मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई जाणारी प्रगती एक्सप्रेस रद्द झालीय.
पावसामुळे मुंबई शहरात लोकलसेवा ठप्प झाल्याचं वृत्त होतं. तर मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई जाणारी सिंहगड एक्सप्रेस रद्द झालीय.
मुंबईत पहिल्याच मुसळधार पावसाचा परिणाम वाहतूकीवर झालाय. मुंबईहून मनमाडकडे जाणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द झाली आहे.
मुंबईत ३०० मिमीहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर आलीय. सायनमध्ये २२१ मिमी, पवईथ ३२० मिमी तर अंधेरीमध्ये २९८ मिमी पाऊस पडला आहे.
शिवडी कोळीवाडा येथे १८५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चकाला येथे २८३ तर चेंबूरमध्ये २२२ मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळतेय. संततधार पावसाने नागरिक हैराण झालेत.
गोरेगावमध्ये २७९ मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाल्याचं समोर आलंय. गटारं देखील तुंबली आहेत.
राज्यात वसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, म्हणून अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलीय. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर केलीय.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी देखील प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.