तुमच्या मोबाईलचं रिचार्ज आता सरकार मोफत देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...देशभरात कोट्यवधी व्यक्तींकडे मोबाईल आहेत...लहान मुलं सोडली तर प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतो...काहींकडे तर दोन दोन मोबाईल असतात...मात्र, आता सरकार मोबाईल रिचार्ज मोफत देणार असल्याचा दावा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय...सरकार आता मोफत बिल का भरणार आहे...? आणि सरकार मोफत मोबाईलचं बिल देत असेल तर ते कुणाला मिळणार आहे...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
केंद्र सरकार मोफत मोबाईल रिचार्ज योजने अंतर्गत सर्व भारतीय वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी 239 रुपयांचा रिचार्ज देत आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना हाच प्रश्न आहे की आपल्याला रिचार्च मोफत मिळवायचं असेल तर काय करावं लागेल...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती सरकारकडूनच मिळू शकते...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
मोफत रिचार्जची केंद्र सरकारची योजना नाही
सरकार मोफत रिचार्ज कुणालाही देत नाही
सत्यता पडताळल्याशिवाय मेसेज पुढे पाठवू नका
डिजिटल फसवणूक करण्याचा हेतू असू शकतो
मेसेजसोबत लिंकही दिली जाते...त्यामुळे तुमची फसवणूक करण्याचा डाव असू शकतो...आमच्या पडताळणीत सरकार मोबाईलचं बिल भरणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका...आणि तुम्हाला असा मेसेज आल्यास पुढे शेअर करू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.