
मधुमेह ही एक सामान्य समस्या आहे. सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना या समस्येचा सामना करवा लागतो. ही एक चयापचय प्रक्रिया असून ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याला मधुमेह म्हणतात. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.
मधुमेहात, शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही. त्यामुळे साखरेची पातळी वाढते. मधुमेहामुळे हृदय, किडनी आणि डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. साखरेची पातळी वाढल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर साखरेची पातळी बदलू शकते. अशावेळी जेवल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे हे जाणून घेऊया.
जेवणानंतर २ तासांनी साखरेची पातळी तपासली जाते. डॉक्टर जेवणानंतर दोन तासांनी साखरेची पातळी तपासण्याची शिफारस करतात. जेवणानंतर २ तासांनी रक्तातील साखरेची पातळी १२० ते १४० mg/dL दरम्यान असावी. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी या मर्यादेत असेल तर ती व्यक्ती निरोगी असते.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, रक्तातील साखरेची पातळी जेवणानंतर २ तासांनी १८० mg/dL असली पाहिजे. जर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी यापेक्षा जास्त असेल तर ही स्थिती खूप गंभीर होऊ शकते.
गोड किंवा जास्त तळलेले पदार्थ खाणं टाळावं.
साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धान्यांचा आहारात समावेश करावा.
कार्बोहायड्रेट आणि अनहेल्दी फॅट्स टाळलं पाहिजे.
भाज्यांमध्ये फायबर असतं, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.
नियमितपणे योगा किंवा व्यायाम करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.