Mumbai Fish Market 
web-special-news

काय सांगताय काय? मुंबईच्या बाजारातून मासेच झालेत गायब!

साम टीव्ही ब्युरो

मुंबई: थंडीच्या दिवसात माशांचे (Fish) वाढलेले दर उन्हाळ्यापर्यंत उतरणीला लागत असतात. पण यंदा एप्रिल (April) उजाडला तरी माशांचे दर वाढतच चाहते आहेत. त्यामुळे मासे खरेदीसाठी अधिकची पदरमोड करताना चोखंदळ मत्स्यप्रेमींना हात आखडता घ्यावा लागतोय. Mumbais fish market has become expensive

समुद्रकिनाऱ्यालगत (Sea Shore) मासे निरनिराळ्या अनेक कारणांमुळे मिळेनासे झाले असून खोल समुद्राऐवजी किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार (Fishermen) संकटात सापडले आहेत, तर माशांची आवक कमी झाल्यामुळे मासेविक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. मासे विक्रेते कमी आवक मुळे मत्स्यव्यवसाय (Fisheries) बंद होण्याच्या मार्गावर आहे. मासे कमी मिळत असल्यामुळे  त्याच्या किमती वाढत आहे. परिणामी ताटात येणारी मासळी महाग झाली म्हणून ग्राहक मासे खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. 

कसे आहेत सध्या माशांचे दर-  

कोळंबी ६०० रु किलो झाले, आधी ३०० होते

पापलेट १२०० रु किलो झाले, आधी ७०० होते

सुरमई ६०० रु किलो झाले, आधी ३०० होते

हलवा ६०० किलो झाले, आधी ३०० होते

बोंबील २५० किलो झाले, आधी १०० होते

कोरोनामुळे मासळी बाजारापासून दुरावलेला ग्राहकवर्ग अद्याप बाजाराकडे फिरकलेला नाही. शिथिलीकरणानंतर व्यवसाय सुरू झाला, पण तोही जेमतेम आहे.  त्यात माशांची कमतरता, भाववाढ यामुळे ग्राहक मासे विकत घेत नाहीत. ऑनलाइन मस्त्यखरेदीला नव्या पिढीची पसंती आहे. त्यामुळे शिथिलीकरणानंतरही मासळी बाजार ओसच पडले आहेत .Mumbais fish market has become expensive

Edited by- Sanika Gade. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT