माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांने ध्येय निश्चित करायला हवे. यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो.
चाणक्य म्हणतात की, पैसे (Money) कमावण्याच्या नादात आपण अशा अनेक चुका करतो. ज्याचा आपल्याला आयुष्यात पश्चाताप करावा लागतो. तसेच वाईट संगतीचा पर्याय निवडतो. पैशांचा गैरवापर करतो. ज्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. यामुळे सतत आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही वारंवार पैशांची कमतरता भासत असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा असे चाणक्यांनी सांगितले आहे.
1. अन्नाचा आदर
चाणक्य म्हणतात की, ज्या घरांमध्ये (Home) अन्नाचा नेहमी आदर केला जातो. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. लक्ष्मीच्या कृपेने तिथे सदैव पैसा टिकून राहातो. तसेच अन्न ज्या घरातून वाया जाते त्या ठिकाणी अन्नपूर्णा कधीच राहत नाही.
2. मोठ्यांचा आदर
चाणक्य म्हणतात की, नेहमी ज्ञानी लोकांसोबत राहा. तसेच जी लोक मोठ्यांचा आदर करतात. त्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा टिकून राहाते. ज्ञानी लोकांसोबत राहिल्यास आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळते.
3. नवरा-बायकोचे नाते
चाणक्य म्हणतात की, ज्या घरात पती-पत्नी (Husband-wife) आपल्या नात्याचा आदर करतात. त्याचे नाते अधिक टिकून राहाते. तसेच अशा घरात नेहमी शांतता राहाते. ज्या घरात एकमेकांचा सन्मान केला जात नाही. त्या ठिकाणी दारिद्रय येते. ज्यामुळे लक्ष्मी देवीचा वास टिकून राहात नाही. पैशांची चणचण सतत भासते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.