लोकसभा २०१९ निवडणुकीत भाजपला ३०० जागा मिळाल्यावर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं. आता ४०० जागा जिंकल्यास मथुरेत कृष्ण मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथ यांचं मंदिर बांधू, असं आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मतदारांना दिलं.
इतकंच नाही, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके देखील भारतात घेऊ, असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा देखील प्रचारात उतरले आहेत.
यावेळी त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. 'जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की एक काश्मीर भारतात आणि दुसरे पाकिस्तानमध्ये आहे. पीओके खरोखर आपला आहे, यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही, अशी टीका सरमा यांनी केली.
सध्या पीओकेमध्ये दररोज निदर्शने होत आहेत. पाकिस्तानमधील लोक भारताचा तिरंगा झेंडा घेऊन पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. जर मोदीजींना ४०० जागा मिळाल्या तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल, असंही हेमंत बिस्वा सरमा म्हणाले.
भाजप सरकार देशात आरक्षण मजबूत करण्यासाठी काम करत आहे. पीएम मोदी स्वतः मागासवर्गीय असून गेल्या १० वर्षांपासून मोदी सरकार आरक्षण बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसला देशातील एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे. त्यांनी याची सुरुवात कर्नाटकातून केली आहे, असा आरोपही हिमंता बिस्वा सरमा यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.