
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीच नुकसान झाल आहे , दरम्यान अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "नाम फाउंडेश" या सामाजिक संस्थेनकडून दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील पेरणी सुरळीत व्हावी, यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
नाम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ज्वारी, हरभरा, या रब्बी पिकांसाठी आवश्यक बियाण्यांचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सांगलीत पार पडले शेतकरी-उत्पादक खरेदीदार संमेलन
सांगलीमध्ये कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकरी-उत्पादक खरेदीदार संमेलन पार पडले आहे.
जिल्ह्यात पिकणाऱ्या प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना-व्यापार पेठ मिळावी, या उद्देशाने संमेलनाचा आयोजन करण्यात आला होता.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडले.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांना परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नये, शेतमालावर प्रकिया करण्याकडे भर दिले पाहिजे,असं आवाहन शेतकरयांना केले.
या संमलेनादरम्यान बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते..
तसेच या संमेलनाच्या माध्यमातून 14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार देखील पार पडला.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित
दिव्यांगत्वाचे ओळखपत्र सादर न करणे भोवले
यवतमाळ सीईओंच्या कारवाईने उडाली खळबळ
पुणे -
पुण्याच्या भोरमधील पाले येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक ओढ्यात पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना
कन्स्ट्रक्शन साइटवर सिमेंट घेऊन जात असताना वीसगाव खोऱ्यातील पाले येथील महादेवाच्या मंदिराजवळील ओढ्यावरील चढ चढताना, ट्रकमधील वजनामुळं चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उतारावरून पाठीमागे घसरून रस्त्याच्या कडेला पलटी झाला..
चालक तसेच क्लिनरने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उड्या मारल्याने सुदैवाने ते यात बचावले.. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही..
मात्र यामध्ये ट्रकच मोठं नुकसान झालय.
पुणे -
पुणे -सासवड रस्त्यावर पीएमपीएल बंद पडली
सासवड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
आज सकाळी सासवडवरून पुण्याकडे निघालेली पीएमपीएल वडकीजवळील दहावा मैल या ठिकाणी बंद पडली
बंद पडलेल्या बसमुळे फुरसुंगी पोलीस स्टेशनपासून वडकीपर्यंत वाहतूक कोंडी
याच ठिकाणी पालखी महामार्ग रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने त्यात वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
पुणे -
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
नवले ब्रीज संदर्भात मुरलीधर मोहोळ 11 11 वाजता घेणार बैठक
PMC ,PMRDA आणि NHAI चे अधिकारी बैठकीला उपस्थितीत असणार
नवले पुलावर सातत्याने होत असलेल्या आपघातांवर कसा आळा घालता येईल यावर होणार बैठक
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मुरलीधर मोहोळांनी घटनास्थळी दिली होती भेट
त्यानंतर आज उपाययोजना बाबत मोहोळ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.
नाशिक -
- बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा
- नाशिकच्या महात्मानगर परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शंका
- काल सायंकाळच्या वेळी एक बिबट्या केला होता जेरबंद
- बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ८ जण जखमी झालेत
- शहरात बिबट्या शिरल्याने वनविभागाकडून खबरदारी
- नागरिकांना दिलासा देण्यासाठी वनविभागाचा परिसरात रात्रभर मुक्काम
पांढरकवडा पालिकेची निवडणूक होणार तिरंगी
यवतमाळच्या पांढरकवडा पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करत इनिंग सुरू केली
भाजप व शिंदेसेना हे अजूनही वेट अँड वरच्या भूमिकेत आहे,त्यामुळे आगामी पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे
नगरपरिषदेत यंदा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे.यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षात मोठी आहे त्यामुळे युती किंवा आघाडी होण्याची शक्यता फार कमी आहे.
नागपूर -
- आमदार संदीप जोशी राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी.
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून.या कार्यकारणीत विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आली.
- ऑलिम्पिक संघटनेत विदर्भाचे प्रतिनिधित्व नव्हते या निमित्ताने आमदार संदीप जोशी यांची निवड करण्यात आली.
- महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात अमुलाग्र बदल आणि दिशा देण्यासाठी ही कार्यकारणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
धाराशिव -
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रब्बी पेरणीसाठी मदत
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 577 कोटी 54 लाख 46 हजार रुपयांची मदत मंजूर केली
मागील काही दिवसांपासून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आत्तापर्यंत तीन लाख 42 हजार 75 शेतकऱ्यांच्या खात्यावर 315 कोटी 36 लाख 2 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे
हेक्टरी 10 हजार रुपये रक्कम तीन हेक्टरच्या मर्यादीत बाधीत क्षेत्रानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.
अजुनही 1 लाख 64 हजार 689 शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी असुन ईकेवायसी नसणे यासह इतर बाबींमुळे ही रक्कम जमा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.