
Javed Akhtar : कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीतील असमतोल, पाकिस्तानाचे भारतीय कलाकारांसोबतची वागणूक याबद्दल आपले मत मांडले आहे.
जावेद अख्तर म्हणाले की, भारताने नेहमीच पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत केले आहे. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली, नूरजहाँ यांसारख्या कलाकारांना भारतात भरभरून प्रेम मिळाले. फैज अहमद फैज यांना भारतात राज्यप्रमुखांप्रमाणे सन्मानित करण्यात आले. परंतु, भारतातील लता मंगेशकर यांसारख्या महान गायिकेला पाकिस्तानात कधीही परफॉर्म करण्याची संधी मिळाली नाही. अख्तर यांच्या मते, हे 'वन-वे ट्रॅफिक' आहे, जे योग्य नाही.
पाकिस्तानातील जनतेबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे अख्तर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानातील अनेक कवींनी लता मंगेशकर यांच्या आवाजात सादर करता याव्या म्हणून कविता लिहिल्या. पण, पाकिस्तानातील व्यवस्थेने भारतीय कलाकारांना परफॉर्म करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीत अडथळे निर्माण होतात.
जावेद अख्तर यांनी असेही सांगितले की, जर आपण पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातली, तर याचा फायदा पाकिस्तानातील कट्टरपंथी आणि लष्कराला होईल. ते भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीला थांबवू इच्छितात, जेणेकरून पाकिस्तानातील लोकांना भारतातील स्वातंत्र्य आणि विविधता दिसू नये.पण, अशा परिस्थितीत, अख्तर यांच्या मते, सध्याच्या घडीला पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.