पावसाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले आहेत अशात प्रत्येकजण घराबाहेर पडून वातावरणाचा आनंद घेत आहेत.
मात्र पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात होत आहेत.
आज आपण पाहूयात जर पावसाळ्यात तुम्ही फिरायला जाणार असाल तर खाली दिलेल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
अनेकजण पावसाळ्यात फिरण्यासाठी धबधबे किंवा तलावाच्या जवळ जातात. मात्र अनेकदा पाण्याची पातळी वाढू लागते,या गोष्टी लोकांच्या लक्षात येईपर्यंत मोठे अपघात होतात.
पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याआधी योग्य ते ठिकाण निवडा शक्यतो डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची दाट शक्यता असते.
पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी वाहन चालवताना काळजी घ्या. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर वाहन चालवताना काळजी घ्यावी.
जर तुम्ही कोणत्या धबधबे किंवा डोंगराळ भागात फिरण्यासाठी जाता तेव्हा तिथे साहसी खेळ खेळू नका. अशाने तुमच्या जीवाला धोका अशू शकतो.
जर पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय तर चुकूनही अनोळखी ठिकाणी जाऊ नका. ज्या परिसराची संपूर्ण माहिती असेल तिच ठिकाण फिरण्यासाठी निवडावीत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.