

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
२२वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा
केवायसी करणे अनिवार्य
देशातील जवळपास ९ कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांना काही कामे करणे अनिवार्य आहेत.जर त्यांनी ती कामे केली नाही तर त्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही.
केवायसी करणे अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC)
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करायचे आहे.
तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसणार आहे.
यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
यानंतर ओटीपी टाकून केवायसी पूर्ण करायची आहे.
जमिनीचे व्हेरिफिकेशन
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची योग्य आणि खरी माहिती द्यायची आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे व्हेरिफेकेशन केले जाणार आहे.
जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
आधार बँक लिंक (Aadhaar-Bank Link)
शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करायचे आहे.
जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
तुम्ही बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन आधार बँक अकाउंट लिंक करायचे आहे.
फार्मर आयडी गरजेचे (Farmer ID)
पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे आहे.
काही राज्यातील शेतकऱ्यांना हे कार्ड अनिवार्य केले आहे.
फार्मर आयडी काढण्याची प्रोसेस ऑनलाइन आहे. शेतकऱ्यांनी हे कार्ड काढायचे आहे.