पाऊस आनंदासोबत अनेक समस्या देखील घेऊन येतो. ज्या लोकांना चष्मा असतो त्यांना पावसात चष्म्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.
पावसात चष्मा वापरताना नेहमी मऊ सुती कपडा सोबत ठेवा आणि त्याने चष्मा पुसा.
पावसाच्या पाण्याने चष्मा कितीही ओला झाला तरी साध्या पाण्याने चष्मा धुणे गरजेचे आहे.
पावसात आपले कपडे ओले राहतात त्यामुळे कधीही शर्ट, साडीचा पदर यांनी चष्मा कधीही पुसू नये. तसेच कपड्यांवर धूळही असते आणि ती धूळ चष्म्याच्या काचांवर लागते. परिणामी चष्म्याची फ्रेम लवकर खराब होते.
पावसात वातावरणातील गारव्यामुळे चष्मा चिकट होतो. अशावेळी चष्मा लिक्विड सोप किंवा चष्मा स्वच्छ करणाऱ्या लिक्विड ने धुवावा.
चष्मा पुसताना कधीही काच रगडू नये. त्यामुळे काचेवर ओरखडे पडू शकतात.
पावसात चष्मा काढ-घाल करण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे चष्मा भुवयांच्या तुलनेत सरळ बसतोय का याची खात्री करून घ्यावी. तसे होत नसल्यास चष्माच्या दुकानात जाऊन चष्मा दुरुस्त करून घ्यावा.
पावसात सैल चष्मा घालणे टाळा. कारण पावसाच्या पाण्यामुळे आधीच चष्मा खाली पडत असतो. त्यात जर तो सैल असेल तर चष्मा खाली पडून तुटण्याची शक्यता वाढते.
पावसात चष्मा खराब होण्याचे किंवा हरवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्तीचा एक साधा चष्मा आपल्या सोबत कायम ठेवा.
चष्मा असलेल्या लोकांनी पावसात छत्रीचा वापर शक्यतो टाळा आणि जास्तीत जास्त प्रमाणात रेनकोट घाला. यामुळे चष्मावर पाणी पडण्याची शक्यता कमी असते. तसेच रेनकोट असल्यामुळे तुम्ही सहज चष्मा पुसू शकता.
जास्त पावसात जर तुम्ही चष्मा काढून ठेवणार असाल तर चष्म्याचा बॉक्स नेहमी तुमच्या सोबत ठेवा. यामुळे प्रवासात चष्मा सुरक्षित राहील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.