
फँड्री चित्रपटामुळे अभिनेत्री राजेश्वरी खरातला प्रसिद्धी मिळाली. फँड्री चित्रपटातील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या राजेश्वरीने अलीकडेच काही फोटो शेअर केले होते. धर्मांतराच्या मुद्यावरुन राजेश्वरीला ट्रोल करण्यात आले होते. या प्रकरणावर राजेश्वरीने स्पष्टीकरण दिले आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलवर भाष्य केले. ख्रिश्चन कुटुंबातच माझा जन्म झाला आहे. मी कोणताही धर्म बदललेला नाही. लोकांचा दृष्टिकोन मर्यादित आहे, ते फक्त फोटो पाहून निर्णय घेतात. सत्य काय आहे हे पाहण्याची तयारी त्यांच्याच नसते, असे राजेश्वरी खरात म्हणाली.
राजेश्वरी खरात म्हणाली, 'लोक विचार न करता केवळ फोटोवरुन कमेंट्स करतात. ट्रोल करतात. ट्रोलिंग करणारे अनेकदा अजब मॅसेज पाठवतात. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला भेटायचे आहे असे असंख्य मेसेज मला येत असतात. धर्मांतर ही वैयक्तिक निवड असून, त्यावरून लोकांनी कोणावरही टीका करणे चुकीचे आहे.'
'प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. टीका करणारे अनेकदा स्वतःच्या अपयशामुळे, रागामुळे अशा प्रकारे व्यक्त होतात. सोशल मीडियावर त्यांना व्यासपीठ मिळाते आणि मग ते वाईट कमेंट्स करतात. लोकांनी आधी सत्य समजून घेतले पाहिजे. कोणावरही माहितीशिवाय टीका का करायची? त्याला टार्गेट का करायचे? प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण किती आणि कधी बोलावं हे लोकांना समजायला हवे', असे वक्तव्य राजेश्वरीने केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.