मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. जर ते कमजोर होत असेल, तर शरीर काही संकेत देते. मूत्रपिंड निकामी होण्याची प्रमुख लक्षणे म्हणजे, थकवा, हात-पाय सुजणे, लघवीत बदल (वारंवार किंवा कमी येणे, फेनासारखी लघवी), पाठदुखी, भूक मंदावणे, त्वचेवर खाज येणे आणि रक्तदाब वाढणे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
भूक न लागणे आणि मळमळ:
मूत्रपिंडाच्या समस्येमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंड शरीरातील टोक्सिन्स आणि अतिरिक्त द्रव्य बाहेर टाकण्याचे कार्य करते. जेव्हा मूत्रपिंड नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात टोक्सिन्स साचू लागतात, ज्यामुळे भूक मंदावणे, मळमळ, उलट्या आणि अपचन होऊ शकते.
त्वचेवर खाज सुटणे:
मूत्रपिंड शरीरातील विषारी आणि अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. जर मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसेल, तर शरीरात टॉक्सिन्स (विषारी पदार्थ) साचू लागतात, ज्यामुळे विविध लक्षणे दिसू शकतात. जेसीकी त्वचेवर खाज सुटणे, जळजळ आणि कोरडेपणा.
पाय, घोटे आणि चेहऱ्यावर सूज येणे:
जेव्हा मूत्रपिंडे योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा शरीरात अतिरिक्त पाणी आणि मीठ साचू लागते, ज्यामुळे पाय, घोटे, चेहरा आणि हातांना सूज येऊ शकते. ही स्थिती किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. उच्च रक्तदाब (Hypertension), मधुमेह (Diabetes), मूत्रपिंडांच्या कार्यातील बिघाड, हृदयाचे आजार, प्रथिनांची कमतरता. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मूत्रपिंड तपासणी (Creatinine, Blood Urea, Urine Test इ.) करून घ्या. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतो.
खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवणे:
जर मूत्रपिंड (किडनी) योग्यरित्या कार्य करत नसतील, तर शरीरातील विषारी पदार्थ आणि अपायकारक द्रव्ये योग्य प्रकारे बाहेर टाकली जात नाहीत. यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्याचा परिणाम थकवा, अशक्तपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येण्यास होतो.
लघवीमध्ये फेस किंवा रक्त येणे:
लघवीमध्ये फेस किंवा रक्त येणे हे आरोग्यासंदर्भातील महत्त्वाचे संकेत असू शकतात. मूत्रपिंड (किडनी) संबंधित काही समस्या असल्यास लघवीमध्ये फेस किंवा रक्त येऊ शकते.
वारंवार लघवी होणे:
वारंवार लघवी होणे ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, त्यापैकी मूत्रपिंडाशी संबंधित समस्या महत्त्वाची ठरू शकते. मूत्रपिंड शरीरातील द्रव संतुलन आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करतात. जर ते योग्यरित्या कार्य करत नसतील, तर शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे वारंवार लघवीची तक्रार निर्माण होऊ शकते.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.