
मुंबई - शाहरुख खनचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.आर्यनला आता दर आठवड्याला मुंबईच्या एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनची मंजूर अटी शिथिल करण्याच्या अर्जावर आज सुनावणी झाली.
हे देखील पहा -
न्यायाधीश सांबरे यांच्या खंडपीठानं या प्रकरणाबाबत सुनावणी केली. यावेळी अॅड. अमित देसाई यांनी आर्यन खानसाठी युक्तीवाद केला. आता या प्रकरणाचा तपास एसआयटीची दिल्ली टीम करत आहे. दिल्ली एसआयटीनं ज्या वेळी आर्यन खानला चौकशीसाठी पाचारण केलं, त्या त्या वेळी त्याला चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. त्यासोबतच आर्यन खानला मुंबईतून बाहेर जायचं असेल, तर त्यासाठी तपास अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आले आहे.
आर्यनबाबत २ महत्वपूर्ण अटींना न्यायालयाने शिथिलता दिली आहे.
- दर शुक्रवारी मुंबईत NCB कार्यालयात हजेरी लावाण्याच्या अटी शिथिल करण्यात आली आहे.
- तसेच मुंबई सोडून जाताना तपास अधिकाऱ्यांना त्या संदर्भात माहिती देणे बंधनकारक
ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खान सहित मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना 28 ऑक्टोबरला न्यायालयानं जामीन दिला होता. 14 अटींचे पालन करण्यास न्यायालयानं बजावले होते.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.