शेड्स उभारले जात आहेत. पण हे सुशोभीकरण इतके प्रभावी ठरले आहे की, खुद्द 'डोंबिवली' हे मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांच्या कमानी वरून गायब झाले आहे! डोंबिवलीला मिळालेल्या उपमा, जसे की नाट्यनगरी, क्रिडानगरी, साहित्यनगरी या नावांच्या कमानी सर्व ८ प्रवेशद्वारांवर झळकत आहेत, पण 'डोंबिवली' नावाचा कमानी वर साधा उल्लेखही नाही. यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आपण नक्की कोणत्या स्टेशनवर आहोत, याचा मोठा गोंधळ होत आहे. या गंभीर प्रकारानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देत मूळ नाव ठळक अक्षरात त्वरित लावावे आणि रेंगाळलेली कामे पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर ‘डोंबिवली’ हे मूळ नावच कुठेच दिसत नसल्याने स्थानकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करताना रेल्वे प्रशासनानं जणू ‘ओळख’च मिटवली आहे. असे वाटत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Pune News: पुण्यात खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचारी आक्रमक

शांततेच्या मार्गाने आज पुण्यातील महावितरण झोन विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले

९ ऑक्टोबरला महाराष्ट्रात वीज कर्मचाऱ्यांचा मोठा संप

राज्यातील तीनही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते,अधिकारी आणि ४२ हजार कंत्राटी कामगार ९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता,अधिकारी कृती समितीने दिली आहे.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध पद्धतीने खासगीकरणाची अंमलबजावणी सुरू असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरणाचे परवाने देणे, ३२९ उपकेंद्रांचे कंत्राटीकरण, महापारेषणमधील २०० कोटींपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचे खासगीकरण, तसेच महापारेषण कंपनीचा आयपीओद्वारे शेअर बाजारात समावेश करण्याचा प्रस्ताव यास समितीचा तीव्र विरोध आहे.

Hingoli: हिंगोली महामार्गावर अर्धापूर येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टर 50 हजार रुपये द्या, कर्जमाफी करा शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्याच्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

शेती पिके हातच गेल्याने नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक.

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरच्या फॉरेन्सिक रिपोर्ट समोर

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरच्या फॉरेन्सिक रिपोर्ट

खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलरला 27/7/2025 ला अटक करण्यात आली होती...

त्यानंतर खेवलकरचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात आले होते...

प्रांजल खेवलकरने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचे या रिपोर्ट मधून स्पष्ट.

याचसोबत गुन्ह्यातील अन्य चार पुरुष आणि दोन महिलांनीही ड्रग्स चे सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट..

Rohini Khadse: रोहिणी खडसेंना पुणे पोलिसांची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. रोहिणी खडसे पोलीस आय़ुक्तालयात दाखल झाल्या आहेत.

Kolhapur: कोल्हापूर-सांगली रोडवर कोंडीगिरी फाटा येथे भीषण अपघात

भरधाव स्विफ्ट आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक

दोन परप्रांतीय कामगारांचा जागीच मृत्यू

दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही आले समोर

जयसिंगपूर पोलिसांत अपघाताची नोंद

Yavatmal: यवतमाळमध्ये बंजारा समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात

बंजारा समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला यवतमाळ मधून सुरुवात

प्रमुख मार्गाने निघालाय जन आक्रोश मोर्चा

मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने बंजारा समाज समाज बांधवांचा सहभाग, मोर्चादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शहरातील वाहतूक सेवा पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने वळवली

यवतमाळ शहरात जय सेवालाल महाराज यांच्या घोषणा

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात

बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात...

अहिल्यानगरच्या क्लेरा ब्रूस शाळेपासून मोर्चाला सुरुवात...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार मोर्चा...

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी...

Nashik: नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

- शिंदे गटाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी देखील काल खड्ड्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर अधिकाऱ्यांचे निलंबन करू अशा प्रकारची तंबी देण्यात आली होती त्यानंतर आज शिंदे गटाकडून महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन शहर अभियंता यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे

Parbhani: परभणीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी

परभणी जिल्ह्यात झालेल्या मध्यरात्री जोरदार पावसामुळे शेती नुकसाना बरोबरच शहरातील घरांचे नुकसान झाले आहेत मोठ्या प्रमाणात घरात पाणी असल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आता शिवसेनेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे परभणी शहरातील अनेक भागात घरात पाणी घुसले आहे यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहेत यांना शिवसेने जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे ज्या ज्या घरांत पाणी घुसले आहे त्यांना संसार उपयोगी किडचे वाटप करण्यात आले आहे तर सकाळपासून घरात पाणी असल्यामुळे त्यांच्या जेवनाची ही सोय करण्यात आली आहे

अलिबाग ते वडखळ महामार्गाची पार दुरवस्था

अलिबाग ते वडखळ रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्डयातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. अनेकदा छोटी मोठी वाहने या खड्डयांमध्ये अडकून पडतात. धरमतर पुलाजवळ पडलेल्या एका मोठ्या खड्डयात चक्क बीएमडबल्यू सारखी महागडी गाडी अडकून पडली. एक छोटा खड्डा चुकवताना गाडी दुसऱ्या मोठ्या खड्डयात अडकली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या घटनेचा व्हिडिओ करून रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले आहेत. मध्यंतरी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली होती. परंतु दोनच दिवसात हे काम थांबवण्यात आले. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेने प्रवासी आणि पर्यटक पुरते हैराण झाले आहेत.

'निवडणुका सरो..मतदार मरो' या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे... गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे.....निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय हा संशोधनाचा विषय असला तरी २० लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे?
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

गायरान जागेमधील चंदनाची झाडे तोडून चंदन चोरी करणाऱ्या तिघांना भोरच्या राजगड पोलिसांकडून अटक

भोर तालुक्यातील विरवाडी येथील घटना.शेतकरी आणि राजगड पोलिसांच्या तत्परतेने सराईत तीन गुन्हेगार ताब्यात

त्यांच्याकडून दुचाकीसह, चंदनाच्या झाडाचे लहान मोठे तुकडे, कुऱ्हाड, कुदळ यांसारखा हत्यारासह 62 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महेश मुकेश भोसले,  अंकिता मैनेष भोसले, गायत्री जकल पवार अशी ताब्यात घेण्यातं आलेल्या तिघा चोरांची नावं

या प्रकरणी या तिघांवरही राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरवाडी येथे तीन अज्ञात इसम चंदनाच्या झाडांची तोड करूनं, चोरून नेत असल्याचा प्रकार शेतकरी विजय संपतराव शिळीमकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर राजगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या नावाने सोशल मीडियावर बॅनर व्हायरल

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मीक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सोबत फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. संदिप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती.

अशा खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींचं खुलेआम समर्थन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लोकांमधून होत आहे.

निलेश घायवळ याचं कोथरूड मधील कार्यालय पुणे पोलिसांनी सील केलं 

निलेश घायवळ याचं कोथरूड मधील कार्यालय पुणे पोलिसांनी सील केलं आहे. याच कार्यालयातून तो सर्व व्यवहार पाहत होता. निलेश गायवळ या कार्यालयात बसून सर्व गॅंग चालवत होता. तो पसार झाला असला तरी पुणे पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्र जे आहेत. या कार्यालयातून जप्त केलेली आहेत.

अमरावतीत अभिजात मराठी भाषा सप्ताह..शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.. अभिजात मराठी भाषा

अमरावती गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय अभिजात भाषा परिषदेचे आयोजन करण्यात आले..

या परिषदेचे उद्घाटन शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी विद्यापीठ परिसरातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली..

दरम्यान आदिवासी बांधवांनी आदिवासी वेशभूषा परिधान करीत सहभाग नोंदविला..

विद्यार्थ्यांनी बासरीचा निनादात मंत्री चंद्रकांत पाटलांचे स्वागत केले..भारतीय अभिजात भाषा परिषद गाडगेबाबा विद्यापीठात ३ दिवस 11 अभिजात भाषावार चर्चासत्र होणार आहे..यासाठी अनेक तज्ञ विद्यापीठात दाखल झाले आहे..

Pune News : रावेत येथील नदीपात्रात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

पिंपरी चिंचवड शहरातील रावे तेथील नदीपात्रात आज सकाळी एक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. रावेत येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज या नदीवरील पुलाखाली अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी रावेत पोलीस तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविली आहे. आता अग्निशमन दल आणि रावेत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविणार आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे या ३७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेशेतून मध्यरात्री शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सतत पडणारा पाऊस अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यांच्या शेत नदीच्या जवळच असल्याने ३ तीन एकर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. अल्पभूधारक शेतकरी आहेत.त्यांना तीन एकर शेती आहे.या नैरेशेतून शेतामधील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे

परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार,   शेतकऱ्यांची काढून ठेवलेले सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड

परभणी जिल्ह्यात पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले आहेत सतत पडत असलेल्या पावसामुळे वाचलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी काढले खरे मात्र रात्रीच्या पावसाने तेही भिजले.मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकरी पांडुरंग पंडितराव भिसे यांच्या शेतात काल दिवसभर सोयाबीन कापून मळणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन काढलं रात्री शेतात ठेवलं होतं पहाटे मुसळधार पाऊस झाला आणि हे सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनचे पोते बाहेर काढले आहेत

शेत-तळ्यामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू, गोंदियाच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथील घटना 

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे एका शेततळ्यामध्ये तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. काल सायंकाळच्या सुमारास हे तिघेही तरुण पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेले होते... दरम्यान या तिन्ही तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत... अभिषेक आचले (20), आदित्य बैस (16), तुषार राऊत (18) अशी तीनही मृतकांची नावे असून तिघेही देवरी तालुक्यातील पुराडा येथील रहिवासी आहेत... घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात विद्यार्थ्यांचे हाल

जामनेर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या कुंभारी बु येथील विध्यार्थी यांना शाळेत जायला व शाळा सुटल्यानंतर बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे अवैध रिक्षातुन अथवा पायी प्रवास करावा लागत आहे कुंभारी बु येथील १५० ते २००विध्यार्थी तोंडापूर विध्यालयात शिकत असून त्यांना सायंकाळी ५ वाजता बस सेवा नसल्याने आगस्ट महिन्यात प्रभाकर साळवे जिल्हा अध्यक्ष रासपा याच्याकडून आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले होते आज पर्यंत आगार प्रमुख उडवा उडवि उत्तर देत असल्याने व बससेवा मिळत नसल्याने वारंवार निवेदन देवून हि बस सेवा मिळत नसल्याने विध्यार्थी व प्रभाकर साळवे याच्याकडून आगार प्रमुख यांना आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले दोन दिवसात बस सेवा न मिळाल्यास तोंडापूर हुन फर्दापुर जाणाऱ्या रस्त्यावरील सर्वच बस सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे

कार नदीत कोसळली

दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर कार नदीत कोसळली. दोडामार्ग कलमठाणा येथे अचानक समोर आलेल्या मोटार सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट बारा फुट खोल नदी पाञात कोसळली. या अपघातात चालक राहुल गंवडळकर किरकोळ जखमी झाला. मात्र कारचे नुकसान झाले आहे. सध्या ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली आहे तर जखमी वाहन चालकाला नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये आवाज वाढव म्हणणाऱ्या 54 जणांवर गुन्हा

नवरात्र उत्सवात कोल्हापूर शहरातील सर्वच भागांमध्ये सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली होती. तर शनिवारी त्यांनी विसर्जन मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाज ध्वनी यंत्रणा लावण्यात आली होती. नियमाप्रमाणे रात्री दहा वाजल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी ध्वनी यंत्रणा बंद करावी लागते. मात्र काही मंडळांनी या नियमांना हरताळ फासला. ध्वनी यंत्रणा आणि विद्युत रोषणाईसाठी लावले जाणारे स्ट्रक्चर किती आकाराचे असावे याचेही नियम पोलिसांनी घालून दिले होते. तेही काही मंडळांनी पाळले नाहीत. त्यामुळे शनिवारी रात्री पोलिसांनी कारवाई करून 17 मंडळांच्या ध्वनी यंत्रणेतील मिक्सर जप्त करून कारवाई केली होती. आज पोलिसांनी आणखी 18 मंडळांवर गुन्हे दाखल केलेत. यातील नऊ मंडळांवर ध्वनी मर्यादेच्या उल्लंघनाची तर 9 मंडळांवर नियमबाह्य स्ट्रक्चर उभे केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार

- मागील महिन्यात प्रारूप प्रभाग रचना आराखड्याच्या सूचना आणि हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर आज अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

- कोणत्या प्रभागात काय बदल होतो, याकडे इच्छुकांसह राजकीय पक्षांचं लक्ष

- नाशिक महापालिकेसाठी ३१ प्रभागात १२२ वॉर्ड

- अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या पॅनेल निर्मितीला येणार वेग

परभणी शहर जिल्ह्यात पावसाचा पुन्हा एकदा हाहाकार

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हा कार बघायला मिळालाय पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शहरातील रस्त्यांसह ग्रामीण भागातील शेत शिवारही पाण्याखाली गेली आहेत शहरातील अष्टभुजा देवी मंदिर परिसर गांधी पार्क अक्षदा मंगल कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी झाले असून अनेक घरांमध्येही पाणी गेले आहे त्यामुळे नागरिकांना अक्षदा मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात 57 लाखाहून अधिक उलाढाल

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांनी भरभरून दान केले. उत्सव काळात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून 11 दिवसांच्या काळात मंदिराच्या तिजोरीत 57 लाख 19 हजार 442 रुपये इतकी उलाढाल झाली आहे. तसेच धार्मिक विधी, पूजा, अन्नदानासाठी देखील भाविकांनी भरभरून देणगी दिली आहे.

विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय काम बंद, जोरदार निदर्शने...

राज्यभरातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन आणि प्रवासभत्ता वाढी संदर्भात महायुती सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय अध्यादेश काढून रोजगार सेवकांचे मानधन सहा हजारावरून आठ हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रवास व अल्पोहार भत्ता देण्याचे घोषित केले होते, मात्र या अध्यादेशाचा सरकारला विसर पडलाय, उलट गेल्या मार्च महिन्यापासून रोजगार सेवकांचे मानधन देखील अदा करण्यात आले नाही, त्यामुळे या संपूर्ण रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.. परिणाम रोजगार सेवकांनी बुलढाण्याच्या खामगाव पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शने केली.. मानधन आणि भत्ता वाढी संदर्भात काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे...

ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम दोडामार्ग मध्ये दाखल

ओंकार हत्तीने दोडामार्ग व सावंतवाडीच्या काही भागात अक्षरशः धुडगूस घातला आहे. भर वस्तीत हत्ती येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भात शेती, केळी बागायतीचे अतोनात नुकसान या हत्तीकडून सुरू आहे. यापूर्वी या हत्तीने दोडामार्ग मधील एका शेतकऱ्याचा बळी सुद्धा घेतला होता. या ओंकार हत्तीला पकडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्या पाश्र्वभूमीवर वनताराची टीम दोडामार्ग मध्ये दाखल झाली आहे. सध्या या टीमकडून वनविभाग व ग्रामस्थांकडून माहीती घेण्यात येत असून हत्ती पकड मोहीम राबविण्या संदर्भात चर्चा केली जात आहे.

गणेश शिंदे यांना झोपडपट्टी महासंघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी

गेल्या महिन्याभरापासून नाराज असलेले आणि दिंडोशी-गोरेगाव विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंदे यांना अखेर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा संघटनात सक्रिय करण्याच्या दृष्टीने ही बोलवण ठरली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश शिंदे यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे.”

शिंदे गटात नवचैतन्य निर्माण करण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

दिवठाणा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या...

बेरोजगारीमुळे खामगाव शहराच्या शिवाजीनगर मधील राहणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणाने देवठाणा नदीपात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली..... आकाश उमेश दळवी व 31 वर्षे असे मृतक तरुणाचे नाव असून बेरोजगारीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मृतकाच्या मामे भावाने दिली...आकाश हा सतत चिंताग्रस्त होता, शिक्षित असलेला आकाश नेहमीच नोकरीच्या शोधात होता मात्र कुठेही जॉब मिळत नसल्याने त्ताचे टोकाचे पाऊल उचलीत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलेय.. याप्रकरणी मृतकाचा मामे भाऊ अक्षय गलांडे यांनी खामगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून या अधिक तपास हिवरखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन आहेर हे करीत आहेत...

मनसे नेते बाळा नांदगावकर लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर,, नुकसानग्रस्त शेती पिकांची केली पाहणी

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेती पिकांचे प्रचंड मोठ नुकसान झाल यात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठे नुकसान झाल आहे ,जिल्ह्यातल्या मुरुड परिसरात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 25 हजार रुपयांचे आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे , सरकारने तीस हजार रुपये प्रति कर नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफी करून कोरा करावा अशी देखील मागणी ते सरकारकडे करणार सांगितल..

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आश्रू

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगाव मधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश: भोई सपाट झाली.विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे .

आज आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे.एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे.बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे. बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चा पेक्षा दीडपट मोठा मोर्चा आमचा असेल असा दावा आमदार भीमराव केराम यांनी केला आहे.

26 ऑक्टोबर पासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. येत्या दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा महासोळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, परंतु कार्तिकीच्या महापूजेला दोन्ही पैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचं हे मात्र अद्याप ठरवण्यात आले नाही विधी व न्याय खात्याचा सल्ल्यानुसार दोन्हीपैकी एका उपमुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण दिले जाणार आहे. यासंदर्भात काल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पंढरपूर आज संपन्न झाली यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीत याबाबत माहिती दिली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाली तर मात्र उपमुख्यमंत्र्यांऐवजी विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना कार्तिकीच्या शासकीय महापूजेचा मान मिळण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये वाहतूक पोलिसांकडून ऑटो चालकाला बेदम मारहाण

लातूर शहरातल्या बार्शी रोड परिसरात एका ऑटो चालकाला वाहतूक पोलिसांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान यावेळी या मारहाणीचा व्हिडिओ करणाऱ्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याला तीन ते चार वाहतूक पोलिसांनी पुन्हा मारले आहे. तर विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सामूहिक मारहाण करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी

नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपल्यामुळे शहरातील अनेक सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. आज नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने 'येलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; उतारा घटला आणि बाजारात दरही पडले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झाल आहे, यातच खरीप हंगामातील उरलीसुरली पिक शेतकऱ्यांनी आता काढायला सुरुवात केली आहे, दरम्यान नवीन काढलेले सोयाबीन हे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाल आहे,मात्र बाजारात दर पडल्याने हमीभावापेक्षा 1 हजार रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात साधारणता चार लाख हेक्टर वरती सोयाबीनचा पेरा केला जातो मात्र यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे, त्यात बाजारात भाव पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे

शेतकरी कर्ज वसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा बँकांना इशारा

महापुरात शेतकरी उध्वस्त झालाय. खरिपाची पिकं हातची गेली आहेत. समोर रब्बीची पेरणी कशी करावी हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खत बी बियाण्यांचं वाटप करण्यात आले. धाराशिवच्या भूम भागात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खत आणि बियाणे वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी कर्ज वसुलीवरून बाळा नांदगावकर यांनी बँकांना इशारा दिला. शेतकरी संकटात आहे हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. आम्ही पाया पडून हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू असा इशारा नांदगावकर यांनी दिला.

मोरवड लखमापूर तलाव 100% भरला,ग्रामस्थांमध्ये आनंदाच वातावरण...महिलांनी केले जलपूजन

लातूर जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यात असणाऱ्या मोरवड आणि लखमापूर या दोन्ही गावांची तहान भागवणारे तलाव शंभर टक्के भरल्याने. मोरवड येथील महिला ग्रामस्थांनी या तलावाचं जलपूजन केल आहे , शेतीच्या सिंचनासह, दोन्ही गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

Pune : दोन दिवस पुणे पोलिसांची निलेश घायवळाच्या पुण्यातील घरांवर छापेमारी

छापीमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधील घरात सापडल्या बंदुकीच्या गोळ्या.

त्याचबरोबर सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची संदर्भात कागदपत्र सापडली

याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाइल्स पोलिसांनी केल्या जप्त

याशिवाय पुणे पोलिसांचे महानगरपालिकेला पत्र.. निलेश घायवळच्या नावावर अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्ताची चौकशी होणार... पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्याच्या तयारीत

पुणे महापालिकेचे पथक घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सिझ करणार

पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती फार्स आवळला

पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चांगला पाऊस

यंदाचा पावसाळी हिंदू मत पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला विशेषता मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट झाला असून मुळशी भोर खेड आंबेगाव शिरूर आणि दौंड तालुक्यातही सरासरीपेक्षा पाच ते पंधरा टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

त्यामुळे पाण्याची चिंता मिटली असली तरी सप्टेंबर अखेर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेय.

यूपीएससी पूर्वपरीक्षेची तात्काळ उत्तर तालिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थात अन्सर कीज आता परीक्षानंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार आहेत या महत्वपूर्ण निर्णय याची माहिती आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्र द्वारे दिली आहे.

परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मागणीसाठी दाखवलेल्या याचे केवळ सुनावणी दरम्यान यूपीएससी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आश्रू

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगाव मधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश:भुई सपाट झाली.विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती,परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे .

भंडारा शहरातील गांधी चौकात तिरुपती एम्पोरीयम येथे लागली भीषण आग.

भंडारा शहरातील गांधी चौकात असलेल्या तिरुपती गिफ्ट एम्पोरीयम येथे रात्री भिषण आग लागल्याने या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाली आहे,आग लागण्याचा कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा बोलले जात आहे,आगीची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिली, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी दुकानाचा संपूर्ण सामान जळून खाक झालं.

Maharashtra Live News Update :  ९ ऑक्टोबरपासून वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

नांदेडमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार नांदेड मध्ये मुसळधार पाऊस सुरु.

मध्ये रात्री पासून नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग.

नांदेड शहरातील रस्ते जलमय, रस्त्याला आले नदीचे स्वरूप.

तीन दिवस घेतली होती पावसाने विश्रांती.

पुन्हा परतीच्या पावसाने नांदेडला झोडपले.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ एकनाथ शिंदे यांना जाहीर

कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर याठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार सोहळा

पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची तयारी जोरात 50 हजार लोक बसण्याची व्यवस्था

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी होत आहेत डिसेंबर मध्ये विमान सेवा सुरू होणार आहेत दोन रनवे असणार आहेत

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपस्थित असणारे त्यामुळे कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू झाली आहे

nashik-laslgon-कांदा व्यापाऱ्याला चाकूने भोसकले

नाशिकच्या लासलगाव जवळील विंचूर येथील मारवाडी पेठेत कांदा व्यापारी पावन जाजू यांच्यावर त्यांचा सहकारी बोराडे नावाच्या व्यक्तीने चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून,पावन जाजू यांच्या पोटावर जबरदस्त वार झाले आहे,घरासमोर उभे असताना हल्लेखोराने त्यांच्यावर वार केले,घटना घडतात आजू-बाजूच्या लोक धावत आले आणि त्यांनी जाजू यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र घाव जबरी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले असून,लासलगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे

भिवंडीमध्ये अग्नितांडव

भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला भीषण आग.

शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊन आगीच्या भक्ष्य स्थानी शॉर्ट सर्किट मुले आग लागण्याचा प्राथमिक अंदाज.

घटनास्थळी भिवंडी महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.

शेतकऱ्यांना देणार प्रति टन 3020 रुपये उसाला भाव.....

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 28 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले आणि देहू देवस्थानचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिसरातील शेतकरी बांधव, हितचिंतक आणि कारखान्याचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा कारखान्याकडून तब्बल पाच लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, गेल्या वर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करण्यात आले होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऊसदरातही वाढ करण्यात आली असून, गेल्या वर्षी प्रति टन 2900 रुपये भाव देण्यात आला होता, तर यंदा 3020 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राजगुरूनमध्ये तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण

राजगुरुनगर शहरातील वृदावन सोसायटी रोड गुन्हेगारी टोळीकडुन तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्रीच्या वेळी तीन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी तरुणावर हाताने दगडाने बेदम मारहाण करत उच्चभ्रु सोसायटीत जिवे मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केली या मारहाणीचा विडिओ समोर आलाय लहान वयातील तरुणपिढी गुन्हेगारी वृत्तीकडे वळण घेत असल्याचे या विडिओतुन समोर आल्याने पोलीसांची गुन्हेगारी वचक राहिला नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

भंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मिस्कीन टॅंक येथील नगरपालिका प्रशासनाचा तलाव मुसळधार पाऊस पडल्यानंतर सायंकाळी फुटला तलावाच्या पाण्याचा प्रवाह भंडारा शहराचा मुख्य मार्ग असलेला जे एम पटेल मार्गावरून वाहत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे तलावाचं पाणी खालच्या भागांमध्ये असलेल्या बैरागी वाडा, बजाज कॉम्प्लेक्स, गांधी विद्यालय, तहसील कार्यालय परिसरात पूर्णपणे जलमयस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Live News Update : आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे.एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे.बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे. बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चा पेक्षा दीडपट मोठा मोर्चा आमचा असेल असा दावा आमदार भीमराव केराम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com