

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
घटना स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
आग लागल्या मुळे बिल्डिंग केली रिकामी
खेड तालुक्यातील रेटवडी येथील शेतशिवारात लहान मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला
मुलाच्या गळ्यावर बिबट्याकडुन गंभीर जखमा
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल
बिबट्याच्या हल्ल्याने रेटवडी परिसरात दहशत
बिबट्याचे हल्ले कधी थांबणार असा प्रश्न नागरिक विचारत आहे
ख्यमंत्री म्हणतात की आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग बदलण्याचा विचार करतोय. हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे. शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता काही गरजेचा नाही.
दिवसभर पुणे शहरात उकाडा जाणवत होता. आज उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. आठ ते दहा दिवसानंतर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.
धनगर समाजाच श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाची यात्रा पार पडत असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीर देवाचे दर्शन घेतलेय. बाबीर देवाच्या दर्शनासाठी गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणे यांना अक्षरशः स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं.
माढा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेले हल्ल्यात एका घोड्याचा व रेडूकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना माढा तालुक्यातील मानेगाव परिसरात घडली आहे.
भाऊबीज निमित्ताने सावळ्या विठुरायाला पारंपारिक व मौल्यवान दागिन्यानी सजवण्यात आले आहे. देवाच हे सजलेले रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. आज बहिण भावाच्या अतुट नात्याला अधिक घट्ट करणारा भाऊबीज सण मंदिरात धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊबीजेच्या निमित्ताने विठुरायाला भरजरी महावस्त्राचा पोशाख परिधान करण्यात आला. त्यावर विविध पारंपारिक मौल्यवान 17 प्रकारचे दागिन्यांचा साज करण्यात आला आहे.
बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात,,,,,, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ
नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आज एक अनोखं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंघोळ करून भाऊबीज साजरी करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच उपवर्गीकरण करण्याची मागणी करत लोकराज्य आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे.अशातच नागपुर जिल्ह्यात काँग्रेसला वगळून भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न शरद पवारांची राष्ट्रवादी करीत आहे.यासंदर्भात पुढाकार घेण्याचा हा प्रयत्न केला असून सेक्युलर पक्षाला एकत्र करून येणारी निवडणुकीला सामोर जाण्याच्या प्रयत्न असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी केला आहे
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात अभिनेत्री खुशी मुखर्जी हिच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिल्यानंतर घडलेली घटना गोंधळात परिवर्तित झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन -चार दिवसांपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही दुपारनंतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. कुडाळ, सावंतवाडीसह मालवण तालुक्याच्या काही भागात विजांच्या लखलखाट व गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे भात पिकाला फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
धुळ्यातील शिरपूर येथील दूध भेसळ प्रकरण दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस
धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाची ऐन दिवाळी च्या दरम्यान एकही टीम सक्रिय नसल्याचा प्रकार उघडकीस
शिरपूर येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी चक्क जळगाव येथून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी झाले दाखल
सकाळी आठ वाजता दूध भेसळीचा व्हिडिओ उघडकीस आल्यानंतरही आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चक्क संध्याकाळी चार वाजता शिरपूर मध्ये तपासणीसाठी पोहोचले
दिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ त्याचबरोबर इतर अन्य पदार्थांमध्ये भेदळीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता असताना अशा परिस्थितीमध्ये दोन जिल्ह्यांमध्ये अन्न व औषध प्रशासन करता ये तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे भाऊबीजेचा सण पारंपरिक आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या लाडक्या बहिणींसह स्नेहपूर्वक भाऊबीज साजरी केली.
भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त बहिणींनी कृषीमंत्र्यांना ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यासाठी प्रार्थना केली.या प्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी बहिणींना भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
- पंचवटी पोलिसांना सिनेस्टाईल पद्धतीनं फरार आरोपीला पकडण्यात यश
- गुन्हा रजिस्टर क्रमांक 471/2025 अंतर्गत आरोपी किरण जितेंद्र भडांगे 4 ऑक्टोबरपासून होता फरार
- क्रांतीनगर परिसरात आरोपी दिसल्याची माहिती मिळताच पोलिसांचा वेगवान पाठलाग
- पोलिसांची चाहूल लागताच आरोपीचा मोटरसायकलवरून पळण्याचा प्रयत्न
- गुन्हे शोध पथकाने कसोशीने आरोपीला पकडले
- आरोपीला अटक करून न्यायालयात हजर, पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू
- पोलिसांच्या कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
मुलुंड ऐरोली ब्रिजवर भीषण अपघात
बी इ एस टी बस आणि टेम्पोमध्ये धडक
या अपघातात बस मधीलसात जण गंभीर जखमी जखमींना मुलुंड मधील सावरकर रुग्णालयात दाखल
धडकेमध्ये बसचा समोरील भाग मोठ्या प्रमाणात नुकसान
घटनास्थळी मुलुंड नवघर पोलीस दाखल
मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की, पक्षाचा निर्णय हा फक्त काँग्रेस पक्षच घेईल आणि कोणत्याही दबावाखाली घेतला जाणार नाही असे स्पष्ट विधान काँग्रेस प्रवृत्ती सचिन सावंत यांनी केले आहे.
या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देणे हेच काँग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रत्येक बूथवर काँग्रेसचा झेंडा आणि चिन्ह पोहोचावे, या हेतूने पक्ष संघटनशक्ती वाढवण्यावर भर देत आहे.
यावेळी पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे — काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी निवडणुकीची रणनिती आणि आघाड्यांचा निर्णय स्थानिक नेते, मुंबईचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेतृत्व यांच्या चर्चेनंतर घेतला जाईल.
अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसला तरी, लवकरच याबाबत स्पष्टता येईल, असेही सांगण्यात आले. तसेच, इतर पक्षांना चर्चेसाठी स्वातंत्र्य देण्यात आले असून, त्यांच्या सूचनाही ऐकल्या जातील; मात्र अंतिम निर्णय काँग्रेसचे नेतृत्वच घेईल, असे ठाम विधान काँग्रेसकडून करण्यात आले आहे
किरकोळ वादातून पुण्यात पी एम पी बस चालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे भेकराई नगर ते भोसरी या बस चालकाकडून एका व्यक्तीला शिवीगाळ करण्यात आली. या वेळी दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर बस चालकाने थेट बस मधून उतरत या व्यक्तीला कानशिलात लावली ज्यामुळे या व्यक्तीचा चष्मा तुटला. यानंतर सुद्धा पी एम पी बस चालकाने या व्यक्तीला मारहाण करणे थांबवले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पी एम पी बस चालकाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे.
धाराशिव च्या कळंब तालुक्यातील आंदोरा गावात यश मेडिकल फाऊंडेशन व गावकऱ्यांच्या वतीने पुर परिस्थितीत अडलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचा क्षण देण्यासाठी बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातुन रथातुन बळीराजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली,बैलगाड्या आणि पारंपरिक कलाप्रकार यावेळी सादर करण्यात आले तर शेतऱ्यांच्या जिवाशी निगडीत जातं,उकळ,चाडे,पेरणी यंञ अशी पारंपरिक शेती उपकरणे यामध्ये ठेवण्यात आली होती तसेच यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीसंबंधी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी महिला व पुरुष शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकांच्या तोंडावर अनेकदा राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जाते. अशा परिस्थितीत, अतुल खूपसे पाटील यांचा हा उपाय कार्यकर्त्यांना दिलासा देणारा आणि सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे संदेश देणारा ठरत आहे.
या संदर्भात अतुल खूपसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, "शेतकरी आणि वंचित घटकांसाठी आवाज उठवल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याची भीती नेहमीच असते. या आधुनिक साधनांचा वापर करून आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि सत्य लोकांसमोर ठेवू."
अतुल खूपसे पाटील यांच्या या अभिनव उपक्रमामुळे, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकजण या पद्धतीचे कौतुक करत असून, इतर कार्यकर्त्यांनाही यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यासह राज्यात आज भाऊबीजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय. याच निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला भाविकेला ओवाळणी म्हणून १० रुपये देण्यात येतायत.
दिवाळीच्या निमित्ताने सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. दरवर्षी यंदा सुद्धा श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट कडून सकाळपासून हा उपक्रम राबवण्यात येत असून महिला सुद्धा ही ओवाळणी घेण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करताना दिसतायत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे.
मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे.. या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याचा दावा बाळासाहेब सानप यांनी केला आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे असे हे बाळासाहेब सानप यांनी म्हटले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागावर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना एक प्रकारे आव्हान आहे
दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मनमाड शहरातून संध्याकाळी रेड्यांना सजवून त्यांची गवळी समाजाकडून मिरवणूक काढली जाते.त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी गवळी समाज व दुध उत्पादक विक्रेते यांच्या कडून रेड्यांच्या झुंजीच आयोजन केले जाते.
वर्षभर रेड्याला खाऊ घातल्या नंतर त्याची किती ताकद आहे हे आजमावण्यासाठी या टकरींचे आयोजन केले जाते.यात जो रेडा टक्कर जिंकतो त्याच्या मालकाला सन्मानित केले जातो.
गेल्या अनेक वर्षां पासून मनमाड शहरात ही परंपरा गवळी समाजाकडून पाळली जात असून रेड्यांची झुंज पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी
माणगाव शहर ते खरवली फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा
दिवाळी सुट्टीसाठी चाकरमानी आणि पर्यटक निघाले कोकणात
वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कोंडीचा फटका
पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा
भाऊबीज सण हा भाऊ बहिणीसाठी महत्त्वाचा सण मानला जातो
भाऊबीजेनिमत्त ठाकरे बंधू एकत्र बहिणीच्या घरी दाखल झाले आहेत
आरएसएसवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने निदर्शने सुरू
क्रांती चौकात विविध आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनाकडून निदर्शने
धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आरएसएस अग्रेसर असल्याचा आरोप
भाऊबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली. पारंपरिक रितीरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हातांनी मंत्री गोगावले यांना तिलक लावून आरती करून ओवाळणी केली.
या वेळी आदिवासी भगिनींनी परतबागेतील केळी आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमळ भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुखसमृद्धीची शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू, असा विश्वास यावेळी मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. ग्रामीण आणि आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला.
संगमनेर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर विखे पाटलांनी थोरात यांच्यावर टीका करत या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हंटले होते.
बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा मतदार यादीतील घोळाबाबत नवा दावा करत संगमनेर शहरातील आकडा जोडला तर बोगस मतदारांची संख्या 15 हजारांपर्यंत जाऊ शकते असा आरोप केलाय.
निवडणुकीत घोटाळे घालण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाने आणली असून मतदार याद्यांमधील घोळ हा त्यातलाच एक फंडा असल्याचे म्हंटले आहे.
हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जालना शहरात मागच्या सात दिवसापासून विजय चव्हाण या बंजारा समाज बांधवाचं आमरण उपोषण सुरू आहे.
मागच्या काही दिवसापासून राज्यभरात एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला.प्रशासनाकडून मागण्या संदर्भात कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे बंजारा समाज बांधवांतर्फे 25 तारखेला जालन्यामध्ये जेलभरो आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी दिली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांचे कुटुंबीय गेली पाच पिढ्यान् पासून दिवाळी सण हा वंचित बांधवांना सोडत साजरा करत आहेत. हिच धस कुटूंबांची परंपरा आज हि आमदार सुरेश धस यांनी सुरू ठेवली आहे. काल दिपावली पाडवा निमित्त आपल्या आष्टी येथील निवासस्थानी हजारो वंचित बांधवांना सोबत दिवाळी साजरी केली आहे.
यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की पालावरील ज्या व्यक्तींच्या जिवनातील अजून पहाट झालीच नाही आशा व्यक्तीनं सोबत दिवाळी साजरी करत आहे. शेतकऱ्यांच्या धैयाला सलाम करायला हवा आहे, मोठ्या धैयाने शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली आहे.
100 टक्के नाही पण थोडयाफार शेतकऱ्यांच्या खात्यात लक्ष्मी पूजनाला पैसे झाले आहेत आणि होतात पण असं आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.
दिवाळीच्या सणामुळे गावागावांत फटाक्यांचा आवाज सुरू असतानाच, काल रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खुटवड वस्ती परिसरात एक जखमी कोल्हा आढळून आला.
प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळीच्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कोल्हा घाबरून गावातून बाहेर पळत आला आणि महामार्गावर आल्यावर वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला.
हिंगोली -
हिंगोलीत स्वबळाचा नारा दिलाय आता फेरबदल नाही
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आदेश मिळाल्यानंतरच निर्णय घेतला
शिवसेना जिल्हा परिषद, पंचायत आणि नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवणार
आचारसहिता लागणे आधीच हिंगोलीत भाजप शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात
मीरा भाईंदर -
काशिमीरा परिसरात मोठी दुर्घटना गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी
ग्रीन व्हिलेज बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर घडली धक्कादायक घटना.
घर बंद असताना गॅस लिकेजमुळे संपूर्ण घरात भरला गॅस...
तरुणीने दरवाजा उघडून लाईट लावल्यावर झाला स्फोट तरुणी मोठ्या प्रमाणात झाली जखमी दवाखान्यात केले दाखल
फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरु आहे.
सांगली-
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केला.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीकडुन भाऊबीज साजरी केली.
बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर याना पारंपरिक पद्धतीने औक्षण करत भाऊबीज साजरी केली यावेळी दोघा भावा बहिणीचे अतूट नाते दिसून आले.
कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत
फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी आरोपीचा दुकानदारावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला!
हल्लेखोर सराईत गुन्हेगार; एमपीडीएखाली दीड वर्ष तुरुंगात राहून नुकताच सुटलेला आरोपी पुन्हा सक्रिय!
रत्नागिरी -
सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरूवात
रत्नागिरीती हॉटेल्स, रिसॉर्टस पर्यटकांनी हाऊसफुल्ल
पर्यटकांची किनारपट्टी भागातल्या हॉटेल्स, रिसॉर्टसला सर्वाधिक पसंती
कर्दे, हर्णे, गुहागर, गणपतीपुळे, तारकर्ली, मुरुड किनारपट्टीवरची हॉटेल्स फुल्ल
अकलूजमध्ये म्हशी पळवण्याची शर्यत
दिवाळीच्या निमित्ताने अकलूजमध्ये म्हशी पळवण्याची शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली.
येथील गवळी समाजाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अकलूजचे माजी सरपंच शिवतेज मोहिते पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
नागपूर -
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिवाळीच्या सुट्टयात विद्यार्थीनीसाठी अंशकालीन न्यायालयाने सुनावणी घेत दिलासा दिला.
- जातपडताळणी समिती विरोधात असलेला दावा मान्य करत तात्पुरता दिलासा दिला...
- विद्यार्थिनी पल्लवी घरत हिची जात माना असून ती अनुसूचित जमातीमध्ये मोडते...
- अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तिला तात्पुरता प्रवेश देण्यात आला होता.
- मात्र माना अनुसूचित जमातीच्या जातीचा दावा जात पडताळणी समितीने फेटाळला...
- कागदपत्रे प्राप्त करताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने प्रवेश रद्द होण्याच्या मार्गावर होता.
- या विरोधात विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
- उच्च न्यायालयाने तिच्या प्रवेशाला संरक्षण प्रदान देत दिलासा दिला... प्रवेश होण्यापासून संरक्षण मिळालं..
नागपूर -
- गोंदिया नगर परिषदच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान, 2 याचिका झाल्या दाखल
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल
- याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप
- या संदर्भात विशाल अग्रवाल अशोक चौधरी आणि जहीर नाजीर अहमद यांनी एक तर शकील हमीद मंसुरी यांनी एक अशा दोन याचिका करण्यात आल्या दाखल
- 12 नोव्हेंबर ला होणार अंतिम सुनावणी, न्यायालय नेमका काय निर्णय घेतात, याकडे लक्ष...
नागपूर -
- नागपूरची हवा प्रदूषित, दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 204 चा टप्पा गाठला
- हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीच्या पावलावर नागपूरचे पाउल
- नागपूर मधील सिव्हिल लाईन्स परिसर सर्वाधिक हिरवळ असलेला परिसर असताना सुद्धा या परिसरातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली
- या शिवाय शहरातील इतर भागातील देखील हवेची गुणवत्ता श्रेणी खराब वर राहिली
कोल्हापूर -
नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने पुढच्या २० दिवसांत सादर करा
हाय पावर कमिटीचे नांदणी मठ आणि संबंधितांना निर्देश
नांदणी मठ,हाय पवार कमिटी, वनतारा आणि पेटा यांच्या डॉक्टरांच्या कमिटीने 31 ऑक्टोबरला वनतारा मध्ये जाऊन महादेवी हत्तीन जॉइंट इन्स्पेक्शन करण्याची ही दिले निर्देश
महादेवी संदर्भात आज हाय पॉवर कमिटी समोर झाली सुनावणी
29 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी
वाशिममध्ये गोदामात साठवून ठेवलेले सोयाबीन आगीत जळाले
वाशिम शहरातील पाटणी चौकात असलेल्या एका गोडाऊनमध्ये शेतातील काढनी नंतर साठवून ठेवलेल्या चाळीस क्विंटल सोयाबीनला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडलीये.
शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होतीये.
आगीची माहिती मिळताच वाशिम नगरपालिकेचे अग्निशमन दल एका बंबासह घटनास्थळी दाखल झाले होते.
आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत होते मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे..
चारकोप सेक्टर- 2 मध्ये इमारतीला आग
फटाक्याच्या आतषबाजीमुळे लागली आग
अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने अतिवृष्टी भागात दिवाळी किटचे वाटप
म्हात्रे यांच्या सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात सात लाख रुपयाच्या दिवाळी किटचे वाटप
वर्धा -
- वर्धाच्या शिवाजी महाराज चौकात अडीच हजार दिव्यांची आरस
- अडीच हजार दिव्यांनी साकारली चौकात शिवलिंग
- 'एक दिवा शिवभक्तांचा, शिवकन्यांचा आपल्या जाणता राजासाठी' या घोषवाक्य खाली उपक्रम
- मागील पाच वर्षांपासुन सुरु आहे उपक्रम
- वर्धा विभाग मोहीम अंतर्गत कार्यक्रम
- कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती
- पहिल्या वर्षी पाचशे दिवे लावत करण्यात आली होती उपक्रमाची सुरवात, पाचवा वर्ष असल्याने अडीच हजार दिव्यांची आरस
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करूत देण्यात आला जयघोष
नाशिक -
- नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला
- पाडव्याच्या रात्री नाशिकमध्ये निघाली रेड्यांची मिरवणूक
- पारंपरिक रेड्यांच्या मिरवणुकीतही उलटलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं प्रतिबिंब
- मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी सुरू आहे राजकीय गुन्हेगारांविरोधात पोलिसांची ऑपरेशन क्लीन अप कारवाई
- नाशिककरांकडून होतंय पोलिसांच्या कारवाईचं स्वागत
- नाशिकच्या पारंपरिक रेड्यांच्या मिरवणुकीत रेड्यांना सजवतांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा संदेश देण्यात आला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.