Baba Vanga: कोरोनानंतर येणार मोठं संकट; बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनं जगभरात भीतीचं वातावरण

Baba Vanga Future Prediction: बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी अनेकवेळा खरी ठरली आहे. बाबा वेंगाने केलेल्या आणखी एका भविष्यवाणीमुळे जगभरात भितीचे वातावरण पसरलंय.
Baba Vanga
Baba Vanga Future Predictionsaam Tv
Published On

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सध्या खूप चर्चेचा विषय बनलीय. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. बाबा वेंगाने केलेली एक भविष्यवाणी खूप चर्चेचा विषय बनलीय. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यामुळे अनेकजण चिंतेत पडलेत. २०८४ पर्यंत लोक खूप लवकर वृद्ध होतील, अशी भविष्यवाणी बाब वेंगा यांनी केलीय. २०८८ मध्ये एक व्हायरस येईल ज्यामुळे लोक खूप लवकर वृद्ध होतील. हा व्हायरस लोकांना वृद्ध बनवेल.

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भाकितात स्पष्टपणे सांगितले होते की, लोकांचे आयुष्य झपाट्याने कमी होऊ लागेल. या काळात महिला ६-७ वर्षांच्या वयात आई होतील, तर पुरुष ८-९ वर्षांच्या वयात लग्न करतील.

भविष्यवाणीनुसार व्हायरल विषाणूमुळे लोकांचे वय झपाट्याने वाढेल. लोक वेगाने वृद्ध होऊ लागतील. बाबा वेंगा यांच्या मते, २०८४ मध्ये निसर्गात मोठे बदल दिसून येतील. या वर्षी निसर्ग पुन्हा एकदा स्वतःला पुनरुज्जीवित करण्यास सुरुवात करेल. यानंतर, २०८८ पर्यंत एक विषाणू येईल ज्यामुळे लोक लवकर वृद्ध होतील. लोकांना तरुण वयातच वृद्धापकाळातील आजार होऊ लागतील.

Baba Vanga
Baba Vanga: बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी; वाचून प्रत्येकाचीच झोप उडेल

तर, २०९७ पर्यंत, विषाणू पूर्णपणे नष्ट होईल आणि त्यानंतर, २१११ पर्यंत, मानव वेगाने रोबोटमध्ये बदलू लागतील. मनुष्य रोबोटसारखे काम करू लागतील. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की कलियुगात मानवांचे आयुष्य कमी होत जाईल. विष्णू पुराणानुसार, कलियुग जसजसे पुढे जाईल तसतसे मानवांचे आयुष्य २० वर्षांपर्यंत कमी होत जाईल.

बाबा वेंगा यांच्या मते, असा काळ येईल जेव्हा माणसाचे आयुष्य २० वर्षांपर्यंत मर्यादित असेल. या काळात लोक २० वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाहीत. दरम्यान अनेक असे भाकित बाबा वेंगा यांनी केले आहेत, जे खरे ठरले नाहीत.

बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी २०२५ वर्षामध्ये अनेक भाकिते केली आहेत. या वर्षात घडणाऱ्या घटनांशी जोडल्या जात आहेत. कधी त्यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल तर कधी जगाच्या अंताबद्दल भाकिते केली आहेत. जगाच्या अंताबद्दल खूप चर्चा आहे, कारण गेल्या दोन-तीन महिन्यांत भारतासह जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या महायुद्धाकडे लक्ष वेधतात. कधीकधी दोन देशांमध्ये युद्ध सुरू होते तर कधीकधी विमान अपघात होतो. त्यामुळे बाबा वेंगा यांचे भाकित खरे ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com