

महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटीला पुणे शहरात बंदी घातले असताना शहरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुणे शहराचे तापमान 12 ते 18 सेल्सिअस पर्यंत जाणवत असल्याने अनेक लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतात. रात्रीच्या अनेक ठिकाणी शेकोटी पेटला आहे.
महाबळेश्वरमध्ये पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात नगरपालिकेमध्ये काही वेळापासून धरणे आंदोलन सुरू केल आहे. काल दाखल केलेल्या अर्जांची माहिती अजूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नसल्याची तक्रार पत्रकारांची असून छाननीची माहिती सुद्धा अजून मिळालेली नाही. यामुळे महाबळेश्वरमधील पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग लागून मोठं नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर घरातील जळालेल्या भागाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अचानकपणे आणि तातडीने रविवारी संध्याकाळी राज्यातील वरिष्ठांच्याकडे चर्चा झाली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ही आघाडी झाली आहे
वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आम्ही दोघांनीही शिरसावंध्य मानला आहे
या आघाडीमुळे नाराज झालेल्या इच्छुकांना मी विनंती करतो.. आपले उमेदवारी अर्ज माघार घेऊन या विकास यात्रेत सामील व्हा..
याआधी आपण एकमेकांविरोधात संघर्ष केला भाषण केली
त्याचा परिणाम या निवडणुकीत होऊ देऊ नका
पुण्यातील नऱ्हे गाव परिसरातील JSPM कॉलेज जवळ वाहनाची तोडफोड
घटनेचा CCTV समोर
दुचाकीवर येत तीन जणांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
हातात लोखंडी रॉड आणि दगडाने आरोपींकडून तोडफोड
त्यामुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट
- जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज वैद ठरला आहे
- त्यामुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात होणार हे निश्चित
- माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील विरुद्ध उज्वला थिटे असा सामना रंगणार
नायगाव भाईंदरच्या मध्ये रेल्वे ट्रॅक वर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन भाचीला सख्या मामानेच चालत्या लोकलमधून ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
15 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या कोमलचा मृतदेह 17 नोव्हेंबर रोजी रेल्वे रुळावर सापडला. रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आले की आरोपी मामा अर्जुन सोनी २० हा मुली सोबत चर्चगेट–विरार लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात होता. नायगावजवळ दरवाज्यावर उभ्या असताना त्याने भाची ला मागून ढकलले आणि ती खाली पडून जागीच मृत्यूमुखी पडली.
प्रत्यक्षदर्शी प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना पाहून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या आरोपीला वलिव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सुनबाई रोहिणी वानखेडे नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता.
काल हदगाव नगरपालिकेसाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून भरला होता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज.
हदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी अर्ज भरताना होती उपस्थिती.
हदगाव नगरपालिकेसाठी भाजपा व शिंदे गटाची आहे युती.
रोहिणी वानखेडे नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथिल लहान मुलीवर नराधमाने अत्याचार करुन तिची निर्घूण हत्या केल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत असून,मनमाड शहरातील सराफा व्यावसायिक व अहिर सुवर्णकार समाजाने आज आपले व्यवहार बंद ठेवून शहरातून काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख व विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारमध्ये बोलताना महायुतीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. तुमच्या अंतर्गत वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे कोणतेही भाष्य किंवा आरोप कोणी कोणावर करायचे नाहीत, असे थेट निर्देश महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती रघुवंशी यांनी दिली.
अखेर रिक्षा चालकांचा आणि खाजगी वाहन चालकांचा सुटकेचा श्वास
सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी
72 तासाहून अधिक बंद पडलेल्या सीएनजी गॅस सुरू
धुळे -
दोंडाईचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या छाननी प्रक्रियेत मोठ्या घडामोडी समोर
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावळ यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद होण्याची शक्यता
शरयू एकनाथ भावसार यांच्या कुटुंबीयांनी महानगर पालिकाचा कर थकवल्याने उमेवाराचा अर्ज बाद करण्यासाठी विरोधाकांतर्फे हरकत
निवडणूक आयोगाने अर्धा तासांची मुदत देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दिली मुदत
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्याने मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठान लागली होती पनाला..
जालन्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सीसीआय केंद्राचे उद्घाटन
सीसीआय केंद्रावरती कापसाला मिळतोय 8 हजार 60 रुपये भाव
सीसीआयने एकरी बारा क्विंटल कापूस खरेदी करावी शेतकऱ्यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर -
हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
जय भवानीनगर येथील ऋषिकेश अनिल गव्हाणे यांचा उपचार सुरु असताना मृत्यू
फुलंब्रीहून येताना झालेल्या अपघातात पायाला गंभीर दुखापत; त्यांनतर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडत गेल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरवर हलविले; पुढे वैद्यनाथ हॉस्पिटलला रेफर, मात्र उपचारादरम्यान मृत्यू.
मुकुंदवाडीतील सह्याद्री हॉस्पिटल येथील डॉक्टरांवर नातेवाईकांचे आरोप
पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल.
नाशिक -
डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि खून प्रकरणात आजही कुसुंबा महामार्ग रोखला..
स्थानिक नागरिकांसह किन्नर लोकांनी रोखला महामार्ग..
किरीट सोमय्या देखील रस्ता रोकोत सहभागी
आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी..
नाशिक -
- हनुमान जन्म स्थानाच्या विकासावरुन वाद
- अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर झालं पाहिजे
- हनुमान जन्म स्थान संस्थेची मागणी
- हनुमान जन्म स्थान विकासासाठी मोदींना पत्र पाठवलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना पत्र पाठवली
पुणे -
अंजली दमानिया मुंढव्यात पोहचल्या
मुंढवा येथील कथित जमीन विक्री झाली त्या जागेची पाहणी करत आहेत
या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे नाव आले यात गुन्हाही दाखल झाला आहे.
जमिनीचे मूळ मालक असलेल्या नागरिकांचीही दमानिया भेट घेणार
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते भाषणांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय देण्याची ग्वाही देतात तुम्ही आमच्यासाठी कष्ट घेतले, आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ असे आश्वासन देतात.मात्र प्रत्यक्षात, स्थानिक पातळीवरील युती आणि आघाडीचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यानंतर, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘घराणेशाही’चा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. सर्वच अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलय. कुठे पत्नी, कुठे सून,तर कुठे मुलगा निवडणुकीत उतरवल्यामुळे अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय झाल्याचे चित्र आहे,नेमकी कोणत्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे..
काल कागल नगर परिषदेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजीत सिंह घाटगे यांच्यात युती झाल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. चंदगड नंतर कागल मध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या अशा बातम्या ही बाहेर आल्या... मात्र समरजीत सिंह घाटगे हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारीच नाहीत... त्यामुळे कालची युती ही अजित पवार राष्ट्रवादी आणि समर्जीत सिंह घाटगे यांच्यामार्फत भाजपमध्ये झाल्याची गंभीर टीका शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांनी केली आहे. समरजीत सिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकी ही लढवली. मात्र निवडणूक झाल्यानंतर समरजीत सिंह घाटगे यांनी पक्षाशी कोणताही संबंध ठेवला नाही. इतकंच नव्हे तर ते साधे पक्षाचे पदाधिकारी देखील नाहीत असा खुलासा व्ही व्ही पाटील यांनी केलाय.
सीएनजी च्या तुटवड्याचा फटका प्रवाशांना ही बसतो आहे.रिक्षा स्टैंड वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग पाहायला मिळत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर डेपो जवळ ही अशीच स्थिती आहे.
डॉ सुनिता पाटील ,सायली विचारे करणार पक्षप्रवेश
आज थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष होणार
महायुतीत मित्र पक्षांमध्येच रस्सीखेच सुरू
नाशिकच्या लासलगावमध्ये दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री गणेश मंदिरात दोन अज्ञात चोरांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या दोन समय चोरून नेल्या. तर गणेश नगर येथील श्री दुर्गा माता मंदिरातही चोरीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. येथे मंदिरातील चांदीचा टोप, तसेच चांदीचे कासव यांसारख्या मूल्यवान धार्मिक वस्तूंची चोरी करण्यात आली याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत चोरीच्या घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे
वाशिम कारंजा तालुक्यातील धनज बु येथील श्री पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली, यात मंदिरातील चांदीची दोन मुकुटे, चांदीची छत्रे ९, चांदीचे तोरण ३, चांदीचे दिवे, यंत्रे आणि चोवीसी असे एकूण १९ किलो चांदी आणि मंदिरातील दोन दान पेट्या फोडून त्यामधील ४० हजार रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
नियमित सकाळी पुजारी ६ वाजता मंदिर उघडण्यासाठी गेले असता मंदिराचे कुलूप फुटलेले दिसून आले. पुजारी यांनी सदर घटनेची माहिती मंदिर विश्वस्तला दिली.त्यानंतर विश्वस्तांनी धनज पोलिसांनी चोरी बाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, अकोला येथील श्वान पथक , फॉरेन्सिक पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट हे सुद्धा मंदिरात दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर झटका
मागच्या वर्षी संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे राजू शिंदे UBT शिवसेना सोडून आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार
शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी यांचा UBT शिवसेनेला जय महाराष्ट्र, आज भाजपमध्ये प्रवेश करणार
वैजापूर शहरातून उद्धव ठाकरे शिवसेना अस्तित्व जवळपास संपुष्टात, सचिन वाणी सोबत पदाधिकारी शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत
दोन विसापूर्वी सचिन वाणी यांनी शिवसेनेच्या समर्थकासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषद मध्ये नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे, पांढरी प्रभाग क्रमांक 10 ब मधून अल्लाह कलोती हे नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे, नगराध्यक्ष पदासाठी कलोती यांचे नाव समोर होते मात्र राजकीय गणित पाहता त्यांनी नगराध्यक्ष पदा बाबद माघार घेत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याचे ठरवले, अल्लाद कलोती विजयी झाल्यास उपनगराध्यक्ष पदाची संधी त्यांना मिळणार आहे, थेट मुख्यमंत्र्यांचे सख्खे मामेभाऊ नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या ठिकाणच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
फेसबुक वरून अर्थव साळवी यांनी रत्नागिरीकरांना भावनिक पत्र लिहले. रत्नागिरीकर आणि प्रभाग क्रमांक १५ मधल्या जनतेला स्टेटस् द्वारे लिहले पत्र.
पक्ष निष्ठा या आशयाखाली मनातील भावना व्यक्त केली. महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे. नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही. राजकारण बदलू शकतं... पदं येतात-जातात... पण नातं ? ते मात्र कायम राहतं - तुमचं आणि माझं, असे त्यांनी म्हटलेय.
पुणे महानगरपालिकेत आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली असून याबाबत सगळ्यांनी नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी बंद झाल्याने ही कार्यालये धर्मशाळा बनल्या सारखी अवस्था झाली होती. हा प्रकार "साम टिव्ही" ने समोर आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने बायोमॅट्रीक हजेरी घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करून महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ६० मशीन बसविण्यात येणार आहेत. सर्व खातेप्रमुख व उपायुक्तांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंदणी करून घ्यावी असे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत
औसा नगर परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्याने सुरस वाढली आहे. महायुतीतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत असल्याने औसा नगरपरिषद निवडणूक यंदा चुरशीची पाहायला मिळणार आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माझी जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांचे नातेवाईक सौ . परविन शेख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर काल शक्ती प्रदर्शन करत भाजपने देखील डॉ. ज्योती बनसोडे यांना नगराध्यक्ष पदाच तिकीट जाहीर करत रिंगणात उतरवलय, यामुळे औसा नगरपरिषदे मध्ये यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत राहणार आहे. तर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे जिल्ह्यात ३९८ नगरसेवक पदासाठी जागांसाठी २ हजार ६७१ अर्ज दाखल तर नगराध्यक्ष पदाच्या १७ जागासाठी १९३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत
अर्ज दाखलकरण्याची काल शेवटची तारीख होती
नगराध्यक्ष पदासाठी बारामतीमध्ये सर्वाधिक अर्ज
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी सदस्य पदाच्या ३९८ जागांसाठी २ हजार ६७१ तर नगराध्यक्ष पदाच्या १७ जागांसाठी १९३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा सर्वाधिक अर्ज बारामती मध्ये नगरपरिषदेतील सदस्य पदासाठी २९८ आणि नगराध्यक्ष पदासाठी २२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिकच्या लासलगावमध्ये दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री गणेश मंदिरात दोन अज्ञात चोरांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या दोन समय चोरून नेल्या. तर गणेश नगर येथील श्री दुर्गा माता मंदिरातही चोरीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. येथे मंदिरातील चांदीचा टोप, तसेच चांदीचे कासव यांसारख्या मूल्यवान धार्मिक वस्तूंची चोरी करण्यात आली याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत चोरीच्या घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे
नगरपालिका निवडणुकी साठीचा उमेदवारी अर्ज सादर करण्याची कालची शेवटची तारीख होती. त्यामुळे सर्वपक्षीयांनी नगरपालिकेत मोठी गर्दी केली होती. अशातच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप नेते एकाच वेळी नगरपालिकेच्या बाहेर पडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्या समर्थनात घोषणाबाजी झाली. एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाला साजेसे असेच चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करताना काही काळ वातावरण चिघळण्याच्या स्थितीत होते. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचा विजय असो तर भाजप कार्यकर्त्यांकडून योगेश भैय्या तुम आगे बडोच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या हाय होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज बु.इथ घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपोयागी साहित्य व एक दुचाकी जळून पूर्ण पणे खाक झाली आहे. तर पाच बकऱ्यांना वाचविण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून,ही आग एवढी भीषण होती की, कारंजा येथून अग्नीशमन दलाची गाडी पोहचेपर्यंत आग परिसरातील अन्य घरापर्यंत पोहचली असता धनज पोलिसांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार..
जिल्ह्यात महायुती होण्याची चिन्हे संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत
भाजपाने आता जिल्ह्यात एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारांची यादी केली जाहीर.
ओबीसी आरक्षण असू देत किंवा इतर कारणांमुळे रखडत गेलेल्या पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत अक्षरशः उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. नगराध्यक्ष पदाच्या 11 जागांसाठी 212 तर नगरपरिषद सदस्यांच्या 286 जागांसाठी 2541 अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे सरासरी एका सदस्यासाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेसाठी सर्वात जास्त 359 अर्ज दाखल झाले आहेत, तर जळगाव जामोद नगर परिषदेसाठी सर्वात कमी 167 अर्ज दाखल झाले आहेत. आता पुढील चार दिवस उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील उमेदवारांचा चित्र स्पष्ट होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात रोज तापमानाचा घसरत असल्याने जिल्ह्यात थंडीने चांगलीच हुडहुडी भरला आहे.नाशिकच्या निफाड मध्ये पारा 6.9 अंश तर मालेगाव मध्ये पारा १० अंशावर गेला आहे.त्यामुळे थंडी पासून बचावा साठी शेकोट्यांचा आधार घेत असल्याच पहावयास मिळत आहे
अहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक तपासणीच्या कारणाने बंद केलेली पुणे–सिंगापूर विमानसेवा गेल्या चार महिन्यांपासून सुरू झालेली नाही
एअर इंडियाच्या ताफ्यातील तांत्रिक अडचणींमुळे डीजीसीएने तपासणीचे आदेश दिल्यानंतर ही सेवा थांबवण्यात आली होती
प्रवासी मागणी भरपूर असूनही विमान कंपनीकडून सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही
परिणामी पुणेकरांना मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद इथून सिंगापूरला जावे लागत आहे. वाढीव वेळ, वाढलेला खर्च आणि कनेक्टिंग फ्लाइट्सच्या गैरसोयीमुळे नाराजी व्यक्त होत आहे
पुणे विमानतळावरून सिंगापूर विमान सेवा लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी आणि उद्योजकांकडून होत आहे
सध्या पुण्यात गुलाबी थंडी पसरलीय आणि या थंडीचा नागरिक आनंद घेताना दिसतात. सकाळच्या सत्रामध्ये पारा अधिक खाली येत असल्याने या गुलाबी थंडीत पुणेकर मोठ्या प्रमाणात व्यायामाला पसंती देत असल्याचे दिसून येतंय. थंडीच्या काळात व्यायाम करणे म्हणजे उत्तम आरोग्यासाठी लाभदायक असते. याच निमित्ताने पुण्यातील सारसबागेत उत्कर्ष ग्रुपकडून दररोज पहाटे पासून याठिकाणी व्यायामशाळा भरवली जाते. विशेष म्हणजे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सहभाग असतो तेही निःशुल्क. मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने गारठू लागले आहेत. शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत आहे असं असलं तरीसुद्धा सारसबागेतील ही गँग मात्र व्यायामात घामाघूम होते.
भाजप यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढत असून यवतमाळ पालिकेत ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाल्याने काॅग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटांनी स्वत्रंत उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे केले आहे.तर भाजपने प्रस्थापितांच्या उमेदवारीला कात्री लावली आहे. 29 पैकी 14 जणांची उमेदवारी कापण्यात आली तिथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली शेवटच्या क्षणी काहींना उमेदवारी आणण्यात यश मिळाले.यवतमाळ पालिकेत चौरंगी लढत होणार आहे.
बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वीच काँग्रेस आणि वंचित ने पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली होती. मात्र काल बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. लक्ष्मीबाई काकस यांनी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वंचितनेही उच्चशिक्षित असलेल्या डॉ. संगीता अर्जित हिरवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे मात्र आता काँग्रेस उमेदवारापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानेच हा अर्ज दाखल केल्याच वंचितच्या डॉ. संगीता हिरोळे यांनी म्हटले आहे. डॉक्टर संगीता हिरोळे या उच्चशिक्षित असून बुलढाण्यातील समाजसेवा क्षेत्रातील मोठे नाव असलेले अमोल हिरोळे यांच्या सुनबाई आहेत. यात मात्र डॉक्टर संगीता हिरोळे यांच पारडं जड असल्याने काँग्रेस पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वंचितच्या उमेदवार डॉ.संगीता हिरोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी....
जालन्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भोकरदन नगरपरिषदेत सर्वच पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी करत अर्ज दाखल केले आहे. तर परतुरला प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांनी नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवर अर्ज दाखल केले आहे तर दुसरीकडे अंबड नगरपरिषदेत परिषदेत भाजपने रासपला सोबत घेऊन उमेदवारी जाहीर केली असून आघाडी बाबत सध्यातरी निर्णय झालेला नाही. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे त्यानंतरच युती आणि आघाडीचे चित्र जिल्ह्यामध्ये स्पष्ट होणार आहे.युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.राज्यात बदललेल्या समीकरणाचा परिणाम स्थानिक पातळीवरील दिसत असल्याने युती आणि आघाडीतअडचण दिसत आहे.त्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच पाहायला मिळते
ईश्वरचिठ्ठीने अनेकवेळा अनेकांची लॉटरी लागल्याचं आपण पाहिलंय. मात्र, ईश्वरचिठ्ठी हे बरेचदा मतदान झाल्यानंतर समान मतं मिळाल्यावर काढली जातेय. मात्र, वंचित बहूजन आघाडीने अकोला जिल्हातील तेल्हारा नगरपालिकेत एक वेगळीच शक्कल लढवलीय. तेल्हारा नगरपालिकेसाठी वार्ड क्रमांक '8 अ' या अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव प्रभागात चार जण दावेदार होतेय. चौघीनीही उमेदवारीसाठी मोठी लॉबिंग केली होतीय. पक्ष कुणाला उमेदवारी द्यावी, या संभ्रमात असल्याने नेत्यांनी एक भन्नाट आयडिया काढलीय. पक्षाने चारही उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या एका बरणीत टाकल्यात. त्यातून एक चिठ्ठी काढण्यात आलीय. शेवटी यात कल्पना हिवराळे यांचं नशीब फळफळलंय. त्यांचं नाव ईश्वरचिठ्ठीत निघाल्याने पक्षाची अधिकृत उमेदवारी हिवराळे यांना देत पक्षाचा 'एबी फॉर्म' देण्यात आलाय. याचा video समोर आलाय.. दरम्यान, ईश्वरचिठ्ठीचा निर्णय दोघांनी मान्य केलाय. तर एका इच्छूकाने मात्र, ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलीय. वंचितने तेल्हारा नगरपालिकेत केलेल्या या राजकीय प्रयोगाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतीये.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली
तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गारठणार
राज्यात सर्वाधिक किमान तापमान अहिल्यानगर मध्ये
अहिल्यानगर मध्ये ९.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ९.५
नाशिक: ९.६
यवतमाळ: ९.६
जळगाव: ९.८
मालेगाव: १०
गोंदिया: १०
पुणे: १०.२
बीड: १०.२
वाशीम: १०.४
नागपूर: १०.५
अमरावती: १०.५
महाबळेश्वर: ११
सातारा: ११.९
सांगली: १३.७
सोलापूर: १४.९
खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद
शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, पाणी पुरवठा विभागाची माहिती
पाणी पुरवठा बंद असलेला भाग पुढील प्रमाणे
पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, पर्वती एलएलआर टाकी परिसर, वडगाव शुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, एसएनडीसी एलएलआर टाकी, एसएनडीटी एमएलआर टाकी, चतुःश्रृंगी टाकी, होळकर जलकेंद्र टाकी, खडकवासला जॅकेवेल, वारजे फेज क्रमांक एक व दोन, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, नव्याने समाविष्ट गावातील गावांचे बूस्टर केंद्र.
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी एक डिसेंबर रोजी राज्यभरातील २० शहरात ऑनलाइन परीक्षा
या परीक्षेसाठी ४२ हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने बांधकाम, पथ, मलनिःसारण, पाणी पुरवठा, प्रकल्प आदी विभागातील कामांचा खोळंबा
त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीला प्राधान्य दिले जात आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.