
सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. सणासुदीच्या दिवसात अनेकजण आपापल्या गावी जातात. यासाठी ट्रेनने हजारो लोक प्रवास करतात. दरम्यान, आता सणांच्या दिवशी रेल्वे स्पेशल ट्रेन सोडणार आहेत. सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढते. दरम्यान, आता प्रवाशांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने २१ ते ३० नोव्हेंबर या काळात विशेष ट्रेन सोडणार आहेत. तब्बल १२,००० जास्त ट्रेन सोडणार आहेत. पहिल्या टप्प्यात रेल्वे १५० स्पेशल ट्रेन सोडणार आहेत.
किती स्पेशल ट्रेन धावणार
रेल्वे सणासुदीच्या दिवशी स्पेशल ट्रेन सोडणार आहेत. यातील काही ट्रेन साउथ सेंट्रल रेल्वेद्वारे चालवली जाणार आहे. तर ईस्ट सेंट्रल रेल्वने १४ स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन पटना, गया, दरभंगा आणि मुझप्फरपुर या प्रमुख शहरांमधून प्रवास करणार आहे. या रेल्वेच्या एकूण ५८८ फेऱ्या होणार आहेत.
ईस्टर्न रेल्वेने कोलकत्ता, सियालदह आणि हावरा या मार्गावर २४ स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनच्या १९८ फेऱ्या होणार आहेत.
वेस्टर्न रेल्वे मुंबई, सूरत आणि वडोदरा येथून २४ ट्रेन सोडण्यात येणार आहे. यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना फायदा होणार आहे.
साउथ रेल्वे चेन्नई, कोईम्बतूर आणि मदुरै या मार्गावर स्पेशल ट्रेन सोडणार आहे. या ट्रेन एकूण ६६ ट्रीप्स करणार आहेत.
इतर ठिकाणीही धावणार स्पेशल ट्रेन
ईस्ट कोस्ट रेल्वेतर्फे भुवनेश्वर, पुरी, संबलपुर या मार्गावर स्पेशल ट्रेन धावणार आहे. साउथ ईस्टर्न रेल्वेअंतर्गत रांची आणि टाटानगर या मार्गावर धावणार आहे. तर नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज आणि कानपूर येथून स्पेशल ट्रेन सोडणार आहे. याचसोबत बिलासपुर, रायपुर, भोपाळ आणि कोटा या मार्गावरदेखील स्पेशल ट्रेन धावणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.