

A.R Rahman controversy: ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी "पॉवर चेंज" आणि "सांप्रदायिक" कारणांमुळे बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याचे कारण दिले. अनेक चित्रपट कलाकारांनी या विधानावर टीका केली आणि ते "अयोग्य" म्हटले. ए. आर. रेहमान यांनी आता एका व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.
ए.आर. रहमान यांनी सांगितले की त्यांना कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. त्यांनी नेहमीच त्यांच्या संगीताद्वारे देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी "माँ तुझे सलाम/वंदे मातरम" ची क्लिप दाखवून समारोप केला. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की भारत नेहमीच त्यांचे घर आणि शिक्षक राहिला आहे. ते म्हणाले, "संगीत नेहमीच आमच्या संस्कृतीशी जोडण्याचा मार्ग राहिला आहे. भारत माझे घर, माझे गुरु आणि माझी प्रेरणा आहे. माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला आशा आहे की माझा मुद्दा समजला जाईल."
रहमान यांनी स्पष्टीकरण दिले
ए.आर. रहमान पुढे म्हणाले, "मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे कारण त्यामुळे मला अशी जागा निर्माण करता येते जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते विविधता आणि सर्जनशील स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या वातावरणात काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि भारतीय असल्याने विविध बहुसांस्कृतिक आवाजांशी जोडण्याची संधी मिळाली आहे.
ए.आर. रहमान काय म्हणाले?
शेवटी, त्यांनी सांगितले की ते या राष्ट्राचे आभारी आहेत आणि उत्तम उत्तम संगीत देण्याचा प्रयत्न ते नेहमीचं करत राहतील. बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान म्हणाले, "गेल्या आठ वर्षांत बॉलीवुडमध्ये पॉवर चेंज झाली आहे. तसेच तिथे क्रिएटिव्ह नसलेले लोक निर्णय घेत आहेत आणि ही एक धार्मिक राजकारण गोष्ट झाली असू शकते." त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.