Success Tips By Chanakya Niti : आपण यशाच्या मार्गावर असताना आपल्याला हाती अनेकदा अपयश येते. अशावेळी या वाटेत फसवणूकही आपली होत असते. प्रत्येकाला चांगल्या- वाईट काळाला सामोरे जावे लागतेच. यशाची पायरी चढताना आपण अनेकदा अशा गोष्टी करतो ज्यामुळे अपयश सहज आपल्या मागे येते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणूस हा वाईट काळाला सामोरे जाण्यास घाबरतो, तो प्रत्येक गोष्टीला धरुन बसतो त्यामुळे तो कधीच यशाच्या मार्गावर चालत नाही. बरेचदा या काळात आपली फसवणूक झाल्यानंतर आपण चिंतेत सापडतो.जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल किंवा कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर त्याच्याकडे आत्मविश्वास आणि आत्मसंयम असणे आवश्यक आहे. चाणक्यांनी काही धोरण सांगितली आहे ज्यामुळे तुम्ही फसवणूकीपासून वाचू शकतात.
2. चाणक्य नीतीनुसार, जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे इतरांच्या चुकांमधून शिकणे. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांच्या चुकांमधून शिकते तेव्हा स्वतःच्या चुका कमी होतात.
3. पैसा (Money) कमवण्यासाठी धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. कारण पैशापेक्षा धर्म हा नेहमीच मोठा असतो. पुष्कळ वेळा माणूस पैसा कमावण्यासाठी धर्माचा मार्ग सोडतो जे चुकीचे आहे. कारण अशा पैशाचा काही उपयोग नाही ज्यासाठी तुम्हाला धर्माचा त्याग करावा लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.