नवी दिल्ली : कोरोना वाढीच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई CBSE परिक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सीबीएसई १० वीची परिक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. Big Decision by Central Government regarding CBSE Exams
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोनाची Corona परिस्थिती लक्षात घेऊन विविध स्तरांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या आज १२ वाजता झालेल्या बैठकीतून परीक्षेसंदर्भात काही महत्वाचे निर्णय समोर येत आहेत.
मंडळामार्फत 1 जून 2021 रोजी कोरोना Corona परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती तूर्तास दिली गेली आहे. महत्वाचे म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान १५ दिवसांच्या आधी नोटीस दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री शरमेश पोखरीयल निशंक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, शाळा व उच्च शिक्षण सचिव व अन्य उच्च अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या बारावीच्या परीक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Big Decision by Central Government regarding CBSE Exams
"विद्यार्थ्यांचे Students कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक हितांना इजा होणार नाही याची काळजी घेतली जाईल" असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
देशातील कोरोना साथीच्या परिस्थितीत बर्याच राज्यांत कोविड चे रुग्ण जलद गतीने वाढत आहेत. आणि काही राज्यांमध्ये इतरांपेक्षा जास्त परिणाम झाले आहेत. अशा भयावह परिस्थितीत तब्बल 11 राज्यांत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य बोर्डांप्रमाणे सीबीएसईच्या परीक्षा सुद्धा देशभरात एकाच वेळी परीक्षा घेणे आवश्यक आहे. वाढलेल्या साथीच्या आजाराची आणि शाळा बंद होण्याची सद्यस्थिती पाहता तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. Big Decision by Central Government regarding CBSE Exams
पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत:
1 लाख विदयार्थ्यांची मागणी बोर्ड परीक्षा रद्द करा:
सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या अशी मागणी दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनीकेली होती. मात्र, सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याची हमी विद्यार्थ्यांना दिली होती. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन स्वरूपानेच आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत होती.
Edited By - Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.