
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होता. 6 जून 1674 रोजी याच गडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्यामुळे रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं.
मुंबईहून रायगडाचं अंतर सुमारे 170 ते 180 किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गाने महाडमार्गे पाचाड गाव गाठता येतं. तुम्हाला कारने 4 ते 5 तास लागतील.
पुण्याहून रायगडाजवळ जवळपास130 ते 140 किलोमीटर अंतर लागतं. ताम्हिणी घाट किंवा भोर-वरंधा घाटमार्गे प्रवास तुम्ही करू शकता. 3.5 ते 4.5 तासांचा हा प्रवास असेल.
मुंबई, ठाणे, पुणे आणि महाडजवळून रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडपर्यंत एसटी बस सेवा उपलब्ध असते. राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान विशेष बसही सोडल्या जाऊ शकतात. तर तुम्ही तिथे रोपवेचाही वापर करू शकता. याने काही मिनिटांतच गडमाथ्याजवळ पोहोचता येतं.
रायगडावर जाण्यासाठी जवळपास 1,700 हून जास्त पायऱ्या आहेत. तुम्ही 1.5 ते 2 तासांत गड चढता येतो. तर खर्च हा अंदाजे मुंबई-पुण्याहून एसटी प्रवासाचा ₹400 ते ₹800 होईल. खासगी वाहन इंधन खर्च हा ₹1,500 ते ₹3,000 रुपये होईल. रोपवेचं तिकीट हे अंदाजे ₹300 ते ₹500 प्रति व्यक्ती होईल. जेवणाचा आणि इतर खर्च ₹300 ते ₹1,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एकूण खर्च प्रति व्यक्ती ₹1,000 ते ₹3,500 दरम्यान येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.