Chanakya Niti On Money : आयुष्यात ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पैशांची कमतरता होणार नाही

Money : आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ज्ञ म्हटले जाते.
Chanakya Niti On Money
Chanakya Niti On Money Saam Tv
Published On

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ज्ञ म्हटले जाते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील समस्यांचे निराकरण केले आहे. चाणक्यांचे नीतिशास्त्र केवळ व्यक्तीला मार्गदर्शन करत नाही तर उच्च उंचीवर पोहोचण्याचे निश्चित मार्ग (Way) देखील सांगतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगातील सर्वात सामर्थ्यवान गोष्टीचाही त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात उल्लेख केला आहे. चाणक्य म्हणतात की, वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. माणसाला वेळेचे महत्त्व (Importance) समजले की त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा लोकांकडे प्रत्येक समस्येवर उपाय असतो.

वेळेचा योग्य वापर महत्त्वाचा

आपल्याला लहानपणापासून घरी (Home) किंवा शाळेत वेळेच्या योग्य वापराचे महत्त्व शिकवले जाते. चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रातही याचा उल्लेख केला आहे. तो वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट मानतो. वेळ प्रत्येकासाठी सारखीच असते. तो कधीही श्रीमंत-गरीब किंवा उच्च-नीच पाहत नाही. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि परतही येत नाही. त्यामुळे ज्याला वेळेची किंमत कळते तो आयुष्यात कधीच हरत नाही.

Chanakya Niti On Money
Chanakya Niti Quotes : ध्येय गाठण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

ध्येयप्राप्ती

चाणक्य म्हणतात की, काळ माणसाचे नशीब बदलण्यास अजिबात विलंब करत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी जे योग्य वेळी निर्णय घेतात त्यांना यश नक्कीच मिळते. त्यांना भविष्यात फार कमी समस्यांना सामोरे जावे लागते. आणि हे सर्व वेळेचे महत्त्व समजून आणि त्याचा योग्य वापर केल्यामुळे शक्य झाले आहे.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद

चाणक्यांच्या मते, धनाची देवी लक्ष्मी देवी वेळेची कदर करणाऱ्यांवर नेहमी प्रसन्न असते. असे लोक योग्य वेळी योग्य काम करतात, त्यामुळे त्यांचा मार्ग खूप सोपा होतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी जीवनात, विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे आणि तारुण्यात आपल्या कामाबद्दल जागरूक व प्रामाणिक राहावे, जे लोक या नियमांचा आपल्या जीवनात अवलंब करतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

याउलट, जे आजचे काम उद्यासाठी सोडून देतात किंवा वेळेवर आपली कामे पूर्ण करत नाहीत, ते धनदेवतेच्या आशीर्वादापासून नेहमीच चंचित राहतात. अशा लोकांच्या जीवनात धन आणि सुखाची कमतरता नेहमीच असते.

Chanakya Niti On Money
Chanakya Niti On Success : स्त्री असो वा पुरुष, आयुष्यात यश मिळवण्यासाठी चाणक्यांच्या या गोष्टी अवलंबा

चांगल्या काळात गर्विष्ठ होऊ नका

चाणक्य सांगतात की, जेव्हा माणसाचा काळ चांगला जातो तेव्हा त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकाराची भावना वाढू लागते. अशा लोकांमध्ये मानवी गुणांची कमतरता असते. हे लोक चांगलं आणि वाईट भेद करायला विसरतात. पण एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होतो. त्यांचा अभिमान आणि अहंकार पाहून मित्र आणि नातेवाईक त्यांच्यापासून दुरावतात. आणि जेव्हा अशा व्यक्तीवर वाईट वेळ येते तेव्हा त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com