प्रत्येक व्यक्तीपासून प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पाण्याअभावी अनेकदा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे फिरायला जायचे असो किंवा ऑफिसला बॅगेत पाण्याच्या भरलेली बाटली असणे महत्त्वाचे आहे.
प्रवासात असो किंवा घराबाहेर पडताच प्रत्येकाला घामाचा भयानक त्रास होतो. त्यामुळे प्रवासात किंवा ऑफिसला जाताना तुमच्या बॅगेत टिश्यू असणे गरजेचे आहे.
जवळचा प्रवास असो किंवा जवळचा प्रवास कायम तुमच्या सोबत छत्री तसेच स्कार्फ असणे महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टींची कधीही आवश्यकता भासू शकते.
सनग्लासेसच्या वापराने डोळ्यांचे संरक्षण होते. घराच्या बाहेर पडल्यानंतर धुळीच्या कणांमुळे तसेच कडक उन्हामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
दिवसभर काम योग्यरित्या होण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे फिरायला जायचे असो किंवा ऑफिसला बॅगेत काही खाण्याचे पदार्थ असणे महत्त्वाचे आहे.
सध्या बाहेरील वातावरणामुळे चेहऱ्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. सनस्क्रीन लावल्याने चेहरा तेजस्वी दिसण्यासही मदत होते.
कोविडच्या दिवसांपासून प्रत्येकजण प्रवास करताना हमखास सॅनिटायझर वापरताना दिसतो. यामुळे तुम्हाला जेवताना पाण्याने हात धुण्याची आवश्यकता नसते.
प्रवासात किंवा ऑफिसला जाताना कधी कोण आजारा पडू शकतो काही सांगता येत नाही. त्यामुळे फिरायला जायचे असो किंवा ऑफिसला बॅगेत महत्त्वाची औषधे असणे गरजेचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.