

हिंदू धर्मात चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. २०२६ मध्ये एकूण चार ग्रहणं दिसून येणार आहेत. परंतु भारतात फक्त एकच ग्रहण दिसणार आहे. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे. ज्याला छोटी होळी असंही म्हणतात. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सुतक काळ देखील वैध ठरणार आहे.
३ मार्च रोजी होणारं चंद्रग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी ६:४७ पर्यंत चालणार आहे. हे ग्रहण ३ तास २७ मिनिटं चालेल.
पेनुम्ब्रा टप्पा: दुपारी २:१६ पर्यंत
पेनुम्ब्रा टप्पा सुरू होतो: दुपारी ३:२१
उम्ब्रा टप्पा संपतो: संध्याकाळी ६:४६
पेनुम्ब्रा टप्पा संपतो: संध्याकाळी ७:५२
या चंद्रग्रहणाचा सुतक काळ ३ मार्च रोजी सकाळी ६:२० वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी ६:४६ पर्यंत चालणार आहे. मुलं आणि वृद्धांसाठी सुतक काळ दुपारी ३:२८ ते संध्याकाळी ६:४६ पर्यंत असणार आहे.
मंगळवारी ३ मार्च २०२६ रोजी बंगालच्या ईशान्य भागात तसंच मिझोराम, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्य राज्यांमध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे.
२०२६ मधील हे पहिलं चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र आणि सिंह नक्षत्रात लागणार आहे. असं मानलं जातंय की, या ग्रहणाचा सिंह राशी आणि या नक्षत्राच्या लोकांना सर्वात जास्त परिणाम होणार आहे.
हिंदू श्रद्धेनुसार, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणापूर्वीचा काळ सुतक काळ म्हणून ओळखला जातो. हा काळ अशुभ मानला जातो. या काळात स्वयंपाक करणं, काहीही खाणं, धार्मिक विधी करणं आणि शुभ कामं करणं टाळलं जातं. यावेळीत मंदिराचे दरवाजे देखील बंद असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.