
वाशिमच्या आमखेडा गावात घरगुती वादातून चाकू हल्ला
अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला
या हल्ल्यात चौघे जण गंभीर जखमी झालेत
नातेसंबंधांवरून झालेल्या वादातून हल्ल्याची घटना
वाशिममध्ये दिवाळीमध्ये रक्तरंजित थराराची घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एकमेकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वाशिमच्या आमखेडामध्ये घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती नातेसंबंधांवरून टोकाचा वाद झाला. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या वादातून गंभीर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात अविनाश निमिचंद चव्हाण यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यात संदेश चव्हाण, स्वाती चव्हाण, गजानन चव्हाण आणि आकाश चव्हाण यांच्यावर देखील चाकू हल्ला झाल्याने हे चौघे जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
नातेसंबंधातून हा हल्ला झाला असून विविध गावातील पारधी समाजातील लोकांनीच हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर मोटर सायकल सोडून घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेचा तपास जऊळका पोलिस करत आहेत.c
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.